मुंबई : भारताचा पाकिस्तानवर ७ विकेट्स राखून विजय मिळविला. भारत विरुध्द पाकिस्तान यांच्यात विश्वचषकातील सामना अहमदाबाद येथे नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळविण्यात आला. भारताने पाक संघाने दिलेल्या १९२ धावांचा पाठलाग करताना ७ विके्टसने विजय मिळविला. भारताने ३ बाद १९३ धावासंख्या उभारली. कर्णधार रोहित शर्माने ६ चौकार, ६ षटकारांसह ६३ चेंडूत ८६ धावा करत विजयात योगदान दिले.
भारताने प्रथम नाणेफेक जिंकत पाकिस्तानला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. पाकने प्रथम फलंदाजी करताना सर्व बाद १९१ धावाच केल्या. कप्तान बाबर आझम आणि मोहम्मद रिजवान यादोघांनी संघाचा डाव सावरत अर्धशतकीय भागीदारी केली. भारतीय गोलंदाज बुमराह, पंड्या, जडेजा, सिराज आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. दरम्यान, भारताचा पुढील सामना पुणे येथे दि. १९ ऑक्टोेबरला बांग्लादेशसोबत असणार आहे.