रवींद्र वायकरांना हायकोर्टाचा दणका! युती सरकारचा 'तो' निर्णय योग्यच

    13-Oct-2023
Total Views | 539

Ravindra Vaykar


मुंबई :
एकीकडे शिवसेनेच्या आमदार अपात्रतेवर सुनावणी सुरु असताना ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांनी राज्य सरकार एका याचिकेतून आरोप केला होता. परंतु, आता हायकोर्टाने हा आरोप फेटाळल्याने शिंदे सरकारला दिलासा मिळाला आहे.
 
रवींद्र वायकर यांनी राज्य सरकार आमदारांच्या विकास निधी वाटपात दुजाभाव करत असल्याचा आरोप करणारी रिट याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. यामध्ये भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांना या निधी वाटपात झुकते माप देण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला होता.
 
परंतू, आरोपासंदर्भात ठोस पुरावे नसल्याचे सांगत हायकोर्टाने त्यांची याचिका फेटाळून लावली आहे. न्यायमूर्ती सुनील शुक्रे, न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या द्विसदस्य खंडपिठानं याप्रकरणी निर्णय दिला. ही याचिका गुणवत्तेच्या आधारावर कमकुवत असल्याचे हायकोर्टाकडून सांगण्यात आले आहे. या निकालामुळे शिंदे-फडणवीस सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे.



अग्रलेख
जरुर वाचा
हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण होतील. संघाचा जन्म, जन्मापासून करावा लागलेला संघर्ष, विस्तार व आज समाजातील सर्वच क्षेत्रांवर संघाचा पडलेला लक्षणीय प्रभाव, या सार्‍या प्रक्रियांबाबत समाजात, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही कमालीचे कुतूहल आहे. यांसारख्या विविध विषयांवर ‘ऑर्गनायझर’चे संपादक प्रफुल्ल केतकर, ‘पांचजन्य’चे संपादक हितेश शंकर, सा. ‘विवेक’च्या संपादक अश्विनी मयेकर आणि मल्याळम दैनिक ‘जन्मभूमी’चे सहसंपादक एम. बालकृष्णन यांनी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद.....

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121