मुंबई : घाटकोपर परिसरात नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या गुजराती भाषेच्या पोस्टर्स फाडण्याचे कृत्य उबाठा गटाने केले आहे. पण आता या कृत्यामुळे उबाठा गट चांगलाच अडचणीत आला आहे. लोकांनी उबाठा गटाची गुजराती लोकांबद्दल आणि भाषेबद्दल असणाऱ्या दुटप्पी भूमिकेची पोलखोल केली आहे.
घटना आहे २०१९ ची, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली असलेल्या शिवसेनेकडून वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरेंना आमदारकीची उमेदवारी देण्यात आली होती. त्यावेळी आदित्य ठाकरेंच्या प्रचारासाठी लावण्यात आलेले फलक ६ वेगवेगळ्या भाषांमध्ये होते.
या भाषांमध्ये तमिळ आणि गुजरातीचा पण समावेश होता. या फलकांना काही कट्टर शिवसैनिकांनी विरोध केला असता. आदित्य ठाकरे समर्थकांनी हे फलक काढून घेतले होते. त्यानंतर हे फलक आपण लावलेच नाही, असा दावा आदित्य ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी केला होता.
पण त्यावेळी मिळालेल्या माहितनुसार हे फलक शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून आणण्यात आले होते. त्यामुळे या प्रकरणात आदित्य ठाकरेंवर चांगलीच टीका झाली होती. आताही गुजराती भाषेतील नवरात्रीचे पोस्टर्स फाडल्यामुळे आदित्य ठाकरे टीकेचे धनी ठरत आहेत.
निवडणूकीवेळी उबाठा गटाला उत्तर भारतीय आणि गुजराती लोकांची आठवण येते. पण निवडणूक संपल्या की, या लोकांमध्ये दहशत पसरवण्याचे काम ते करत आहेत. अशी टीका सोशल मिडियामधून आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर होत आहे.