मुंबई : "महिलांनी स्वतःचे संरक्षण करण्याकरिता समर्थ असले पाहिजे आणि त्यांनी स्व:संरक्षणासाठी काहीतरी केले पाहिजे" हा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी १०० वर्षा पुर्वी मांडलेले विचार आजही किती लागु होत आहे ह्याची प्रचीती आपल्याला रोज वृत्तपत्रातून येणाऱ्या बातम्यांमधून येईलच. सावरकरांच्या याच विचारावर स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेने महिलांसाठी आत्मसंरक्षण प्रशिक्षण वर्ग चालू केला आहे. महिलांना स्वतःचे संरक्षण स्वतः करता यावे या उद्देशाने या उपक्रमाची सुरुवात दि. ३० सप्टेंबर रोजी डोंबिवली शहरात झाली.
हा प्रशिक्षण वर्ग २ महिने कालावधीसाठी डोंबिवली शहरातील टिळक नगर शाळेत दर शनिवारी सायंकाळी भरणार आहे. पाहिल्याच प्रशिक्षण वर्गाला शाळा आणि महाविद्यालयातील मुली तसेच गृहिणींनी प्रतिसाद देवून २५ महिलांसानी प्रवेश घेतला. हा प्रशिक्षण वर्ग डोंबिवली मधील ज्युडो क्लासेस घेणार्या आणि आशियायी ज्युडो मधील सुवर्णपदक विजेत्या पूर्वा मॅथुज लोकरे या घेत आहेत.
या उप्रमासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास कुलकर्णी हे देखील उपस्थित होते. श्रीनिवास कुलकर्णी यांनी माहिती देताना सांगितले की, सावरकर एक दूरदृष्टीचे विचार करणारे नेते होते...त्यांनी १०० वर्षापूर्वी मांडलेले विचार आज आणि यापुढे कित्येक वर्षे आचरणात आणण्याची गरज आहे. "स्त्रियांनी स्वतःचे रक्षण करण्याकरिता स्वतः समर्थ झाले पाहिजे" हा त्यांचाच मांडलेला विचार आज संस्था प्रत्यक्ष कृतीत उतरवत आहे.त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणी असे वर्ग सुरू करणार असल्याचे सांगून महाराष्ट्रातून जास्तीत जास्त गृहिणी आणि विद्यार्थिनींनी या वर्गात नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.
हा उपक्रम डोंबिवली शहरात राबवण्यासाठी शहराध्यक्ष मंगेश राजवाडे, शहरउपाध्यक्ष अभिजीत कापशीकर, कार्याध्यक्ष दीपक देसाई तसेच महिला कार्यकारिणी सदस्य डॉ. वृषाली राजवाडे, किमया कोल्हे, ऋजुता सावंत, नीलिमा कोडोलीकर, स्वाती गोगटे या सर्वांनी परिश्रम घेतले.