सांस्कृतिक दहशतवादावर मराठी मुस्लीम साहित्यिक मोकळेपणाने बोलू शकतील?

    21-Jan-2023
Total Views | 162
दहशतवाद


दि. २८-२९ जानेवारीला नाशिकला अखिल भारतीय मुस्लीम मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात अनेक सरकारमान्य विद्वान आणि साहित्यिकांचा सहभाग असणार आहे. या संमेलनाच्या दोन दिवसांत पाच परिसंवाद होणार आहेत. परिसंवादांपैकी पहिला परिसंवाद स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ‘मुस्लीम : प्रश्न, वास्तव आणि अपेक्षा’ आणि दुसरा ‘साहित्य आणि सांस्कृतिक दहशतवाद’ या विषयावर होणार आहे. हे दोन्ही परिसंवाद हिंदूंच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. तरीही या परिसंवादात पारंपरिक दृष्टिकोनातून ज्यांना ‘उजवे विचारवंत’- 'A Right wing intellectuals' समजले जाते आणि जे गैरमुस्लीम आणि गैरसेक्युलर दृष्टिकोनातून या विषयांवर मत मांडतील, असे वक्ते नाहीत. मग आहेत तरी कोण?


हिंदू धर्म, परंपरा, इतिहास यांची साम्यवादी कावीळ झालेल्यांचा आणि स्वत:ला निधर्मी कातड्यात गुंडाळलेल्या मुस्लिमांचा यामध्ये समावेश आहे. अपेक्षा अशी आहे की, परिसंवादात हे एकजात सर्व वक्ते ‘अखलाख-अखलाख’ करत हिंदू-भगवा सांस्कृतिक दहशतवाद यावर भरभरून गरळ ओकतील. पण, त्याचवेळी इतक्यातच घडलेल्या रक्तरंजित घटना, सर्वधर्म समभावाचा दाखला दिला जातो, त्या अजमेर शरीफच्या दर्ग्यासमोर आणि इतरत्रही मिरवणुका काढून उन्मत्त मुस्लीम जमावाने ‘सर तन से जुदा’च्या घोषणा देऊन जो ‘सांस्कृतिक दहशतवाद’ पसरवला, त्यावर भाष्य करण्याचे, तो कसा अनाठायी आणि मानवताविरोधी आहे, असे मत मांडण्याचे धैर्य दाखवतील काय? हिंदू कायद्याच्या चौकटीत राहून या सांस्कृतिक दहशतवादाचा सामना करतात, जीवावर उठत नाहीत, हे माहिती असल्याने अस्तित्त्वात नसलेला हिंदू सांस्कृतिक दहशतवादाचा बागुलबुवा करण्यात वेळ घालवतील? पिढ्यान्पिढ्या महाराष्ट्रात घालवलेला मुस्लीम जेव्हा मातृभाषा उर्दू म्हणून नोंदवतो, तेव्हा घरापासून सांस्कृतिक दहशतवाद सुरू होतो.



अखिल भारतीय मुस्लीम मराठी साहित्य संमेलन


मुस्लीम सांस्कृतिक दहशतवाद



खरे पाहिले, तर जागतिक मुस्लीम समाज धर्मांतर्गत सांस्कृतिक दहशतवादाचा बळी आहे. भारतात मुस्लिमांमधील उच्चभ्रू वर्ग, अश्रफ - सय्यद, खान, पठाण इ. जातींनी (तसेच म्हणायला पाहिजे) पसमंदा वर्गात मोडणात अर्जल, अजलफ वर्गाला शेकडो वर्षे सांस्कृतिक दहशतवादाखालीदाबून ठेवले आहे. पसमंदा वर्गात काम करणार्‍या पुण्याच्या सामाजिक कार्यकर्त्या तमन्ना अस्लम इनामदार या मराठी मुस्लीम लेखिकेने ‘मुस्लीम बलुतेदार’ (संस्कृती प्रकाशन, २०१८) या पुस्तकात मुस्लीम धर्मांतर्गत सांस्कृतिक दहशतवादावर नेमके बोट ठेवले आहे. त्या लिहितात, “भारताच्या भूमीवर इस्लामने पाऊल ठेवले तेव्हा या धर्माची शिकवण, समताभावई गुणांनी प्रभावित होऊन अनेक जातीजमातींच्या सामान्य लोकांनी इस्लाम कबूल केला. पुढे मुस्लीम सुफी फकिरांच्या विचारसरणीनेआकर्षित होऊन या लोकांनीही (मुस्लीम मदारी जमातीने) इस्लाम धर्म स्वीकारला (पृ. ३९). कट्टर इस्लाम मानणारा, फक्त अल्लाला पूज्य म्हणून वागणारा आणि हदिस-शरियतला अनुसरून जगणार्‍या इतर मुस्लीम मंडळींनी (त्यांना) कधी जवळ केले नाही (पृ ५२).”




टाईम्स ऑफ इंडिया’



 मुस्लीम छप्परबंद समाजाची सांस्कृतिक दहशतवादाला धरून होणारी कोंडी त्यांनी स्पष्ट शब्दात मांडण्याचे धैर्य दाखवले आहे. धर्मांतर केलंय, इस्लाम धर्म स्वीकारलाय म्हणून हिंदू लाथाडतात, तुम्ही नीच जातीचे म्हणून (उच्चभ्रू) मुस्लीम जवळ येऊ देत नाहीत (पृ. १२९). ज्यावेळी भाजपने पसमंदा मुस्लिमांच्या संदर्भात त्यांच्या सामाजिक न्यायाची भाषा केली, तेव्हा या मुखंडांना जाग आली. यापूर्वी पसमंदा मुस्लिमांनी इस्लाम त्यागण्याची धमकी दिल्याचे अनेकांच्या स्मरणात नसेल. ती बातमी ‘टाईम्स ऑफ इंडिया’ दि. २० जुलै, १९९४च्या अंकात आली होती- 'A Backward Muslims' threat to defy 'fatwas' and renounce Islam.' त्याचा महत्त्वाचा परिणाम म्हणजे भारतात ‘पेट्रोडॉलर’ व्हायला सुरुवात झाली. टोलेजंग मशिदी उभ्या होऊ लागल्या. त्यावर पोसला जाणारा मुल्लांचा वर्ग भारतात उदयास आला. इस्लामी देशांतील भडकाऊ भाषणांचा कित्ता गिरवत इथलेही मुल्ला विशेष करून शुक्रवारच्या दुपारच्या नमाजांच्या वेळी भडकाऊ भाषणे करू लागले.
 
 

रक्तपिपासू उन्माद



अनेक वर्षे अफगाणिस्तनात वार्ताहर असलेल्या ख्रिस्तिना लँबने 'Sewing Circles of Herat (Perennial, २००२)' या पुस्तकात काबूलच्या फुटबॉल मैदानावर दुपारी तालिबान्यांकडून होत असलेल्या हातपाय कापणे, दगडाने ठेचून मारणे या शिक्षांना शे-सव्वाशे वेळा पाहून निर्ढावलेल्या निदा मोहम्मद या १४ वर्षांच्या मुलासह झालेले संभाषण दिले आहे. विशेष करून पवित्र रमझानच्या महिन्यात या शिक्षांचा सुकाळ असे. प्रेक्षकांच्या टाळ्यांच्या आणि आरोळ्यांच्या गजरात या शिक्षांची अंमलबजावणी होत असे. ते फुटबॉल मैदान कितीही धुतले तरी तेथे सांडलेल्या रक्ताचा निचरा होत नव्हता (पृ. २४६-२४७). तसेच, वर्णन आयन अली हिरसीच्या आत्मचरित्रात अखपषळवशश्र AInfidel (Free Press, २००७) आले आहे. ती लिहिते, “नमाज आटोपल्यावर लगेच, But as soon as we left the mosque people had their heads cut off in public squares. Adults spoke of it. It was normal routine thing: after the Friday noon prayer you could go home for lunch or you could go and watch the executions (n. ४३).'' असा रक्तपिपासू उन्माद नागरिकांत भिनवणारे सरकारमान्य मुल्ला असत. त्या मुल्लांच्या पावलावर पाऊल ठेवून भारतातील मुल्ला कशी भडकाऊ भाषणे करतात, ती मी ऐकली आहेत.



SHIKH KILIING


जवळपास सर्वच देशांत शुक्रवारच्या नमाजांनंतर काफिरघृणेने (Kafirphobia)उन्मत्त झालेले नमाजी हिंसक बनतात. काश्मीरमध्ये वर्षानुवर्षे तेच घडत होते. पाकिस्तानात शिया आणि इतर पंथांच्या मशिदी, सुफी दर्ग्यांवर होणार्‍या हल्ल्यांचा दिवस शुक्रवार असतो. सामान्य पाकिस्तानी तर मुल्ला लोकांना ‘बद मिजाजी दीनी बंदे’ म्हणतात (Muslim Becoming, नवीदा खान पृ. १४७). आपला नाही तो काफिर, त्याला जगण्याचा हक्क नाही. मुल्ला लोक काफिरघृणा - 'kafirophobia' सामान्यांमध्ये भिनविण्याचे काम करतात. अनेक पाश्चात्त्य देशांमधून या मुल्लांना हाकलून देण्यात आले आहे. या धार्मिक उन्मादाचा बळी मुस्लीम समाजच आहे. जरी धर्म एकच असला तरी सांस्कृतिकदृष्ट्या वेगळे असणारे शिया, सुन्नी, कुर्द, अहमदीया, तसे पाहिले, तर मुस्लीम धर्मातील सर्वच पंथ एकमेकांच्या विरोधात हिंसक बनतात. स्वत: साम्यवादी बाथ पक्षाच्या विचारधारेशी बांधून घेतलेल्या सद्दाम हुसेनने निरंकुश सत्ता मिळताच इराकमध्ये शिया आणि कुर्द यांचे शिरकाण केले. पॅट्रिक कोलबर्न हा अनेक वर्षे इराकमध्ये वार्ताहर होता. त्याने लिहिलेल्या "Muqtada: Muqtada AlASadr' या इराकी शिया धर्मगुरू वरील पुस्तकात या सामूहिक हिंसाचाराची नोंद केली आहे.



हुसेनने शियांचे पवित्रस्थळ करबलावर कब्जा करताना आत्यंतिक हिंसाचार केला. कोलबर्न लिहितो, ''All (Shia) men of military age were in danger. Shia were killedsimply because they were Shia. Colonel Othman estimated that १,५०,००० Shia were killed in Iraq during the intifada. Then in May २००३, mass graves containing bodies of thousands of people killed at the end of uprising were found around Al-Hilla and Al-Mahavil (P. ७२). The aim, if these mass killings had a rational motive, was to terrorize the Shia population of Iraq by inflicting on them a collective punishment so bloody that they would never rise again. (P. ७६). तसेच, सद्दामने कुर्द लोकांच्या सामूहिक हत्येत १ लाख, ८० हजार कुर्दांची हत्या १९८८-१९८९ दरम्यान केल्याचे कोलबर्न नोंदवतो.


या उलट परिस्थिती भारतात होती. शिया मुस्लिमांचा बालेकिल्ला असलेल्या लखनौमध्ये पूर्वी मोहरम दरम्यान शिया-सुन्नी दंगली होत असत. अटलबिहारीजी पंतप्रधान असताना १९९७-९८च्या दरम्यान पुढाकार घेऊन त्यांनी मिरवणूक मार्गाबाबत समेट घडवून आणून, त्या रक्तरंजित सांस्कृतिक दहशतवादाला आळा घातला. त्यानंतर लखनौत शिया-सुन्नी दंगली झाल्याचे वृत्त नाही. सद्दाम हुसेनच्या सांस्कृतिक दहशतवादाच्या संदर्भात ‘उम्मा’च्या (मुस्लीम भ्रातृभावाच्या) मृगजळाने भारलेल्या- भारतीय मुस्लीम समाजात काय प्रतिक्रिया होती? आपल्या नवजात मुलांची नावे भारतीय मुस्लीम ‘सद्दाम’ ठेवत होते.




दहशतवाद



पुढे जाऊन सद्दामचा पाडाव झाल्यावर शिया आणि कुर्द शिरजोर झाले. त्यांनी अत्याचारांचा वचपा काढला.How do wars end?: That's the question Obama faces as Iraq plunges into sectarian violence (Indian Express, Jun १७, २०१४). ‘इसिस’ने जे हत्यासत्र चालवले होते, त्याची भयानक वर्णने मागच्या दशकात आपण वाचली आहेत. त्याचे परिणाम मध्यपूर्वेतील मुस्लीम समाज सांस्कृतिक दहशतवादाला बळी पडण्यात झाले. मध्यपूर्व, अफगाणिस्तान, सोमालिया, येमेन इ. देशांमधून लाखोंच्या संख्येने मुस्लीम प्राणांची पर्वा न करता युरोपातील देशांमधून घुसखोरी करू लागले; आताही करत आहेत. एकूणच मुस्लीम समाज धर्मांतर्गत सांस्कृतिक दहशतीचा बळी आहे.



‘इसिस’ला तरुण भारतीय मुस्लिमांनी जाऊन मिळावे यासाठी मराठी मुलखातील मुल्ला काम करत होते. मुंब्र्यात एका मुस्लीम कुटुंबाने तक्रार केल्यावर अशा मुल्लाला अटक करण्यात आली होती. या सांस्कृतिक दहशतवादाविरोधात मराठी मुस्लीम साहित्यिकांनी कुठेतरी निषेध नोंदवला? त्या विरोधात मोर्चा काढला? असे वाचनात नाही. रोहिंग्यांना पाठिंबा देण्यासाठी काढलेल्या मुंबईच्या हुतात्मा चौकातील मोर्चात दंगल घडवून आणली. त्यावेळी हुतात्मा स्मारकावर लाथ मारणार्‍या उद्दाम मुस्लीम तरुणाचे छायाचित्र प्रसिद्ध झाले होते. या इस्लामांतर्गत सांस्कृतिक दहशतवादावर अखिल भारतीय मुस्लीम साहित्य संमेलनात चर्चा होईल का? की तेथे हजेरी लावणारे साहित्यिक भीतीने तो विषयच दुर्लक्षित करतील? मला तीच शक्यता जास्त वाटते.



पसमंदा संमेलन



पसमंदांना धरून निशाणा


भाजपने पसमंदांविरोधात इस्लामांतर्गत सांस्कृतिक दहशतवादाचा मुद्दा उचलून धरल्यावर उच्चभ्रू मुस्लिमांना आणि सेक्युलॅरिस्टांना खडबडून जाग आली. त्यात साम्यवादी सेक्युलॅरिस्टांच्या मुखंड रोमिला थापर यांचा समावेश आहे. जामिया मिलियामधील शेख मुजीबुर रेहमान या प्राध्यापकाच्या ‘द हिंदू’मधील लेखाचे शीर्षक, ‘"Hindu Right's ploy to win over Muslims' आहे. त्याने एक महत्त्वाचे विधान केले आहे: In a recent discussion in New Delhi, historian RomilaThapar suggested that Ambedker should have spoken more forcefully about the castes among Muslims. In a recent discussion in New Delhi, historian RomilaThapar suggested that Ambedker should have spoken more forcefully about the castes among Muslims.


पसमंदावर लेख लिहिणारा हा शहाणा 'Muslim Homeneity' चे तारे तोडतो. अशा वेळी रोमिला थापर आणि त्यांच्या रांगेत बसणार्‍या रामशरण शर्मा, महाराष्ट्रातील शरद पाटील किंवा आ. ह. साळुंखेसारख्या विद्वानांनी हिंदू धर्मावर तोंडसुख घेण्याव्यतिरिक्त काय केले, हा प्रश्न मी विचारतो. त्या महापुरुषांवर दुगाण्या झाडताना गेली ६०-७० वर्षे ही पुरोगामी मंडळी इस्लामी सांस्कृतिक दहशतवादावर मूग गिळून का बसली? आताही औरंगजेबावर संतत्त्वाचा आरोप करणारे राजकारणी महाराष्ट्रात आहेत.



दुसरा महत्त्वाचा प्रश्न सर्व मुस्लाम ‘उम्मा’पुढे आहे. चीन उघूर मुस्लिमांवर सांस्कृतिक दहशतवाद आणि वंशच्छेदाची कुर्‍हाड चालवतो आहे. हजारो मशिदी नष्ट करून त्या ठिकाणी शौचालये उभारतो आहे. त्या विरोधात सौदी अरब, आखाती देश, पाकिस्तान, तालिबान आणि भारतीय मुस्लीम एक शब्द बोलायला तयार नाहीत. रोहिंग्यांना कळवळा दाखवत हिंसक निदर्शने करणारे मुंबईतील मुस्लीम शेपूट घालून बसले? ज्या उघूर मुस्लिमांनी तालिबान्यांकडून लढण्यात पुढाकार घेतला होता, त्या बेईमान तालिबान्यांनी चीनकडे आपली राष्ट्रीय साधनसंपत्ती गहाण टाकून उघूरांना वार्‍यावर सोडले आहे. व्वारे उम्मा!


संमेलनाचे अध्यक्ष अब्दुल कादर मुकादमांनी इस्लाममध्ये ‘इज्तेहाद’ -धार्मिक विश्लेषण परंपरा दोन-तीन शतके चालल्याचे नमूद केले आहे (इस्लाम ज्ञात आणि अज्ञात पृ. १३४). ती परंपरा पुन्हा सुरू करण्याचे धाडस मुस्लीम मराठी साहित्यिक दाखवतील? हिंदूंची जळजळीत प्रतिक्रिया होण्याची अजिबात शक्यता नसल्याने आता होऊ घातलेल्या ‘साहित्य आणि सांस्कृतिक दहशतवाद’ परिसंवादात मुस्लीम साहित्यिक वरील प्रश्नांवर चर्चा करणार की मूग गिळून अस्तित्वात नसलेल्या हिंदू सांस्कृतिक दहशतवादावरगरळ ओकत बसणार?





-डॉ. प्रमोद पाठक



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121