मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वाचा पुन्हा एकदा विसर पडला आहे. यावर्षी ठाकरेंनी गणेशोत्सवासाठी दिल्या नाहीत. इतकंच काय तर दहिहंडीचाही त्यांना विसर पडला होता. बहुदा ठाकरेंवर याकूब मेमनच्या परिवाराचा दबाव होता, त्यामुळे त्यांनी शुभेच्छा दिल्या नसाव्यात. ठाकरेंनी याकूबच्या कबरीला मजार बनवायला मदत केली पण त्यांना दहीहंडी आणि गणेशोत्सवाचा मात्र विसर पडला,' अशी टीका भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केली आहे. शनिवारी सकाळी आपल्या अधिकृत ट्विटरवरून त्यांनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
फडणवीस - शिंदेंचे आभार
आपल्या ट्विटमध्ये मोहित कंबोज यांनी मुखमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री - गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. 'अडीच वर्षांनंतर महाराष्ट्रातील हिंदूंनी उत्साहाने दहीहंडी आणि गणेशोत्सवाचा सण साजरा केला. हिंदूंना हे सण साजरे करायला परवानगी दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून आभार मानतो.' असे कंबोज यांनी म्हटले आहे.
ठाकरेंना याकूब से प्यार होरया
उद्धव ठाकरेंवर बहुदा हिंदुत्वापेक्षा याकूबच्या परिवाराचा दबाव जास्त होता. कदाचित त्यामुळेच त्याच्या कबरीला मजार बनविण्यासाठी खुलेपणाने मदत करणाऱ्या ठाकरेंनी गणपती आगमन किंवा विसर्जनाचे एकही ट्विट केले नाही. म्हणून आता जनता गणपति बप्पा मोरया म्हणत आहे, तर ठाकरेंची स्थिती याकूब से प्यार होरया अशी झाली आहे.'