स्थानांतर केलेल्या प्रवाळांचे नेमके काय झाले?

    03-Aug-2022
Total Views |

maha
 
 
 
 
मुंबई: मुंबईच्या किनाऱ्या लागत साकार होत असलेल्या 'कोस्टल रोड'च्या बांधकामामुळे बाधित होऊ घातलेल्या समुद्री प्रवाळांचे २०२० सालच्या नोव्हेंबर महिन्यात स्थलांतर करण्यात आले होते. फाॅल्स पिलो आणि इतर सहा प्रजातींचे स्थलांतरण यावेळी करण्यात आले होते. राष्ट्रीय समुद्रीविज्ञान संस्थेने वरळी आणि कुलाबा येथील नेव्ही नगर परिसरात हे स्थलांतर केले होते.
 
 
नुकतेच हाजी अली परिसरात 'फाॅल्स पिलो' प्रवाळ काही सागरी जीव प्रेमींना आढळून आले आहे. ही चांगली बातमी असल्याचे सांगण्यात येत आहे. कोस्टल रोडचे काम चालू असूनही हे प्रवाळ वाढतायत ही आनंदाची बाब आहे असे 'मरीन लाईफ ऑफ मुंबई'चे प्रदीप पाताडे म्हणाले. परंतु, इतर स्थलांतरित प्रवाळांचे काय झाले असा प्रश्न उपस्थित होत आहे.
 

हाजी अली परिसरातून कुलाबा नेव्ही नगर येथे स्थलांतरित झालेल्या ३२९ जिवंत कोरल वसाहतींपैकी ३०३ वसाहती (एकूण ९२%) सुदृढ आढळल्या. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीच्या संशोधकांनी प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, एका वर्षानंतरही हे प्रवाळ निरोगी अवस्थेत आहेत. परंतु, याबद्दल शोध निबंध प्रकाशित करण्यात आला, पण तो सर्व सामन्य नागरिकांपर्यंत पोहोचला नसल्याची खंत समुद्री वन्यजीव प्रेमींनी केली आहे.
 
 
प्रवाळ म्हणजे काय?
 
कोरल, म्हणजेच हे प्रवाळ मूलतः वनस्पतींची वैशिष्ट्ये प्रदर्शित करणारे जीव आहेत. परंतु, शास्त्रीय माहितीनुसार ते समुद्री प्राणी आणि जेलीफिशचे नातेवाईक आहेत. त्यातील कोरल पॉलीप्स हे लहान, मऊ शरीराचे जीव असतात. कोरल रीफ हे पाण्याखालील शहरांसारखे आहेत. आणि सागरी जीवनाला आधार देतात. प्रवाळ खडक समुद्र आणि किनारपट्टी दरम्यान लाटांचा प्रभाव रोखण्यास देखील मदत करतात. यामुळे ते किनारपट्टीची धूप कमी करतात. संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण कार्यक्रमानुसार, हे प्रवाळ 'कोरल' किमान अर्धा अब्ज लोकांना अन्न सुरक्षा आणि उपजीविका प्रदान करतात.
 

 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121