स्वीगीची कर्मचारीस्नेही 'मूनलाईट पॉलिसी'

    03-Aug-2022
Total Views | 79

swiggy
 
 
मुंबई : देशातील फूड डिलिव्हरी क्षेत्रातील आघाडीची कंपनी असणाऱ्या स्वीगीने आपल्या कर्मचाऱ्यांकरिता एका नव्या योजनेची बुधवारी घोषणा केली. या योजनेला 'मूनलाईट पॉलिसी' असे नाव त्यांनी दिले आहे. कर्मचाऱ्यांना स्वतःच्या व्यक्तिमत्व विकास, छंद, आवडीनिवडी या सगळ्या गोष्टींवर काम करता यावे, रोजच्या कामाच्या दगदगीतून त्यांच्या आवडीचे काम त्यांना करण्याची परवानगी या योजनेतंर्गत कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे. अशा प्रकारची योजना आणणारी स्वीगी ही देशातील पहिली कंपनी ठरली आहे.
 
या योजनेनुसार स्वीगीचे कर्मचारी त्यांचे ऑफिसचे कामाचे तास संपल्यावर, सुट्टीची दिवशी कुठल्याही स्वयंसेवी संस्था, सोशल मीडियावर काम करणाऱ्या संस्था या संस्थांमध्ये काम करण्याची मुभा त्यांना राहील. आपल्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या रोजच्या कामाबरोबरच त्यांच्या स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासाकडेही लक्ष द्यावे, त्यांनाही त्यांना आनंद वाटेल असे काम करता यावे असाच या योजनेचा उद्देश आहे.
कोरोना टाळेबंदीने आर्थिक चक्र थांबवले होते, पण याच काळाची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कित्येक लोकांना स्वतःसाठी प्रथमच इतका वेळ देणे शक्य झाले होते. स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासासाठी आपल्याला स्वतःला वेळ देणे आपल्या आवडीनिवडी, छंद या सर्वच गोष्टींना वेळ देणे महत्वाचे आहे हे कोरोना काळाने सर्वांच्याच लक्षात आणून दिले. त्यामुळे बरीच जणांनी हा काळ आपल्याला स्वतःसाठी वेळ देण्यात घालवला. याच परिस्थितीने जवळपास प्रत्येक क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या गरजा, त्यांचा व्यक्तिमत्व विकास यांचाही आपल्या योजनांमध्ये समावेश करणे गरजेचे ठरले. यानुसार जगभरातील अनेक कंपन्यांनी आता त्यांची धोरणे कर्मचारीस्नेही बनवण्यास सुरुवात केली आहे.
 
कोरोना काळातही स्वीगी कंपनीने कर्मचाऱ्यांसाठी काही विशेष योजना लागू केल्या होत्या. कर्मचाऱ्यांना त्यांच्या उपलब्धतेनुसार काम करता यावे यासाठी 'वर्क फ्रॉम आणि व्हेअर' ही योजना त्यांनी आणली होती. कर्मचाऱ्यांसाठीच्या या योजनांचा खूप फायदा झाला होता. कर्मचाऱ्यांच्या गरजेनुसार आखलेल्या या योजनांचा कंपनीला त्याही काळात खूप फायदा झाला होता.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
पंतप्रधान मोदींमुळे भारताची जगातील प्रतिष्ठा वाढली

पंतप्रधान मोदींमुळे भारताची जगातील प्रतिष्ठा वाढली

“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत हे जागतिक स्तरावरील एक आगळे समीकरण झाले असून, मोदी सरकारच्या कारकिर्दीमुळे भारताची जगातील प्रतिष्ठा वाढली आहे. गेल्या ११ वर्षांत मोदी सरकारच्या विविध योजनांमुळे देशातील गरीब, महिला, युवक, दलित, वंचित आणि समाजाच्या सर्व स्तरांतील जनतेच्या जीवनात आमूलाग्र बदल झाला. देशाला अभूतपूर्व प्रतिष्ठा प्राप्त करून दिल्याबद्दल मी मोदी सरकारचे आणि व्यक्तिशः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करतो व आभारही मानतो”, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोदी सरकारच्या तिसऱ्या ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121