"जांबोरी मैदान तो झाकी है, अभी बहुत कुछ बाकी है!"

आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना टोला

    17-Aug-2022
Total Views |

ashish
 
मुंबई : "आदित्य ठाकरे हे मुळात भाजपच्या सहाय्यानेच निवडून आले आहेत त्यामुळे त्यांनी कुठलेही विधान करताना जरा अभ्यास करून ते करावे तेच त्यांच्याaसाठी चांगले आहे" असा टोला लगावत भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरेंनी लक्षात ठेवावे की जांबोरी मैदान तो झांकी हे, अभी बहुत कुछ बाकी है असा इशाराही दिला आहे. येत्या दहीहंडी उत्सवात भाजप संपूर्ण मुंबई दणाणून सोडणार असेच शेलारांनी सांगितले आहे.
 
 
शिंदे गटाला गद्दार म्हणणारे आदित्य ठाकरे हेच स्वतः फसवे आहेत, त्यांनी निवडणुकीत मते मागितली नरेंद्र मोदींच्या नावाने पण जेव्हा वेळ आली तेव्हा फक्त सत्तेसाठी सोनिया गांधी, शरद पवार यांच्याशी घरोबा केला तेव्हा त्यांनी आम्हांला शिकवू नये अशा शब्दांत आशिष शेलारांनी आदित्य यांच्या वक्तव्यांवर प्रतिहल्ला चढवला. भाजपने मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी कितीतरी आधीच तयारी सुरु केली आहे, दहीहंडी उत्सव हा त्यातील एक टप्पा आहे, त्यामुळे भाजपची जोरदार तयारी सुरु आहे.
 
 
आदित्य ठाकरे यांच्याकडून फडणवीस - शिंदे सरकारवर होणारे आरोप हा स्वतःची हतबलता लपवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. ते एकनाथ शिंदे यांच्याबद्दल जी भाषा वापरत आहेत त्यांनी तशी ती वापरू नये, आदित्य यांची राजकारणाची समज कमी असल्याने त्यांच्याकडून अशी वक्तव्ये होत आहेत त्यामुळे त्यांनी आधी महाराष्ट्राच्या राजकारणाचा अभ्यास करावा म्हणजे त्यांना कोणाबद्दल कसे बोलायचे याचे ज्ञान होईल असा सल्लाही आशिष शेलारांनी आदित्य यांना दिला.