हर घर तिरंग्यासाठी घर कुठं आहे, असा प्रश्न विचारणाऱ्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेना सवाल : तुम्ही या मराठी मुंबईकरांना पर्यायी घरं केव्हा देतायं? मराठी माणसांना स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीही अश्रू पुसायला लावणाऱ्या मुंबई महापालिका प्रशासनाला ठाकरे जाब विचारणार का? ३०-४० वर्षे मुंबईत राहणाऱ्यालाही पक्की घरं का मिळाली नाहीत? घाणीच्या साम्राज्यात आमचं आयुष्य गेलं पण मुलाबाळांच्या नशिबी असले भोग नको, असा टाहो या माऊलीनं फोडला...