डोंबिवली : डोंबिवलीतील पीएनटी कॉलनीतील होली एजंल्स या शाळेतील दीक्षा सुरेंद्र सुवर्णा या विद्यार्थिनीने सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परिक्षेत 99. 60 टक्के गुण मिळवून महाराष्ट्रात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. तसेच ती सीबीएसई बोर्डाची देखील टॉपर ठरली असल्याची माहिती शाळेचे संचालक ओमन डेव्हीड यांनी दिली आहे.
दीक्षाच्या यशाने शाळेची मान उंचविली आहे. त्यामुळेच मंगळवारी शाळेत एका कौतुक सोहळ्य़ाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेतून यंदा सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परिक्षेला 149 विद्यार्थी बसले होते. त्यात शाळेतील 21 विदयाथ्र्याना 92 टक्क्यांहून अधिक गुण मिळालेले आहेत. त्या विद्याथ्र्याचा ही सत्कार करण्यात आला. त्यामध्ये 97.80 टक्के गुण मिळवून द्वितीय येण्याचा मान मिळविलेली अनुश्री मनिष खिशती व 97 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकविणा:या रुचिता विनय दीक्षित यांना गौरविण्यात आले. दहावीच्या विद्याथ्र्याना शिकविणा:या नेहा कामत, मेरी बोबन, अनिता सोनावणे या शिक्षकांचा ही गौरव करण्यात आला. या सत्कार सोहळ्य़ाला होली एजंल्स संस्थेचे अध्यक्ष डॉ. ओमेन डेव्हीड, प्रिन्सिपल बिजॉय ओमेन, मॅनेजिंग ट्रस्टी लीला ओमेन व मुख्याध्यापिका रफत शेख उपस्थित होते.
दीक्षा सुवर्णा या विद्यार्थीनीने 99.60 टक्के गुण मिळविल्याने होली एंजल्स संस्थेसाठी तसेच संस्थेतील सर्व शिक्षकांसाठी गौरवास्पद बाब आहे. दीक्षा ही अत्यंत शांत व अभ्यासू वृत्तीची आहे. तिच्याकडे अभ्यासास पूरक असे सारे गुण आहेत असे ओमन डेव्हीड यांनी सांगितले.
दीक्षाने सुरूवातीपासूनच अभ्यासाला सुरूवात केली होती. सुरूवातीला चार ते पाच तास ती अभ्यास करीत होती. परिक्षा जवळ आल्यावर तिने अभ्यासाचे तास वाढविले. व वेळेचे नियोजन सुध्दा केले. प्रश्नपात्रिका सोडविण्याचा सराव देखील तिने केला. अभ्यासाचे टाईमटेबल केले. परिक्षा जवळ आल्यानंतर तिने प्रश्नपात्रिका सोडविण्याचा केलेल्या सरावातून तिला प्रेङोंटशन कसे करायचे हे समजले. गणित हा विषय तिला कठीण जात होता. त्यासाठी तिने वेगवेगळ्य़ा पध्दतीने गणिते सोडविण्याचा देखील सराव केला होता. दीक्षाला आता मेडिकलला जायचे आहे. तिची आई रोहिणी बॅक मॅनेजर असून वडील सुरेंद्र हे सल्लागार म्हणून काम करतात.दीक्षा कथ्थक नृत्य व चित्रकलेची आवड आहे. आपल्या यशात शाळेचा, आई वडीलाचा, शिक्षकांचा मोठा वाटा आहे असे दीक्षा सांगते.
बिजॉय ओमेन यांनी सांगितले, विद्याथ्र्याच्या यशामागे आईवडील, शिक्षण संस्था, शिक्षक या सगळ्य़ांचाच मोठा वाटा असतो. होली एजंल्सने नेहमीच गुणी विद्याथ्र्याना प्रोत्साहन देऊन त्यांना योग्य मार्गदर्शन केले आहे. त्यामुळेच संस्थेतून बाहेर पडणारे अनेक विद्यार्थी वेगवेगळ्य़ा क्षेत्रात मोठय़ा पदावर कार्यरत आहेत.
------------------------------------------------------------