पारितोषिक विजेत्या चित्रपटांचा हुकमी संकलक

    26-Jul-2022
Total Views | 40

nielsh
 
 
मुंबई : ‘लेखकाच्या आणि ‘संकलकाच्या टेबलवर’ चित्रपट खऱ्या अर्थाने घडतो असं म्हणतात. चित्रपट चांगला होण्यात महत्त्वाचा वाटा संकलकाचाही असतो. संकलन म्हणजे केवळ तांत्रिक प्रक्रिया असा अनेकांचा समज असतो. मात्र संकलकाकडे सर्जनशीलता असणे गरजेचे असते. याच सर्जनशीलतेच्या जोरावर संकलक निलेश गावंड यांनी चित्रपटसृष्टीत आपला वेगळा ठसा उमटवला आहे. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पुरस्कारांमध्ये त्यांनी संकलित केलेल्या अनेक चित्रपटांनी बाजी मारली आहे. त्यांनी संकलित केलेल्या चित्रपटांच्या यशाचा हा प्रवास नक्कीच कौतुकास्पद आहे.
 
 
 
‘श्वास’ चित्रपटाच्या वेळी ‘सह-संकलक’ म्हणून सुरु झालेला हा प्रवास नुकत्याच जाहीर झालेल्या ‘फनरल’ चित्रपटाच्या राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत सातत्याने सुरु आहे. श्वास, बाबांची शाळा, धग, भोंगा, फनरल या चित्रपटांना मिळालेल्या राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कारांच्या यशामध्ये निलेश गावंड यांच्या संकलनाचाही मोलाचा वाटा आहे. आपण संकलित केलेल्या चित्रपटांना सातत्याने मिळणारी यशाची पावती आपल्यासाठीही मोलाची असल्याचे ते सांगतात. नवीन काम अधिक जोमाने करण्यासाठी या पुरस्कारांमुळे प्रेरणा मिळते, असं ते सांगतात.
 
 
nielsh
 
 
निलेश गावंड आज तेवीस वर्ष संकलन क्षेत्रात आहेत. १९९९ मध्ये प्रकाश मेहरा प्रोडक्शनमधून आपल्या करिअरची सुरुवात करत अनेक मालिका, चित्रपट, डॉक्युमेंटरी, जाहिराती त्यांनी संकलित केल्या. ५०हून अधिक नावाजलेल्या दिग्दर्शकांसोबत त्यांनी आजवर काम केले आहे. गोवा आणि गुजरात सरकारचे उत्कृष्ट संकलनासाठीचे पुरस्कार त्यांना मिळाले असून नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘रानबाज़ार’ या लोकप्रिय वेबसीरीजचं संकलनही निलेश गावंड यांनी केलं आहे.
 
 
 
सध्याच्या उत्कृष्ट संकलकांच्या यादीत निलेश गावंड यांचे नाव आवर्जून घेतले जाते. संकलनाच्या कलेविषयी ते म्हणतात, ‘संकलन म्हणजे दर दिवशी एक वेगळं आव्हान असतं. संकलन हे खूप जिकीरीचं, वेळखाऊ, किचकट आणि पेशन्सचंही काम आहे. या कामावर माझी निष्ठा आहे, यामुळेच मी यात संपूर्णपणे समरस झालो आहे. माझ्यासाठी हे क्षेत्र अगदी आवडीचं आहे. राष्ट्रीय आणि राज्य पुरस्कारांमध्ये मी संकलित केलेल्या चित्रपटांना मिळालेलं यश मला समाधान देणारं असलं तरी संकलनाच्या माझ्या या प्रवासात मला अजून मोठा पल्ला गाठायचा आहे,' असे ते नम्रपणे सांगतात.
अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121