अडीच वर्षे संपत्ती झाली आता पुढची अडीच वर्षे सिम्पथी!

उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर मनसे नेते संदीप देशपांडेंची प्रतिक्रीया

    26-Jul-2022
Total Views |
sandeep deshpande 
 
 
 
 
 
मुंबई : शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीनंतर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. "अडीच वर्ष संपत्ती कमावली आता अडीच वर्ष सिम्पथी कमवत आहे." अश्या शब्दांत देशपांडेंनी टीका केली आहे. उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर सगळा घरचा मामला म्हणत निशाना साधला आहे.
 
 
"आजची मुलाखत मला तरी आवडली नाही. आपलेच प्रश्न, आपलीच उत्तरे, सगळा आपला घरचा मामला होता. पाळापाचोळा काय, खंजीर काय आता त्याचेही लोकांना आपरुप राहिलेल नाही. हाच पालापाचोळा अडीच वर्ष सोबत होता तेव्हा चांगला होता. संपुर्ण मुलाखत बघितली अडीच वर्ष संपत्ती कमावली आता अडीच वर्ष सहानभुती कमवत आहेत." अश्या शब्दांत देशपांडेनी टीका केली.
 
 
 
 
 
"नियतीचे चक्र फिरत असत, जेव्हा तुम्ही मनसेचे 6 नगरसेवक फोडले तेव्हा सर्जिकल स्टाईक म्हणुन बोलत होता. आता तुमचे आमदार फुटले तर आता तुम्हाला सहानभुती पाहिजे का. बाळासाहेबांचे नाव कोणी वापरु नये, असं म्हणतात जेव्हा बाळासाहेबांचे स्मारक बांधायचं होत तेव्हा महापौर बंगला पाहिजे होता तेव्हा ते संपुर्ण महाराष्ट्राचे होते. मग आता तुमच्या एकट्याचे कसे झाले?" असा सवाल यावेळी उपस्थित केला.
 
 
"कोरोना काळात रुग्णालयात बेड मिळत नव्हता. अम्बुलस मिळतं नव्हती अनेकांचे हाल झाले. आता बेस्ट सीएमचा म्हणवुन घेताना कसलं आलं कौतुक? अडीच वर्ष घरात बसुन होता. हा सर्वे कोणत्या संस्थेंने केला या आधी यांनी कोणता सर्वे त्यांनी केला बेस्ट सीएम यानंतर कोणता सर्वे झाला बोगस संस्था उभारायच्या आपणंच स्वताला बेस्ट सीएम म्हणवायचं ही कोणती पद्धत चालवली?" अश्या शब्दांत उद्धव ठाकरेंवर संदीप देशपांडेनी टीका केली.