०९ जून २०२५
कसारा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या लोकल ट्रेनमधून प्रवास करत असलेले ६ प्रवासी खाली पडून त्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मध्य रेल्वेच्या दिवा ते कोपर रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे...
०८ जून २०२५
- पुराव्यांसह खोडून काढले सर्व आरोप - ज्या 3 वृत्तपत्रांत राहुल गांधींचे लेख आले, त्याच 3 वृत्तपत्रांत फडणवीसांचेही लेख - लेखाची सुरुवात गडचिरोली दौर्यापासून..
०७ जून २०२५
मुंबईतील अनेक भागांत मुसळधार पाऊस बरसला असून पुढील ३ ते ४ तास वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच पुढच्या काही तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे...
०५ जून २०२५
मुंबई विद्यापीठाच्या हिंदू अध्ययन केंद्रातर्फे २०२५-२०२६ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पारंपरिक हिंदू विचार, संस्कृती, संगीत आणि मंदिर व्यवस्थापन यांसारख्या विषयांत गाढा अभ्यास करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही ..
०४ जून २०२५
पहिल्या पावसात मुंबई पाण्यात गेली आणि नालेसफाईचा फुगा पुन्हा फुटला. चौफेर टीका झाल्यानंतर खडबडून जागे झालेल्या पालिका प्रशासनाने युद्धपातळीवर गाळ उपसा सुरू करत, बुधवारअखेर ८२.३१ टक्के गाळ उपसल्याचा दावा केला आहे...
०३ जून २०२५
डोंबिवली एमआयडीसी निवासी मधील एव्हरग्रीन सायकल प्रेमी ग्रुप तर्फे आयोजित करण्यात आलेल्या सायकल फेरीत पर्यावरण आणि आरोग्य या विषयी जनजागृती करण्यात आली...
मुंबई महापालिकेतील एकूण २२७ वॉर्डांपैकी अनुसूचित जातींसाठी केवळ १३ वॉर्ड राखीव आहेत. ही संख्या इतर महानगरपालिकांच्या तुलनेत लक्षणीयरीत्या कमी असल्याने, आरक्षणातील तफावत दूर करण्याची गरज समता परिषदेचे संस्थापक आणि माजी मंत्री विजय (भाई) गिरकर यांनी ..
कोणत्याही मूलभूत गरजेइतकीच वीजही आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनली आहे. जीवन सुखकर बनवण्यासाठी ज्याप्रमाणे आपल्याला विजेचा फायदा होऊ शकतो, त्याचप्रमाणे ती वापरताना योग्य काळजी घेतली नाही, तर विद्युत अपघात घडून नुकसान होऊ शकते. सर्वांनी सुरक्षिततेचे ..
कल्याणकडे जाणाऱ्या मुंबई लोकलमध्ये बोकड घेऊन प्रवास करणारा प्रवासी आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. ही घटना कुर्ला स्थानकावरून सुरू झाल्याने, या स्थानकावरील अराजकता, प्रचंड गर्दी, फेरीवाल्यांचा वावर आणि रेल्वे प्रशासनाची ..
कीर्तनातून रंजन करता-करता डोळ्यांत अंजन घालण्याची किमया कीर्तनकार पार पाडीत असतात. आपल्या कृतीतून,वाणीतून समाजमनावर सकारात्मक संस्कार करण्याचं काम सातत्याने कीर्तनकार करीत असतात...
2011-12 साली भारतात अत्यंत गरिबीचा दर 27.1 टक्के इतका होता, तो आता केवळ 5.3 टक्के इतकाच आहे. केंद्र सरकारच्या धोरण सातत्याचा हा सकारात्मक परिणाम. सर्वसमावेशक आर्थिक विकास, थेट लाभ हस्तांतरण, गरिबांना संधी देणे यांवर प्रामुख्याने केंद्र सरकारने जे ..
०६ जून २०२५
शरणागती कशाला म्हणतात, त्याची असंख्य उदाहरणे काँग्रेसनेच देशासमोर ठेवलेली आहेत. बांगलादेशच्या युद्धात पाकिस्तानचे विभाजन करूनही पाकव्याप्त काश्मीर आणि भारताचे युद्धकैदी इंदिरा गांधी यांना परत मिळविता आले नाहीत. उलट, पाकिस्तानचा जिंकलेला भूभाग आणि ..
‘आंतरराष्ट्रीय नाणेनिधी’नेही व्यापारयुद्धाचा धोका काल प्रकर्षाने अधोरेखित केला. अमेरिकेच्या आयातशुल्क धोरणामुळे संपूर्ण जगावर हे व्यापारयुद्ध लादले गेले असून, त्याचे परिणाम हे ‘कोविड-19’ महामारीपेक्षा अधिक परिणामकारक असतील. त्यामुळे जगावर पुन्हा ..
केंद्रशासित प्रदेश असलेल्या लडाखमध्ये स्थानिकांना रोजगारात ८५ टक्के आरक्षण, १५ वर्षांच्या वास्तव्याचा डोमिसाईल निकष व महिलांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ३३ टक्के आरक्षणाचा निर्णय नुकताच घेण्यात आला. त्यामुळे काँग्रेसकाळात केवळ उपेक्षा सहन ..
पडघा येथील घटना ही पाकसाठी हेरगिरी करणार्या ज्या देशद्रोही प्रवृत्तींचाच एक भाग आहे, असे निश्चितपणे म्हणता येते. ‘स्लीपर सेल्स’च्या माध्यमातून देशात दहशतवादी कारवाया करण्यासाठी पाक तसेच, बांगलादेशातूनही बळ मिळते ही बाब नवीन नाही. म्हणूनच, अशा देशविघातक ..
पायाभूत सुविधांसाठी केलेली भरीव गुंतवणूक ही देशाच्या अर्थचक्राला सर्वस्वी गतिमान करण्याबरोबरच, रोजगारनिर्मितीसह अर्थव्यवस्थेलाही चालना देते. एकीकडे जगभरातील देश आर्थिक अनिश्चिततेचा सामना करत असताना, आशियाई विकास बँकेने मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ..
दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान घडलेल्या लोकल ट्रेन अपघाताच्या घटनेने सगळीकडे एकच खळबळ उडाली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. या दुर्घटनेत जवळपास ५ ते ६ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे...
(Manipur Tense Over the Arrest of Arambai Tenggol Leader) मणिपूरमध्ये पुन्हा एकदा तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून मणिपूर सातत्याने धुमसत आहे. येथील तणाव निवळण्याची चिन्हं दिसत नाही. राज्यातून हिंसाचाराच्या बातम्या वेळोवेळी येत राहतात. आता मैतेई समुदायाच्या एका प्रमुख नेत्याच्या अटकेनंतर मणिपूरमध्ये हिंसाचाराची लाट उसळली आहे. यामुळे इंफाळसह पाच जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा पाच दिवसांसाठी बंद करण्यात आली आहे. तर विष्णुपुर जिल्ह्यात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. इंफाळ पूर्व, इंफाळ..
भारतीय रेल्वेची गौरव यात्रा अंतर्गत आज पासून सुरू होणारा छत्रपती शिवाजी महाराज सर्किट हा प्रवास सर्व प्रवाशांसाठी एक प्रेरणादायी अनुभव असेल असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे छत्रपती शिवाजी महाराज सर्किट अंतर्गत भारत गौरव रेल्वेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते...
" छत्रपती संभाजी महाराजांनी एकाच वेळी अनेक आघाड्यांवर शत्रुचा बिमोड केला. छत्रपती संभाजी महाराज म्हणजे स्वराज्याची लखलखती तलवार. " असे प्रतिपादन कादंबरीकार, लेखक विश्वास पाटील यांनी केले आहे. नॅश्नल लायब्ररी वांद्रे आयोजित ' नाते जीवा शिवाचे' या कार्यक्रमात ते बोलत होते. सदर कार्यक्रमाला नॅश्नल लायब्ररीचे प्रमुख कार्यवाह प्रमोद महाडिक, मुंबई मराठी साहित्य संघाच्या साहित्य शाखेचे कार्यवाह अशोक बेंडखळे आदी मान्यवर उपस्थित होते...
अमेरिकेत लॉस एंजेलिस येथे स्थलांतरित समुदाय आणि यूएस इमिग्रेशन व कस्टम्स एन्फोर्समेंट यांच्यातील संघर्ष हिंसक वळणावर गेल्याचे निदर्शनास येते आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेले निदर्शन हाताळणे कठीण होत चालल्याने सुरक्षा कर्मचाऱ्यांनी निदर्शकांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्याचवेळी, निदर्शकांनी पोलिसांवर दगडफेक आणि फटाके फेकले. संपूर्ण परिसरात दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाली असून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वादग्रस्तपणे नॅशनल गार्ड तैनात केल्यानंतर निदर्शनांना हिंसक वळण आल्याचे समोर येते आहे. ..