कुठे मान्सूनची चाहूल तर कुठे अतिउष्णता

गोंदियामध्ये पारा ४६ अंश सेल्सिअसच्या पार

    05-Jun-2022
Total Views | 47
temp
 
मुंबई(प्रतिनिधी): रविवार दि. ०५ जून हा गोंदिया आणि ब्रम्हपुरी शहरांसाठी या हंगामातील सर्वात उष्ण दिवस होता. या शहरांमध्ये कमाल तापमान ४६.२ अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले आहे. तर नागपूर आणि वर्ध्यात कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअस इतके होते. या उलट दक्षिण कोकण, कोल्हापूर, सांगली, आणि सातारा येथे पूर्वमौसमी पावसाने हजेरी लावली आहे.
 

परंतु, या वर्षी तापमानाने कोणताही विक्रम मोडला नाही. नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, सर्वाधिक ५ जून २००३ रोजी नागपूर शहरामध्ये 47.7 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. हे जून महिन्यातले सर्वाधिक तापमान होते. ऐतिहासिक आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, नागपूरमध्ये 23 मे 2013 रोजी तत्कालीन हंगामातील सर्वाधिक तापमान 47.9 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. हवामान खात्याने शनिवारी दि. ०४ रोजी बहुतांश जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. कमाल तापमान उच्च राहण्याचा अंदाज आहे आणि १० जून नंतर त्यात किंचित घट होण्याची शक्यता आहे. सध्या विदर्भात मान्सून सुरू होण्याची कोणतीही माहिती नाही. हवामान खात्याने नागरिकांना विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.
 
उत्तरेकडून येणाऱ्या कोरडय़ा, उष्ण वाऱ्यांमुळे विदर्भासह उत्तर भारतात अनेक ठिकाणी सध्या उष्णतेची लाट असून, ती आणखी दोन दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तर नैऋत्य मान्सून दि. ६ जून रोजी कोकणच्या पश्चिम किनारपट्टीवर पोहोचेल, असे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे. नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन झाल्यानंतर चार दिवसांत संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता आहे. कोल्हापूर सांगली, सातारा या जिल्ह्यांमध्ये दि.६ जूनपर्यंत वादळ, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्याच्या शक्यतेसह ‘यलो अलर्ट’ जरी करण्यात आला आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121