मुंबईतील प्रभाग रचनेवरून शिवसेना-काँग्रेसमध्ये ठिणगी

आरक्षणावरुन काँग्रेसचा शिवसेनेवर आरोप

    02-Jun-2022
Total Views | 48

BMC
 
 
 
 
 
मुंबई : नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या मुंबई महापालिका निवडणुकांसाठीच्या आरक्षण सोडतीमुळे अनेक राजकीय दिग्गजांचे भवितव्य अडचणीत आले आहे. या आरक्षण सोडतीचा मोठा फटका बसलेल्या काँग्रेसने या सोडतीवरून आपल्याच सहयोगी पक्ष असलेल्या शिवसेनेवर आरोप केले असून, ही प्रक्रिया शिवसेनेच्या अखत्यारित असलेल्या नगरविकास खात्याच्या निर्देशांवरूनच केल्याचे म्हटले आहे. या प्रभाग पुनर्रचनेची विरोधात न्यायालयातदेखील जाण्याचा इशारा काँग्रेसने महाविकास आघाडीतील (मविआ) घटकपक्ष असलेल्या शिवसेनेला दिला आहे. या सोडतीमुळे काँग्रेसच्या २९ नगरसेवकांपैकी २१ नगरसेवकांचे प्रभाग आरक्षित झाल्याने काँग्रेसने यावर नाराजी व्यक्त केली.
 
 
 
काँग्रेसच्या आरक्षित झालेल्या प्रभागांमध्ये मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा, आसिफ झकेरिया, सुफियान वनु, कमरजहाँ सिद्दीकी या मुंबईतील काँग्रेस नगरसेवकांचे प्रभाग अडचणीत सापडले आहेत. यावरून मविआमध्ये धुसफूस सुरू होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेत काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे, तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती होण्याची शक्यता आहे.
 
 
 
शिवसेनेकडून काँग्रेसचे खच्चीकरण
 
मुंबईत शिवसेनेकडून काँग्रेसचे खच्चीकरण केले जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. प्रभाग पुर्नरचनेपाठोपाठ प्रभाग आरक्षण सोडतीतही काँग्रेसवर अन्याय आणि शिवसेनेचा फायदा झाला असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. “शिवसेनेकडून जाणीवपूर्वक मुंबईत काँग्रेसची ताकद वाढू नये, याकरिता प्रयत्न होत आहेत,” असा आरोप काँग्रेस नेते आणि माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे.
 
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121