कोकणची मुलं हुश्शार!!!

राज्याचा दहावीचा निकाल ९६.९४ टक्के, कोकण विभागाची बाजी

    18-Jun-2022
Total Views | 33

10th result 2
 
 
  
 
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे (महाराष्ट्र बोर्ड) एसएससी बोर्डाचा निकाल शुक्रवारी १७ जून रोजी जाहीर झाला. यंदा राज्याचा निकाल ९६.९४ टक्के लागला आहे. कोकण विभाग अव्वल, तर नाशिक विभागाचा सर्वात कमी निकाल लागला आहे. नऊ विभागीय मंडळांमधून कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९९.२७ टक्के, तर सर्वात कमी निकाल नाशिक विभागाचा ९५.९० टक्के लागला आहे. यावर्षी १५ लाख, ६८ हजार, ९७७ विद्यार्थ्यांकडून दहावीची परीक्षा देण्यात आली. त्यापैकी १५ लाख, २१ हजार, ००३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यावर्षी पुनर्परीक्षार्थी उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ७९.०६ टक्के इतकी आहे.
 
 
 
यंदाच्या वर्षीही मुलीच आघाडीवर
 
दरवर्षीप्रमाणे यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. यावर्षी ९७.९६ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत, तर उत्तीर्ण होणार्‍या मुलांचे प्रमाण ९६.०६ टक्के आहे. म्हणजे परीक्षा देणार्‍या मुलांपेक्षा मुली उत्तीर्ण होण्याचे प्रमाण १.९० टक्क्यांनी जास्त आहे. या परीक्षेत दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९४.४० टक्के इतके आहे. यंदाच्या वर्षी ६ लाख, ५० हजार, ७७९ विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. ५ लाख, ७० हजार, ०२७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत २ लाख, ५८ हजार, ०२७; द्वितीय श्रेणीत तर ४२ हजार, १७० मुले उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
 
 
 
१२ हजार, २१० शाळांचा निकाल १०० टक्के
 
राज्यातील १२ हजार, २१० शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. मार्च २०२०च्या तुलनेत यावर्षी निकाल १.६४ टक्के जास्त लागला आहे. २०२० मध्ये ९५.३० टक्के होता. यावेळेस तो ९६.९४ टक्के आहे. १२२ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण आहेत, तर २९ शाळांचा निकाल शून्य टक्के आहे.
 
 
 
विभागनिहाय निकाल :
 
कोकण : ९९.२७ टक्के
नागपूर : ९७ टक्के 
पुणे : ९६.९६ टक्के
मुंबई : ९६.९४ टक्के
कोल्हापूर : ९८.५० टक्के
नाशिक : ९५.९० टक्के
अमरावती : ९६.८१ टक्के
औरंगाबाद : ९६.३३ टक्के
लातूर : ९७.२७ टक्के
राज्याचा निकाल : ९६.९४ टक्के
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121