नवी दिल्ली: आर्थर डी लिटल यांच्या आव्हालानुसार, २०३० पर्यंत भारतात विकल्या जाणाऱ्या एक तृतीयांश वाहने (दुचाकी आणि तीन चाकी) इलेक्ट्रिक असणार. २०३० पर्यंत भारतात एकूण विक्री १० दशलक्ष युनिट्सचा आकडा पार करेल असेही अहवालात पुढे म्हटले आहे. जगभरात विकल्या जाणार्या प्रत्येक १० पैकी जवळपास एक ईव्ही भारतात विकली जाईल.
दुचाकी आणि तीन चाकी सेगमेंट या विक्रीत सर्वात जास्त पुढे असणार आहे, असे अपेक्षा केली जात आहे. आज, अनेक नागरिक इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करत असताना, २०३० पर्यंत हा आकडा ९५% पर्यंत पोहचू शकतो. "आम्ही इतर विभागांबद्दल सावधपणे आशावादी आहोत परंतु प्रवासी वाहनांबद्दल वाजवीपणे निराशावादी आहोत," आर्थर डी लिटलचे भारत आणि दक्षिण आशियाचे व्यवस्थापकीय भागीदार आणि सीईओ बर्निक चित्रन मैत्रा म्हणाले.