ऋणानुबंध रक्ताचे : रक्तदानाचे समृद्ध भावविश्व

    13-Jun-2022
Total Views | 141

pustak
 
 
 
 
 
एखादा अपघात, गुंतागुंतीची शस्त्रक्रिया अथवा गंभीर आजाराच्या वेळी कुशल डॉक्टर्स व अद्ययावय हॉस्पिटलची गरज असते. बहुतांश वेळा तेथे रक्ताची गरज देखील लागू शकते. बाकी उपचारांसाठी लागणारी औषधे अथवा उपकरणे जसे मेडिकल दुकानात मिळतात तसे रक्त घ्यायला मात्र रक्तपेढीतच जावे लागते. तेथील व्यवस्थेशी अनेकांचा प्रथमच संबंध येतो. तेव्हा त्यासाठी रक्ताची उपलब्धता व लागणारा वेळ लक्षात येतो.
 
 
 
चित्रपटातील क्लायमॅक्स साधण्यासाठी नायकाने अथवा चरित्रनायकाने कोणाची तरी रक्ताची गरज भागविण्यासाठी रुग्णालयात त्याला झोपवून एका नळीतून त्याचे रक्त घेऊन, दुसऱ्या नळीतून रुग्णाला दिले जाते, अशा दृश्यांनी रक्त देण्यासंबंधी गैरसमज पसरवायला जास्त मदत होते. कारण रक्तदात्याकडून रक्त घेऊन गरजू रुग्णाला देण्यापूर्वी ज्या प्रक्रिया रक्तपेढीत कराव्या लागतात त्याची माहिती सुजाण नागरिकांना असणे आवश्यक आहे.त्यामुळे रक्तदात्याचे रक्त घेऊन रूग्णाला देतांना ज्या शास्त्रीय चाचण्या आवश्यक असतात, त्याला लागणारी यंत्रणा,कुशल तांत्रिक कर्मचारी, डॉक्टर्स आवश्यक असतात.शिवाय यासाठी लागणारा वेळ आणि पैसे याची माहिती समाजात अपवादानेच असते.
 
 
नाशिकच्या जनकल्याण रक्तपेढीच्या स्थापनेपासूनच मी संबंधित असल्याने या माहितीच्या अभावाचा अनुभव मी अनेकांकडून घेतलेला घेतलेला आहे. त्या पृष्ठभूमीवर पुणे येथील जनकल्याण रक्तपेढीशी दीर्घकाळ संबंधित असलेल्या महेंद्र वाघ यांनी लिहीलेल्या “ऋणानुबंध रक्ताचे : रक्तदानाचे समृद्ध भावविश्व” या पुस्तकाने या क्षेत्रात अत्यंत उपयुक्त माहिती रंजक पद्धतीने वाचकांसमोर आणली आहे. काही नामवंत डॉक्टरांनी त्यांचे वैद्यकीय क्षेत्रातील अनुभव स्वरुपात रंजक स्वरुपातील पुस्तकाद्वारे सामान्य वाचकांपर्यन्त पोहोचवून या क्षेत्रातील गुंतागुंत,आव्हाने इत्यादीबाबत जागरूक केले आहे. रक्तपेढी विषयातील त्याच स्वरूपाचे हे पुस्तक महेंद्र वाघ यांनी लिहून मोठे काम केले आहे.
 
 
 
 
रक्तपेढी कार्य व कर्मचारी
 
 
या पुस्तकात रक्तदानासंबंधी गुणवत्ता, , हाय रिस्क डोनर, रक्तगटासंबंधी माहिती दुर्मिळ रक्तगटाची उपलब्धता व त्यासंबंधी जागरुकता रक्तगट जुळवणी, सामान्य व जलद-तातडीची मागणी याविषयी सोप्या भाषेत माहिती मिळते. रक्त व रक्त घटकांची मागणी तसेच पुरवठा,
 
 
 
एका रक्तदात्याच्या रक्तापासून तीन ते चार रुग्णांना नवजीवन मिळू शकते ही माहिती महत्वपूर्ण आहे.थॅलेसेमिया रुग्णांच्या आजाराची दाहकता,कुटुंबियांवरील मानसिक ताण व रुग्णाच्या अल्पायुष्याची टांगती तलवार, त्याविषयीचे समाजातील अज्ञान हे मन विषण्ण करणारे अनुभव त्यात आहेत. रक्तपेढीद्वारे या रुग्णांना नियमित रक्तपुरवठा मोफत केला जातो.
 
 
 
शास्त्रशुद्ध पद्धतीने रक्तपुरवठा होण्यासाठी निरोगी रक्तदाते आवश्यक असतात. तसेच या रक्त तपासणीच्या विविध शास्त्रीय चाचण्या करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रसामग्री व कुशल कर्मचारी लागतात.अन्य तांत्रिक क्षेत्रासारखेच या क्षेत्रातदेखील विविध संशोधनाच्या आधारावर आधुनिक तंत्रज्ञान, त्याची आवश्यकता,त्याची मानांकने प्राप्त करणे इत्यादि गोष्टी आपल्याला यातून कळतात. अंतिमत: त्याचे लाभ गरजू रूग्णाला मिळवून देणे हे रक्तपेढी आपले महत्वाचे कार्य समजते.
 
 
 
 
यंत्रसामग्री जशी आवश्यक असते तशी ती चालवणारे कुशल हात व बुद्धी आवश्यक असते.परंतु येथे केवळ यंत्र हाताळणे एवढेच काम नसून ज्या गरजू रूग्णाला रक्त वेळेत पोहोचवायचे आहे त्याचा विचार करावा लागतो., रक्तपिशवी घेण्यासाठी आलेले रुग्णाचे आप्तेष्ट अथवा स्नेही यांच्या अस्वस्थतेचा विचार करावा लागतो.तसेच ज्या डॉक्टर्सकडून ही मागणी आलेली आहे, त्यांचा विश्वास सार्थ ठरविणे आवश्यक असते. त्यादृष्टीने रक्तपेढी हा “socio technical project” असून त्यात काम करतांना किमान तंत्रज्ञानासह संवेदनशीलता आवश्यक असून संवाद, समुपदेशन सारखे कौशल्य आवश्यक आहे. थेट हॉस्पिटलला मागणीनुसार रक्त पोहोचवणारे रक्तदूत देखील यातील महत्वाचे घटक आहेत.तांत्रिक कर्मचार्यां च्याबरोबरीने अनेक अकुशल पण महत्वाची कामे करणार्यान “मावशी” या प्रातिनिधिक महिला कर्मचार्यांोची दखल या पुस्तकात आवर्जून घेतलेली आहे. घरातील गृहिणीप्रमाणे त्यांचे महत्व अधोरेखित केलेले आहे.
 
 
 
महिला कर्मचाऱ्यांसाठी “सुरक्षितता ते मोकळे आकाश” देणे यासाठी रक्तपेढी विशेष महत्व देते. सर्व कर्मचार्यां साठी “विचारमंच” द्वारे त्यांच्या कलागुणांना वाव देणे,औपचारिक व अनौपचारिक प्रशिक्षणाने त्यांच्यात टीमस्पिरिट ,कौशल्ये व सामुहिकता निर्माण करण्यासाठी आग्रह जाणवतो आहे.विशिष्ट कालावधीत रक्तपेढीत कमी रक्तसंकलन होत असल्याने कर्मचाऱ्यांनी आपल्या संपर्कातून नातेवाईक,मित्रपरिवार अथवा परिसरातील परिचितांना रक्तदानासाठी प्रेरीत करण्याची अभिनव कल्पना डॉ.अतुल कुलकर्णी मांडतात.


रक्तपेढी हा नोकरीचा एक भाग राहिलेला नसून तो एक समाजोपयोगी प्रकल्प आहे हे मनोमन स्वीकारलेले असल्याने कर्मचारी हे आवाहन स्वीकारतात.संबंधित कर्मचार्यानचे नातेवाईक-कुटुंबीय-मित्रपरिवार या आवाहनास प्रतिसाद देतात. त्यामुळे नोकरीतील हा जाचक भाग न वाटता संबंधित सर्वांचे गेट-टूगेदर झाल्याचा आनंद घेतात. त्यामुळेच रक्तपेढीला मिळणारा एखादा सन्मान अथवा पुरस्कार स्वीकारायला विश्वस्त,डॉक्टर,तांत्रिक कर्मचारी व मदतनीस यांचे प्रतिनिधित्व घेतले जाते.
 
 
 
प्रबोधन
 
 
रक्तदान ही एक चळवळ असून रक्तपेढीला त्यासाठी सतत कार्यरत राहावे लागते. रक्तपेढीच्या मागे भक्कम अशा शिबीर संयोजकांची फळी आवश्यक असते. वर्षात साडेतीनशे शिबिरांद्वारे वीस- बावीस हजार रक्तपिशव्या यांचे संकलन आणि तीस-बत्तीस हजार रक्त घटकांचे वितरण हा प्रचंड व्याप रक्तपेढीच्या 24 X 7 कार्याचा आवाका लक्षात आणून देतो. त्यामुळे या सेवाभावी मंडळे-समूह-संघटना यांच्याशी सतत संपर्क ठेवणे, नवीन व्यक्ति व समूहांना रक्तदानासाठी प्रवृत्त करणे यासाठी सतत प्रबोधन करावे लागते.
 
 
 
रुग्णाची गरज हा एखाद्यासाठी व्यवहार त्यातील नफा कमावणे असा समज हा रक्तदान चळवळीतील “व्हायरस”असल्याचे लेखकाला खेदाने म्हणावे लागते. पुढार्यांाच्या वाढदिवस अथवा आणि विशेष प्रसंगी महारक्तदान शिबिरे आयोजित केली जातात.मात्र त्यात रक्तदान करणार्याषस एखादी भेटवस्तू देण्याने त्यातील “दान” भाव निघून जातो. त्यातील कर्तव्य अथवा समर्पण भाव जागविणे हा देखील प्रबोधनाचा विषय आहे. ज्या रुग्णालयांमध्ये रूग्णाला रक्त पुरवठा केला जातो तेथे देखील परिचारिका आणि निवासी डॉक्टरांसाठी सुरक्षित रक्तसंक्रमणसंबंधी प्रबोधन करावे लागते.
 
 
 
 
सेवाव्रती कार्यकर्ते
 
 
शिबीर संयोजक,रक्तदाते,रक्त घ्यायला येणारे,रक्तपेढीचे कर्मचारी या सर्वांना जोडणार्याय निरपेक्ष सेवाव्रती वानप्रस्थी कार्यकर्त्यांची आवश्यकता असते. यातील अशा काही कार्यकर्त्यांच्या उल्लेखाने त्यांच्याविषयी कृतज्ञता जशी व्यक्त होते तशीच अनेकांना यासाठी प्रेरणा देऊ शकते. प्रासंगिक महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये रक्तपेढी कर्मचाऱ्यांना सहाय्य करणे मिळण्यासाठी,स्वत:च्या व्यवसाय अथवा नोकरी सांभाळून सुटीतील काही नियमित वेळ या कामासाठी देणारे स्त्री-पुरुष कार्यकर्ते देखील कामकाजात मदत करू शकतात.असे अनेक सेवाभावी कार्यकर्ते या प्रकल्पाला समर्थ करीत असतात.
 
 
 
 
समाजाचा प्रतिसाद
 
 
स्वतःची क्षमता असून मोफत रक्तपिशवी मागणारे तथाकथित नेते व कार्यकर्ते यांचा अनुभव येतो. मात्र सामान्य परिस्थितीतील माणूस कर्तव्य म्हणून रक्तदान करतो तसेच आर्थिक सवलतीची गरज असून देखील रक्तपिशवी घेतांना उर्वरित रक्कम नंतर देण्यासंबंधी विनंती करतात तेव्हा सामान्यातील असामान्यत्वचे दर्शन हा समाज पुरुषावरील विश्वास व्यक्त करणारा अनुभव आहे. संघकार्यासाठी पूर्णवेळ प्रचारक निघालेल्या बंधूंच्या उपचारासाठी लागणाऱ्या रक्त पिशवीचे पैसे रक्तपेढीने न घेतल्यामुळे कालांतराने तेवढ्याच देणगीचा धनादेश पाठवणार्यात बंधूंच्या अंनुभवातून कुटुंबातील एका व्यक्तीचे पूर्ण समर्पण झालेले असतांना देखील त्याचे भांडवल न करता कर्तव्यभावनेने या प्रकल्पास रक्कम देणारा प्रसंग हृदय हेलावून टाकतो.गरजू रुग्णांची आर्थिक परिस्थिति लक्षात घेऊन रक्तपिशवीसाठी लागणार्याह रकमेत सवलत देण्याची तरतूद असते.त्यासाठी समाजातील एक वर्ग आपले आर्थिक समर्पण यासाठी करीत असतो हे विसरून चालणार नाही.
 
 
 
थॅलेसेमिया या आजारावर बोनमॅरो ट्रान्सप्लांटद्वारे मात करता येते.मात्र त्यासाठी योग्य गटाचे बोनमॅरो मिळणे व त्या शस्त्रक्रियेसाठो लागणारा अमाप खर्च यामुळे असे प्रसंग दुर्मिळच असतात.मात्र शस्त्रक्रिया करणारे हॉस्पिटल व रुग्ण कोण आहे याचा विचार न करता जनकल्याण रक्तपेढीवर विश्वास ठेवून एखादे उद्योजक देणगीदार आर्थिक सहभाग देतात.
हा रक्तपेढीचा आत्मविश्वास वाढविणारा प्रसंग ठरतो.
 
 
 
सहकार्य-संवाद
 
 
मुंबईतील एका हॉस्पिटल साठी यकृत प्रत्यारोपण लिव्हर ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियेसाठी जनकल्याण रक्तपेढी पुणे यांनी आवश्यक ते रक्तघटक पुरवणे अशी एक स्थायी जोखमीची कामगिरी आली. आवश्यकता घटनांचा घटकांचा पुण्याहून मुंबईला पुरवठा करणे ही एक मोठे आव्हान रक्तपेढीने पेलले आहे. त्याबद्दल रक्तपेढी अभिनंदनास पात्र आहे.त्याबरोबरच पुणे शहराबाहेरील महाराष्ट्रातील दहा-बारा रक्तपेढ्यांना आवश्यक ते रक्तघटक पुरवत असते॰आंतररक्तपेढी आदान-प्रदान हा सामंजस्य सहकार्य याचा अनोखा नमुना आहे.
 
 
 
 
त्याचबरोबर पुण्यातील सर्व रक्तपेढी यांच्याबरोबर स्पर्धा नव्हे तर, सहकार्य-संवाद-सौहार्द्र ठेवण्याची पद्धत “अवघे धरू सुपंथ” या तत्त्वाचे आचरण करते.वाई (जि.सातारा) सारख्या ग्रामीण भागात रक्तपेढी सुरू करण्याकरता धडपडणारे कै. डॉ. विद्यासागर त्यांना मदत करणारे जनकल्याण रक्तपेढी असे अनोखे भाऊबंद रक्तपेढीने स्वतःची जोडलेले आहेत.
 
 
 
 
मान्यवरांचे प्रेम व आशिर्वाद
 
 
समाजातील अनेक मान्यवर रक्तपेढीच्या कार्यावर प्रेम करतात. त्यासाठी आपल्या प्रतिभेचा उपयोग या कामासाठी व्हावा असा प्रयत्न करतात. ज्येष्ठ साहित्यिक कै. द. मा. मिरासदार हे आपल्या कथाकथनाद्वारे रक्तपेढीच्या स्टाफला चार घटका आनंद देतात. लोकप्रिय कवी संदीप खरे रक्तपेढीच्या एका प्रकल्पासाठी बाइट देतांना प्लेटलेटदात्यांना उत्स्फूर्तपणे “रक्तयोद्धा” असा समर्पक शब्द वापरुन या दानाची उंची वाढवतात.


अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचे वडील प्रख्यात साहित्यिक विजय देव स्वतःच्या केमोथेरपिसाठी लागणारे घटक रक्तपेढीतून येत असल्याने रक्तपेढीच्या कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष भेटीसाठी बोलावून संवाद साधतात. पुढे स्वत: मृणाल कुलकर्णी रक्तपेढीच्या वार्षिक वृत्तांत अहवालाचे अतिथी संपादकदेखील होतात. अभिनेते व दिग्दर्शक गिरीश कुलकर्णी हे नवनवीन विश्व बघायला आवडते म्हणून रक्तपेढीचे नवे व समृद्ध विश्व पाहायला येतात. परंतु समाजातील सर्वच समंजस घटकांनी रक्तपेढीचे हे कार्य बघण्याची आवश्यकता आहे म्हणजे अनेक गोष्टी ते बाहेर जाऊन रक्तपेढीविषयी अधिक प्रबोधन करू शकतील अशी अपेक्षा लेखक व्यक्त करतात.
 
 
 
 
रक्तपेढी उभारणीतील काही प्रमुख कार्यकर्त्यांपैकी कै.डॉ.शरदभाऊ जोशी, कै.अप्पासाहेब वज्रम, वैद्य खडीवाले यांच्या काही प्रातिनिधिक संस्मरणांमुळे “पत्थर पायातील” यांचे महत्व लक्षात येते. रक्तपेढीविषयी अपेक्षा व्यक्त करतांना रा.स्व.संघाचे तत्कालीन सरसंघचालक कै. बाळासाहेब देवरस “येथे येणाऱ्या समाजाच्या शेवटच्या स्तरातील व्यक्तीचा विचार प्राधान्याने व्हायला हवा.” असे म्हणतात. तसेच तत्कालीन अ. भा. संपर्क प्रमुख डॉ श्रीपती शास्त्री “रक्तसंक्रमणा बरोबरच विचारसंक्रमण केंद्र व्हावे” असा संदेश देतात.
 
 
 
 
रक्तदान चळवळीस उपयुक्त पुस्तक
 
 
कुटुंबाविषयीची कल्पना व्यक्त करतांना “रक्ताचे नाते” अशी शब्दावली रूढ आहे.मात्र रक्तदाते व रक्त घेणारे यांचे प्रत्यक्षात नाते नसतांना देखील तयार होणारे “बंध” वेगळेच असतात.रक्तपेढी असे ऋणानुबंध घडवून आणणारा वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्वपूर्ण प्रकल्प आहे. रक्तपेढीशी संबंधित रक्ताची व रक्तघटकांची गरज, रक्तदाते, यंत्रसामग्री,तांत्रिक व अतांत्रिक कर्मचारी,प्रबोधन,समुपदेशन,अर्थदाते,शिबीर संयोजक, मान्यवरांचे सहकार्य व आशिर्वाद,उभारणी करणारे व प्रकल्प चालविणारे तळमळीचे कार्यकर्ते इत्यादि विविध पैलूंवर रंजक पद्धतीने प्रबोधन करणारे पुस्तक लिहून महेंद्र वाघ यांनी रक्तदान चळवळीला महत्वाचे योगदान केले आहे.


या चळवळीतील सर्व घटकांना वाचनीय असे हे पुस्तक आहे. लालित्यपूर्ण पण सोपी भाषा असून हिंदी,मराठी गीतांच्या चपखल काव्यपंक्ती आवश्यकतेप्रमाणे सहजगत्या वापरल्या आहेत.कै. पु.ल.देशपांडे यांच्या रक्तपेढीच्या काल्पनिक भेटीसंबंधीचे प्रकरण लेखकाच्या प्रतिभेची चुणूक दाखविते. रक्तदान चळवळीशी संबंधित सर्वच घटकांना तसेच सामान्य वाचकाच्या पसंतीस हे पुस्तक सहज उतरेल अशी अपेक्षा आहे.
 
 
 
१४ जून रोजी होणार रक्त्त संकलन केंद्रांचा सत्कार

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि जागतिक रक्तदाता दिनानिमित्त राज्य रक्त्त संक्रमण परिषदेतर्फे सर्वाधिक रक्तसंकलन करणाऱ्या रक्त पेढ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. मंगळवार दि. १४ जून २०२२ रोजी यशवंतराव चव्हाण सभागृहात हा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. रक्त संकलन, विलगीकरण, रक्ताची चाचणी, साठवणूक या सर्व गोष्टींमध्ये राज्यातील रक्त संकलन केंद्रे महत्वाची भूमिका बजावत असतात. रक्त्त संकलन क्षेत्रात कार्यरत सर्व सरकारी आणि खासगी रक्त संकलन केंद्राच्या कार्याचा गौरव या निमित्ताने केला जाणार आहे.  
 
 
 
- दिलीप क्षीरसागर, नाशिक 
 पश्चिम महाराष्ट्र प्रांत प्रचार प्रमुख,
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
 



 
पुस्तकाचे नाव : ऋणानुबंध रक्ताचे
 
लेखक: महेंद्र वाघ
 
प्रकाशक  :  भारतीय विचार साधना - पुणे  
 
पृष्ठ संख्या : २६३
 
किंमत :  मूळ किंमत -  २५०,  स्वागत मूल्य - १५०   

ऑर्डर करण्यासाठी क्लिक करा! 


 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

'फंडींगशिवाय असा हल्ला...'; ५५ दिवस मौन बाळगल्यानंतर पहलगाम हल्ल्यावर 'एफएटीएफ'चे मोठे विधान!

काश्मीरच्या पहलगाम येथे दि. २२ एप्रिल रोजी इस्लामिक दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यानंतर भारताने दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून चोख प्रत्युत्तर दिले. जगातील बहुतेक राष्ट्र आणि काही आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्था भारताच्या बाजूने दहशतवादाविरोझात उभ्या आहेत. यातच आता फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स (एफएटीएफ) ने देखील हल्ल्याचा निषेध केलाय. पहलगामसारखा हल्ला कोणत्याही फंडींगशिवाय (निधीशिवाय) होऊ शकत नाही, असे एफएटीएफने म्हटले आहे. या सदर्भातील निवेदन एफएटीएफने नुकतेच जारी केले आहे...

सामान्य लोकांना भारतीय मूल्यांवर आधारित दर्जेदार शिक्षण देण्यात ‘विद्या भारती’ची अतुलनीय भूमिका - केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे प्रतिपादन

सामान्य लोकांना भारतीय मूल्यांवर आधारित दर्जेदार शिक्षण देण्यात ‘विद्या भारती’ची अतुलनीय भूमिका - केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे प्रतिपादन

“शिशु मंदिर हे ओडिशाच्या शिक्षण विभागातील नाडीसारखे आहे. ‘विद्या भारती’ आणि ‘शिक्षा विकास समिती’द्वारे चालवले जाणारे सरस्वती शिशु विद्या मंदिर, भारतीय पद्धती आणि मूल्यांवर आधारित सामान्य लोकांना दर्जेदार शिक्षण देण्यात अतुलनीय भूमिका बजावते,” असे प्रतिपादन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले. ओडिशाच्या कटक जिल्ह्यातील सरस्वती विद्या मंदिरात ‘विद्या भारती’ आणि ‘शिक्षा विकास समिती’द्वारा आयोजित प्रदेशिका प्राचार्य परिषदेच्या समारोपादरम्यान ते बोलत होते...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121