
मुंबई - शिवसेनेने दिला आहे आपल्याला धोका म्हणून आगामी निवडणुकीत शिवसेने ला रोखा असे काव्यमय आवाहन करीत मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी आपले एक ही मत वाया घालवू नका असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केले. पवई येथे ईशान्य मुंबई जिल्हा रिपाइं च्या कार्यकर्ता मेळाव्यात ना.रामदास आठवले बोलत होते.यावेळी रिपाइं चे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर; मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे;रिपाइं महिला आघाडी च्या राष्ट्रीय मार्गदर्शक सौ.सीमाताई आठवले; कुमार जित आठवले; बाळ गरुड; भाऊ पंडागळे; अनिलभाई गांगुर्डे;शिलाताई गांगुर्डे; चंद्रकला पवार; राजेश सरकार; भारती पवार;तानाजी गायकवाड ; आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
महाविकास आघाडी सरकार हे दलितविरोधी आहे. अनुसूचित जाती जमातीचे पदोन्नतीमधील आरक्षण; नोकरी मधील मागासवर्गीयांचा अनुशेष भरून काढला जात नाही. मागासवर्गीयांबाबत महाविकास आघाडी सरकार निर्णय घेत नाही असे ना.रामदास आठवले म्हणाले.
रिपब्लिकन पक्षाच्या ज्या पदाधिकाऱ्यांना आपल्या पदावर १० वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे.अशा पदाधिकाऱ्यांनी स्वतःहून पदाचा राजीनामा देऊन नव्यांना संधी द्यावी आणि पक्षात वरिष्ठ पदावर काम करावे.मी कुणाला ही पदावरून काढत नाही पण एकाच पदावर दीर्घकाळ राहिलेल्या पदाधिकाऱ्यांनी पक्षहिताचा विचार करून पक्ष संघटनेचे काम करावे असे आवाहन ना रामदास आठवले यांनी केले. यावेळी श्रीकांत भालेराव;विनोद जाधव; योगेश शीलवंत; डी एम चव्हाण नंदू साठे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.