मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यात हनुमान चालीसा पठणावरून अनेक वाद आपणास पाहायला मिळाले. परंतु आता पुन्हा हनुमान चालीसा पठण या मुद्द्यावरून राणा दाम्पत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी नागपूरमधील रामनगर येथील हनुमान मंदिरात जाऊन हनुमान चालीसेचे पठण केले आहे. मात्र यावेळी "तब्बल ३६ दिवसांनंतर आम्ही विदर्भात दाखल झालो आहोत. परंतु तरीही ठाकरे सरकारची आमच्यावर दडपशाही सुरू आहे," अशा शब्दात राणा दाम्पत्याने मुख्यमंत्र्यांवर निशाण साधला आहे.
"तब्बल ३६ दिवसांनंतर आम्ही विदर्भात दाखल झालो आहोत. परंतु तरीही ठाकरे सरकारची आमच्यावर दडपशाही सुरू आहे;" असे म्हणत आपल्याला नागपूर विमानतळावर अडवण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच "देवाला महाराष्ट्रात एवढा विरोध का आहे? उद्धव ठाकरेंना दुसरंदुसरे काम राहिलेले नाही का? हा शनी लवकरात लवकर महाराष्ट्रातून दूर झाला पाहिजे आणि यासाठी मी दररोज हनुमान चालिसा आणि आरती करेन," अशा खोचक शब्दात नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडले आहे.