चौथ्या लाटेबद्दल काय म्हणाले टोपे?

    23-May-2022
Total Views | 31
 
rajesh
 
 
 
 
 
 
मुंबई: महाराष्ट्रातील सध्याची स्थिती बघता कोरोनाच्या चौथ्या लाटेची चिंता करण्याची अजिबात गरज नाही असे मत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मांडले आहे. यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाच्या चौथ्या लाटेसंदर्भात भीती पसरवणाऱ्या कुठल्याही वृत्तावर विश्वास ठेवू नका असेही आवाहन त्यांनी केले. साध्य महाराष्ट्रात कुठलेही कोरोना निर्बंध नाहीत. मेळावे, राजकीय सभा, लग्नसराईसारखे कार्यक्रम जोरात सुरु असताना रुग्ण वाढीचा वेग अत्यंत कमी आहे आणि रिकव्हरी ९८ टक्के आहे त्यामुळे महाराष्ट्राला सध्या तरी कुठलाही धोका नाही असे मत टोपे यांनी मांडले.
 
 
 
 
महाराष्ट्रासह भारत कोरोनाच्या तडाख्यांतून आता कुठे सावरत असताना जगात परत एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे. कोरोना विषाणूचे उगमस्थान असलेल्या चीन देशात पुन्हा एकदा टाळेबंदी लावावी लागली आहे. भारतात आलेल्या दुसऱ्या लाटेने सर्वाधिक नुकसान केले होते पण तिसऱ्या लाटेची तीव्रता फारशी जाणवली नाही. देशातील १०० कोटींहून जास्त लोकसंख्येचे झालेले लसीकरण, कोरोनाबद्दल झालेली जागरूकता यांमुळे भारतात कोरोनाच्या चौथ्या लाटेचा प्रादुर्भाव जास्त जाणवणार नाही असे मत आरोग्य क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत.
 
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

गोवा म्हटले की नजरेसमोर येतात ती फुलांची आरस केलेली देवालये आणि नितांत सुंदर समुद्रकिनारे! मात्र, गेल्या काही वर्षांत हिंदू संस्कृतीच्या सर्व खुणा अभिमानाने मिरवणार्‍या गोव्यामध्ये, धर्मांतरणाच्या द़ृष्टचक्राने वेग घेतला आहे. इस्लामी आणि ख्रिस्ती धर्मांतरणामुळे भविष्यात गोव्यातील हिंदू लोकसंख्या धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच धर्मांतरणविरोधी कायद्याची गरज नुकतीच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली आहे. गोव्यातील धर्मांतरणाच्या या वाढत्या समस्येचा घेतलेला मागोवा.....

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

‘युनेस्को’ने शिवरायांच्या 12 गडकिल्ल्यांना जागतिक वारशाचा दर्जा नुकताच जाहीर केला. या घोषणेनंतर महाराष्ट्राची मान अभिमानाने पुन्हा एकदा उंचवली. त्याचबरोबर पुन्हा एकदा याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न, काहीजणांकडून जाणीवपूर्वक केला जात आहे. पण, प्रत्यक्षात महाराष्ट्राच्या शिरपेचात आलेल्या या यशाचे खरे मानकरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत, यात कोणतीही शंका नाही. मुळात या गडकिल्ल्यांना वारसा दर्जा मिळण्याची संपूर्ण प्रक्रिया लक्षात घेतली, तर हे आपल्या नक्कीच लक्षात..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121