साई बांगोडातील अतिक्रमणावर मोठी कारवाई!

राखीव वनातील अनधिकृत बांधकामावर "जेसीबी" वन विभाग, पोलीस विभाग व राज्य राखीव पोलीस दल यांची संयुक्त कारवाई

    20-May-2022   
Total Views | 84
Sai
 
मुंबई (विशेष प्रतिनिधी): संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील साई बांगोडा परिसरात शुक्रवार दि. २० रोजी वन विभागाच्या राखीव वनातील २५.50 हेक्टर क्षेत्रावरील अतिक्रमणावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. वन विभाग, पोलीस विभाग व राज्य राखीव पोलीस बल यांनी मिळून ही संयुक्त कारवाई केली आहे. अवैध रित्या अतिक्रमण केलेल्या ठिकाणी भूमिगत दारूसाठा देखील सापडला आहे. दारू साठ्याच्या चार भूमिगत टाक्या नेस्तनाबूत करण्यात आल्या आहेत. 
 
Sai1 
 
 
गेल्या काही दिवसांपासून अनेक अतिक्रमण कर्त्यांकडून संघटीतरित्या या भागात जागा काबीज केल्याची बाब समोर आली होती. या अतिक्रमणाबाबत वन विभागाकडून सर्वोच्च न्यायालयात 'स्पेशल लिव्ह पिटीशन' (सिव्हील) दाखल करण्यात आली आहे. अतिक्रमण काढण्यासाठी काल दि. २० रोजी वन विभाग, पोलीस विभाग व राज्य राखीव पोलीस दलाचे ७०० कर्मचारी उपस्थित होते. या आधीच्या कारवाई दरम्यान अतिक्रमण कर्त्या महिला ढाल म्हणून पुढे उभ्या राहिल्या होत्या मात्र, या कारवाई दरम्यान महिला आणि पुरुष कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जंगलातील लाकूड तोडून ते अवैध दारू भट्टी साठी वापरले जात असल्याचे समोर आले आहे. या संयुक्त कारवाईमध्ये उलटनपाडा, साई बांगोडा, मोरोशीपाडा येथील सुमारे २५.५० हे. क्षेत्रावरील शेतीसाठीचे आणि इतर अतिक्रमण पुर्णपणे काढून टाकण्यात आले आहे.
 
अतिक्रमण काढून टाकण्याच्या यशस्वी कारवाईनंतर साई बांगोडा परिसरातील मोकळ्या जागेवर पुन्हा नैसर्गिक वन्यजीव अधिवासाची निर्मिती करण्यात येणार आहे. या साठी लागणाऱ्या आवश्यक त्या सर्व उपाययोजना कार्यान्वीत करण्यात येतील असे वन विभागाकडून सांगण्यात आले आहे.
 
 

उमंग काळे

पर्यावरण प्रतिनिधी, वन्यजीव छायाचित्रकार.
 
जंगलात फिरून विविध जीव कॅमेरात कैद करण्याची आवड, मध्य भारतातील बहुतांश जंगलात फिरण्याचा अनुभव. रामनारायण रुईया महाविद्यालयातून 'बी. एम. एम.' पदवी प्राप्त करून पर्यटन शास्त्रात पदव्युतर शिक्षण. आणि नाविन्याचा ध्यास. 
 
अग्रलेख
जरुर वाचा
हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण होतील. संघाचा जन्म, जन्मापासून करावा लागलेला संघर्ष, विस्तार व आज समाजातील सर्वच क्षेत्रांवर संघाचा पडलेला लक्षणीय प्रभाव, या सार्‍या प्रक्रियांबाबत समाजात, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही कमालीचे कुतूहल आहे. यांसारख्या विविध विषयांवर ‘ऑर्गनायझर’चे संपादक प्रफुल्ल केतकर, ‘पांचजन्य’चे संपादक हितेश शंकर, सा. ‘विवेक’च्या संपादक अश्विनी मयेकर आणि मल्याळम दैनिक ‘जन्मभूमी’चे सहसंपादक एम. बालकृष्णन यांनी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद.....

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121