शिकारी उठले भेकाराच्या जीवावर

वन अधिकार्यांनी रंगे हाथ पकडले

    19-May-2022
Total Views | 75
fd
 
 
मुंबई(विशेष प्रतिनिधी): कोल्हापुरातील राधानगरी अभयारण्या जवळील सावर्धन गावातून सोमवारी दि.१८ भेकाराची शिकार केल्या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींवर गुन्हा नोंदवला असून पुढील चौकशी सुरू आहे.
 
 
वनविभागाला सोमवार दि १८ मिळालेल्या गुप्त माहिती नुसार सावर्धन गावात जाऊन अधिकार्यांनी तपासणी केली. गावातील हडक्याचे माळ या प्रभागात भेकर प्राण्याच्या मांसाचे तुकडे करून वाटणी करताना तीन आरोपींना रंगे हाथ पकडले. तिन्ही आरोपी सावर्धन गावचे रहिवासी आहेत. कोंडीबा डवर, राजेंद्र पाटील, ओंकार पताडे या तीनही आरोपींना वनविभागाने ताब्यात घेतले आहे. आरोपींविरुध्द वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास कोल्हापूर विभागीय वन अधिकारी विशाल माळी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे. राधानगरी वनक्षेत्रपाल (वन्यजीव) तसेच राधानगरी अतिरीक्त कार्यभार सहाय्यक वनसंरक्षक एस.एस. पाटील, वनपाल एस. व्ही.कांबळे, आणि वनरक्षक ए. डी. कुभार, हे पुढील तपास करणार आहेत.
अग्रलेख
जरुर वाचा
धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

गोवा म्हटले की नजरेसमोर येतात ती फुलांची आरस केलेली देवालये आणि नितांत सुंदर समुद्रकिनारे! मात्र, गेल्या काही वर्षांत हिंदू संस्कृतीच्या सर्व खुणा अभिमानाने मिरवणार्‍या गोव्यामध्ये, धर्मांतरणाच्या द़ृष्टचक्राने वेग घेतला आहे. इस्लामी आणि ख्रिस्ती धर्मांतरणामुळे भविष्यात गोव्यातील हिंदू लोकसंख्या धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच धर्मांतरणविरोधी कायद्याची गरज नुकतीच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली आहे. गोव्यातील धर्मांतरणाच्या या वाढत्या समस्येचा घेतलेला मागोवा.....

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

‘युनेस्को’ने शिवरायांच्या 12 गडकिल्ल्यांना जागतिक वारशाचा दर्जा नुकताच जाहीर केला. या घोषणेनंतर महाराष्ट्राची मान अभिमानाने पुन्हा एकदा उंचवली. त्याचबरोबर पुन्हा एकदा याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न, काहीजणांकडून जाणीवपूर्वक केला जात आहे. पण, प्रत्यक्षात महाराष्ट्राच्या शिरपेचात आलेल्या या यशाचे खरे मानकरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत, यात कोणतीही शंका नाही. मुळात या गडकिल्ल्यांना वारसा दर्जा मिळण्याची संपूर्ण प्रक्रिया लक्षात घेतली, तर हे आपल्या नक्कीच लक्षात..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121