मुंबईकडे उरला ८२ दिवसांचा पाणीसाठा

सात तलाव मिळून उरला २२.९९ टक्के साठा

    18-May-2022
Total Views | 61
rain
 
मुंबई(प्रतिनिधी): मुंबईला पिण्याचे पाणी पुरवणाऱ्या सात तलावांमध्ये सरासरीच्या २२.९९ टक्के इतका पाणी साठा उपलब्ध आहे. सध्या मुंबई शहराला ८२ दिवस पुरेल इतका पाणीसाठा आहे. एकूण १४,४७,३६३ लाख दशलक्ष लिटर क्षमतेच्या तुलनेत ३,२१,८९१ दशलक्ष लिटर इतका साठा आहे.
 
 
मुंबईत पावसाळा व्हायला अजून वेळ आहे. बीएमसी दरवर्षी १  ऑक्टोबर रोजी तलावांमधील पाण्याच्या पातळीचा आढावा घेते. भातसा, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, तानसा आणि मोडक सागर येथून शहराला पाणी येते. तुळशी आणि विहार ही संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात असलेले दोन तलाव आहेत. सात तलावांमधून मुंबईला दररोज सुमारे ३,८५0 दशलक्ष लिटर पाणी मिळते. गत वर्षी दि. १५ मे रोजी पाणीसाठा १८.२६ टक्के होता. पावसाळ्याच्या अखेरीस किंवा सप्टेंबरच्या अखेरीस सात तलाव १०० टक्के भरले, तर शहरात वर्षभरात पाणीकपात होण्याची शक्यता नाही. ऑगस्ट २०२०  मध्ये, पावसाच्या कमतरतेमुळे तलावांच्या पाणलोट क्षेत्रातील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे मुंबईला पाणीकपातीचा सामना करावा लागला होता. पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस अशी आशा आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
डिजिटल व्यवहारविश्वात हवे सायबर खबरदारीचे भान

डिजिटल व्यवहारविश्वात हवे सायबर खबरदारीचे भान

जगभरात भारताच्या डिजिटल प्रगतीची प्रशंसा केली जाते. ‘युनिफाईड पेमेंट इंटरफेस’ (यूपीआय)ची सेवा जगभरातील काही देशांनी स्वीकारली आहे. भारताची डिजिटल क्षेत्रातील ही प्रगती विकसित भारताच्या दिशेने टाकलेले हे स्मार्ट पाऊल म्हणावे लागेल. मोदी सरकारला नुकतीच ११ वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, सरकारच्या अनेक उपलब्धींपैकी एक असलेल्या डिजिटल व्यवहार प्रणालीचेही विशेषत्वाने कौतुक करण्यात आले. पण, अशापद्धतीने व्यवहार करताना बँक ग्राहकांनी ‘यूपीआय’ आणि ‘डिजिटल वॉलेट’ पेमेंट सिस्टममधील फरक समजून घेण्याबरोबरच खबरदारी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121