रामगड विषधारी अभयारण्य व्याघ्र प्रकल्प म्हणून अधिसूचित

हा ठरला भारतातील ५२वा व्याघ्र प्रकल्प

    17-May-2022
Total Views | 185
tig

मुंबई(प्रतिनिधी): राजस्थानमधील रामगढ विषधारी अभयारण्य सोमवारी दि. १६ रोजी व्याघ्र प्रकल्प म्हणून अधिसूचित करण्यात आला आहे. याबाबतची माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली.
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) गेल्या वर्षी 5 जुलै रोजी रामगड विषधारी अभयारण्य आणि लगतच्या परिसरांना व्याघ्र प्रकल्प म्हणून मान्यता दिली होती. रणथंबोर, सरिस्का आणि मुकुंद्रानंतर हा राजस्थानमधील चौथा व्याघ्र प्रकल्प आहे. तर, भारतातील 52वा व्याघ्र प्रकल्प आहे. हा प्रकल्प १५०१.४९ चौरस किमी क्षेत्रात पसरलेला आहे. नव्याने अधिसूचित केलेल्या व्याघ्र प्रकल्पामध्ये ईशान्येकडील रणथंबोर आणि दक्षिणेकडील मुकुंद्रा हिल्स व्याघ्र प्रकल्पामधील वाघांच्या अधिवासाचा समावेश आहे. या प्रकल्पामुळे रणथंबोरमधील अतिरिक्त व्याघ्र लोकसंख्या नियंत्रित करण्यात मदत होणार आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या २०१९ मध्ये झालेल्या सर्वेक्षणानुसार भारतात अंदाजे २,९६७ वाघ आहेत.
चौकट:
रामगढ विषधारी व्याघ्र प्रकल्पात भारतीय लांडगा, बिबट्या, पट्टेदार तरस, अस्वल, सोनेरी कोल्हा, चिंकारा, नीलगाय आणि कोल्हे यासारखे वन्य प्राणी राहतात.
कोट :
"रामगड विषधारी व्याघ्र प्रकल्प हा संशोधन आणि शिक्षणासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. भीमलत, रामगढ पॅलेस यासारख्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्थळांमुळे पर्यटनाला प्रोत्साहन मिळेल. आणि स्थानिक समुदायांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील," असे मुकुंद्रा व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक सेदू राम यादव यांनी सांगितले.
अग्रलेख
जरुर वाचा
महिला सक्षमीकरणातूनच राष्ट्राची उन्नती : सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत , सोलापूरात उद्योगवर्धिनी संस्थेचा

महिला सक्षमीकरणातूनच राष्ट्राची उन्नती : सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत , सोलापूरात उद्योगवर्धिनी संस्थेचा 'परिवार उत्सव' कार्यक्रम संपन्न

"वात्सल्याचे वरदान असलेल्या मातृशक्तीत समाजाच्या उद्धाराचा विचार स्वाभाविकपणे असतो. त्यामुळेच ही शक्ती उभी राहील्यानंतर राष्ट्राची उन्नती झाल्याशिवाय राहणार नाही", असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी व्यक्त केला. महिला सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या उद्योगवर्धिनी संस्थेच्या २१ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून हुतात्मा स्मृती मंदिर, सोलापूर येथे गुरुवार, दि. १७ जुलै रोजी 'परिवार उत्सव' कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव एनएफडीसी - नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमा येथे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव एनएफडीसी - नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमा येथे 'भारत पॅव्हेलियन'चे करणार उद्घाटन

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय माहिती व प्रसारण, रेल्वे, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव येत्या १८ जुलै २०२५ रोजी मुंबईतील एनएफडीसी कॉम्प्लेक्समधील नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमा (NMIC) येथील गुलशन महलमध्ये भारत पॅव्हेलियनचे उद्घाटन करणार आहेत. यावेळी महाराष्ट्राचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, महाराष्ट्र सरकारचे मुख्य सचिव राजेश कुमार मीणा आणि माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कथाकथनाची..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121