नवी दिल्ली: भारताने १४ वेळा चॅम्पियन असलेल्या इंडोनेशियाला ३-० ने पराभव करून बॅडमिंटनमध्ये इतिहास रचला. भारताने थॉमस कप खेळाच्या इतिहासात पहिल्यांदा पटकावला. भारतीय टीमच्या खेळाडूंनी या अंतिम सामान्यामध्ये सर्वात्कृष्ठ प्रदर्शन केलं. टोर्न्मेंटच्या ७३ वर्षांच्या इतिहासात भारत अंतिम फेरीत कधीही पोहोचलं नव्हतं. चीन, इंडोनेशिया, जपान, डेन्मार्क आणि मलेशियानंतर थॉमस कप विजेतेपद पटकावणारे भारत ६वा राष्ट्र बनला आहे. लक्ष्य सेनने अंतिम सामान्यामध्ये सर्वोत्तम प्रदर्शन केलं. ९व्या क्रमांकावर असलेल्या २० वर्षीय खेळाडूने अनुक्रमे उपांत्य फेरीत आणि उपांत्यपूर्व फेरीत विक्टर ऍक्सेलसेन आणि ली झी जिया यांच्याकडून पराभूत होऊन त्याने अंतिम फेरीत प्रवेश केला.
विश्व चषक कांस्यपदक विजेत्या लक्ष्यची सुरुवात चांगली सुरुवात झालेली नसून, ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या गिंटिंगने सुरुवातीच्या गेममध्ये त्याला ८-२१ ने हरवले. गिंटिंग फटके मारत असताना लक्ष्य अस्वस्थ दिसत होता. पण, केवळ २० वर्षांच्या लक्ष्याने शांत आणि संयमीपणा कायम ठेवला, आणि या तरुण भारतीय शटलरने आपला खेळ उंचावला आणि पुढे दोन्ही गेम खिशात घातले. लक्ष्यने उसळी घेत सलामीचा सामना जिंकून भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली.