घोरपडीची शिकार करणाऱ्या दोघांना अटक

सातारा वनविभागाची कारवाई

    10-May-2022   
Total Views | 114
gp
 
 
मुंबई(प्रतिनिधी): साताऱ्यातील कुमठे गावामधून घोरपडीची शिकार केल्याबद्दल दोन आरोपींना दि. ९ मे रोजी अटक करण्यात आली आहे. न्यायालयाकडून आरोपींना चार दिवसाची कोठडी सुनावण्यात आली आहे.
 
 
कुमठे गावातील धनावडेवाडी येथे डांबरी रस्तावरुन दोन माणसे मृत घोरपड घेऊन जात असल्याचे वृत्त वनविभागाला मिळाले. मिळालेल्या माहितीनुसार तत्काळ कारवाई करत वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. वनविभागाने आरोपींना ताब्यात घेतले. आरडगावचा भिमराव जयसिंग बनसोडे आणि मलवाडीच्या अमर अशोक तरडेला मृत घोरपडीसह रंगेहाथ पकडून ताब्यात घेण्यात आले. आरोपींची चौकशी केल्यावर त्यानी ही शिकार कुमठे गावातील दत्ता चव्हाणच्या शेतात केल्याचे कबुल केले. यासाठी गावठी कुत्र्यासह लाकडी काठी आणि कुऱ्हाडीचा उपयोग केल्याचे त्यांनी मान्य केले.
 
घोरपड हा प्राणी कायद्याअन्वये संरक्षित आहे. वन्यप्राणी / वन्यप्राण्याचे मांस अनाधिकृतपणे बाळगणे, शिकार करणे, वाहतुक करणे यास वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम २ (१६), २ (३६), ९, ३९, ४३, ४८ अ च्या नुसार वन गुन्हा आहे. मृत घोरपड जप्त करुन आरोपी यांना आज दि. १० मे रोजी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने १३ मे पर्यंत कोठडी सुनावली आहे. या कारवाई दरम्यान साताऱ्याचे उपवनंसरक्षक महादेव मोहिते यांचे मार्गदर्शन लाभले. या कारवाईत सातारा सहा. वनसंरक्षक सुधीर सोनवले, सातारा वनपरिक्षेत्र अधिकारी, डॉ. निवृती चव्हाण अरुण सोळंकी, कुशाल पावरा, वनपाल सातारा वनपाल परळी, महेश सोनावले वनरक्षक कुसवडे, सुहास भोसले वनरक्षक सातारा, राजकुमार मोसलगी वनरक्षक भरतगाव, साधना राठोड वनरक्षक धावली, अश्विनी नरळे वनरक्षक कण्हेर, मारुती माने वनरक्षक, रोहोट यांनी केली. प्रत्येक वन्यप्राणी हा निसर्गाचा अत्यंत महत्वाचा भाग आहे. कोणत्याही वन्यप्राण्याची शिकार करणे हा कायद्याने गुन्हा आहे. वनविभाग सातारा मार्फत आवाहन करण्यात येते की, कोणीही असा वनगुन्हा करीत असल्यास तात्काळ वन विभागास संपर्क साधावा असे आवाहन वनविभागाने केले आहे.

उमंग काळे

पर्यावरण प्रतिनिधी, वन्यजीव छायाचित्रकार.
 
जंगलात फिरून विविध जीव कॅमेरात कैद करण्याची आवड, मध्य भारतातील बहुतांश जंगलात फिरण्याचा अनुभव. रामनारायण रुईया महाविद्यालयातून 'बी. एम. एम.' पदवी प्राप्त करून पर्यटन शास्त्रात पदव्युतर शिक्षण. आणि नाविन्याचा ध्यास. 
 
अग्रलेख
जरुर वाचा
जयंत पाटील यांनी राजीनामा दिला, की घेतला? - चर्चांना उधाण; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष, रोहित पवारांचे स्वप्न पुन्हा भंगले

जयंत पाटील यांनी राजीनामा दिला, की घेतला? - चर्चांना उधाण; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष, रोहित पवारांचे स्वप्न पुन्हा भंगले

स्थानिक स्वराज्य संस्थांचा बिगुल वाजला असताना, शरद पवारांनी अचानक प्रदेशाध्यक्ष बदलल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ७ वर्षे एकहाती पक्ष सांभाळणाऱ्या जयंत पाटलांनी अचानक राजीनामा द्यावा आणि तो शरद पवारांनी स्वीकारावा, इतक्यापुरती ही घटना मर्यादीत नाही. त्यामुळे हा राजीनामा खरोखरच स्वेच्छेने दिला गेला की पक्षातील गटबाजीमुळे त्यांना हटवण्यात आले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दुसरीकडे, शशिकांत शिंदे यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्ष पदाची माळ पडली असली, तरी रोहित पवार आणि समर्थकांत भलती नाराजी पसरल्या..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121