हवामान बदलामुळे 'एम्परर' पेंग्विन नामशेष होण्याचा गंभीर धोका.

    10-May-2022
Total Views | 79
 pg

 
मुंबई(प्रतिनिधी):अंटार्क्टिकाच्या गोठलेल्या टुंड्रा आणि थंडगार समुद्रात फिरणारा 'एम्परर' पेंग्विन, हवामान बदलामुळे पुढील ३० ते ४० वर्षांत नामशेष होण्याचा गंभीर धोका आहे, असा इशारा अर्जेंटिनाच्या अंटार्क्टिक संस्थेच्या (आय ए ए) तज्ज्ञाने दिला आहे.
 
 अंटार्क्टिकामध्ये सापडणाऱ्या दोन पेंग्विन प्रजातींपैकी एक 'एम्परर' पेंग्विन हे जगातील सर्वात मोठे पेंग्विन आहे.  हे पेंग्विन हिवाळ्यात वीण करतात ज्यासाठी त्यांना एप्रिल ते डिसेंबर या काळात घनदाट समुद्र बर्फाची आवश्यकता असते. समुद्र अपेक्षित वेळे नंतर गोठल्यास किंवा वेळेपूर्वी वितळल्यास, पेंग्विन कुटुंब त्याचे पुनरुत्पादक चक्र पूर्ण करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांची संख्या कमी होण्याची भीती निर्माण झाली आहे. 
 
"जर जलरोधक पिसारा नसलेल्या नवजात पेंग्विनपर्यंत पाणी पोहोचले तर ते थंडीमुळे ते मरतात आणि बुडतात," असे जीवशास्त्रज्ञ मार्सेला लिबर्टेली यांनी सांगितले, ज्यांनी अंटार्क्टिकामधील दोन वसाहतींमधील पंधरा हजार पेंग्विनचा आय. ए. ए. येथे अभ्यास केला आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
ठाणे महापालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांना वारसा हक्काने नियुक्तीचे आदेश निर्गमित

ठाणे महापालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांना वारसा हक्काने नियुक्तीचे आदेश निर्गमित

ठाणे महापालिकेतून सेवानिवृत्त, स्वेच्छानिवृत्त तसेच मयत झालेल्या सफाई कामगारांच्या वारसाहक्काने महापालिकेच्या सेवेत येणाऱ्या 15 जणांचे नियुक्ती आदेश आज प्रशासनाने निर्गमित केल्याने सर्व सफाई कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसा हक्क लागू व्हावा यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार नरेश म्हस्के यांनी शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश आले असून सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसा हक्क मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून प्रलंबित वारसा ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121