व्यथा खंडित ‘कॉरिडोर’ची

    25-Apr-2022
Total Views | 126
 
cc1
 
वन्यजीवांसाठी त्यांचा अधिवास आणि त्यांच्या भ्रमणासाठी ‘कॉरिडोर’ महत्त्वाचा असतो. सद्यपरिस्थितीत जगात वन्यजीवांच्या अधिवासाचा होणारा र्‍हास आणि नष्ट होणार्‍या ‘कॉरिडोर’ची समस्या गंभीर आहे. त्या विषयावर उहापोह करणारा हा लेख...
 
 
e1
 
पृथ्वीवरील भारताच्या स्थानामुळे या भूप्रदेशाला विविध हवामान परिस्थिती असलेल्या प्रदेशांचे वरदान मिळाले. हवामान परिस्थितीतील या विविधतेमुळे वेगवेगळ्या अधिवास क्षेत्रांची निर्मिती झाली. हे अधिवास राजस्थानच्या वाळवंटापासून हिमाचल प्रदेशच्या थंडगार पर्वतांपर्यंत पसरलेले आहेत. अशा अधिवासांमध्ये समृद्ध जैवविविधता असूनही, आपल्या देशातील केवळ पाच टक्के नैसर्गिक अधिवास संरक्षित आहेत. एवढे तुटपुंजे संरक्षित क्षेत्र हे देशातील जैवविविधता आणि वन्यजीवांसमोर मोठे आव्हान आहे. विकसनशील देश म्हणून नैसर्गिक संसाधनांची आवश्यकता ही सर्वकाळ गरजेची आहे. ही बाब आपल्याला पटो वा ना पटो, मात्र देशाच्या सर्वांगीण विकासासाठी ती अत्यंत आवश्यक आहे. लोकांसाठी अन्नाची गरज, कपड्यांसाठी ‘’ॅबि‘क’ आणि ऊर्जेसाठी कोळसा या काही मूलभूत गरजा आहेत. ज्या मानवी विकासासाठी आवश्यक आहेत. मात्र, या सर्व गोष्टी पर्यावरणाचा र्‍हास करूनच तयार होतात. माणसाच्या उत्क‘ातींच्या पहिल्या टप्प्यात तो शिकार करत होता. जेव्हा त्याला शेतीचा शोध लागला तेव्हाच तो स्थायिक झाला आणि मानवी सभ्यतेला सुरुवात झाली. जंगलात मातीचे स्त्रोत भरपूर असल्याने शेतीसाठी सुपीक माती उपलब्ध झाली. अशाप्रकारे, शेतीपासून सुरू झालेला जंगलांचा र्‍हास, पुढे जाऊन अन्नासाठी जंगलांच्या नाशात बदलला.
 
 
 
e2
 
अधिवासाचे विखंडन
नैसर्गिक अधिवासांचा होणारा नाश ही आजच्या घडीची एक गंभीर समस्या आहे. परंतु, तितकीच धोकादायक बाब म्हणजे नैसर्गिक अधिवासाचे तुकडे होणे, म्हणजेच त्यांचे विखंडन होणे. यासाठी एक उदाहरण जाणून घेऊ, एक मोठा महामार्ग जंगलातून जातो. आर्थिक विकासासाठी महत्त्वाचा असलेला हा महामार्ग नेहमीच मोठमोठे ट्रक, ट्रेलर आणि गाड्यांनी गजबजलेला असतो. या महामार्गामुळे जंगलाचे दोन भाग होऊन प्राण्यांच्या हालचालींवर मर्यादा येतात. वाघांसार‘या प्राण्यांना मोठ्या अधिवासाची आवश्यकता असते. ते शिकार आणि जोडीदाराच्या शोधात बाहेर पडतात. जंगलातून जाणार महामार्गामुळे वाघांच्या हालचालींवर मर्यादा येतात. अशावेळी भरधाव वेगाने येणार्‍या वाहनाला तो बळी पडू शकतो. आता, ही काल्पनिक परिस्थिती केवळ भारतातच नाही, तर जगभरातील अनेक विकसनशील देशांमध्ये वास्तव बनली आहे. रस्ते, रेल्वे, शहरीकरण, कारखान्यांची निर्मिती आणि इतर विकास प्रकल्पांमुळे अधिवासाचे तुकडे होतात. या तुकड्यांमुळे वन्यजीवांच्या भम‘णामार्गात अडथळा निर्माण होतो. या अडथळ्यांमुळे त्यांच्या हालचालींवर मर्यादा येतात. अधिवासाच्या
विखंडनामुळे जंगलाचे असं‘य लहान विभाग तयार होतात. प्रत्येक विभाग एका विशिष्ट प्रजातीच्या ‘उप-लोकसं‘येला’ (सब-पॉप्युलेशन्स) अधिवास प्रदान करतो. जंगलाचे तुकडे झाल्यामुळे वन्यजीवांच्या एका वसाहतीतून दुसर्‍या वसाहतीमध्ये कोणत्याही प्रकारचे अनुवांशिक हस्तांतरण होत नाही. अशा परिस्थितीत झालेल्या प्रजननामुळे वन्यजीवांच्या भविष्याला हानी पोहोचते. कारण, तिथे कोणतीही अनुवांशिक विविधता नसते. अशावेळी प्रजातींना त्या विशिष्ट क्षेत्रातून नामशेष होण्याचा धोका निर्माण होतो. अधिवासाचे विखंडन झाल्यामुळे मृत झालेल्या प्राण्यांची असं‘य चित्र आपण पाहिली असतील. याचे एक कुप्रसिद्ध उदाहरण म्हणजे पश्चिम बंगालमधील ’बक्सा व्याघ‘ प्रकल्प’. या प्रकल्पातून जाणार जलपायगुडी आणि अलीपुरद्वारला जोडणार्‍या रेल्वे मार्गावर हत्तींचा मृत्यू होतो. केवळ हत्तीच नाही, तर देशभरातील रस्ते आणि रेल्वे मार्गावर अनेक लहान-मोठे वन्यजीव मारले जातात.
 

e3 
 
खंडित ’कॉरिडोर’
वन्यजीव ’कॉरिडोर’ हा जमिनीचा एक पट्टा आहे, जो जंगलांच्या दोन विभक्त भागांना जोडतो. संरक्षित वनक्षेत्रांच्या होणार्‍या विखंडनाची बाब ही मोठ्या मांसाहारी प्राण्यांसाठी दीर्घकालीन समस्या निर्माण करते. त्यामुळे वन्यजीव ‘कॉरिडोर’ ओळखणे आणि त्यांचे संरक्षण करणे अत्यावश्यक आहे. वन्यजीवांच्या वेगळ्या लोकसं‘येची म्हणजेच ’सब-पॉप्युलेशन्स’ची व्यवहार्यता टिकवून ठेवण्यासाठी आणि परिसंस्थेच्या कार्यक्षमतेचे संरक्षण करण्यासाठी अशी क्षेत्रे महत्त्वपूर्ण आहेत. मात्र, ’कॉरिडोर’च्या कार्यात्मक भूमिकेबद्दल अनेक मतमतांतरे आहेत. ‘वन्यजीव कॉरिडोर’ हे केवळ तात्पुरते वापरले जाणारे ‘कनेक्टर’ असल्याचा युक्तीवाद काही लोक करतात, तर काहींना वाटते की, ते प्राण्यांच्या अधिवासाचा कायमचा अविभाज्य भाग आहेत. वन्यजीव ‘कॉरिडोर’ हे फक्त जंगलांचे पट्टे नसून यामध्ये बरीचशी शेती, ग‘ामीण भाग आणि शहरांचादेखील समावेश होतो. अशा मानवी अधिवासाच्या क्षेत्रात पीक, पशुधन आणि पाण्याच्या स्वरूपात होणार्‍या अन्नाच्या उपलब्धतेमुळे या क्षेत्रांकडे वन्यजीव आकर्षित होतात. त्यामुळे वन्यजीव हे फक्त जंगलातच अस्तित्वात आहेत, हा जनसमुदायामध्ये एक सामान्य गैरसमज आहे. परंतु, बरच अभ्यासातून असे दिसून आले आहे की, जंगलातील मांजर कुळातील प्राणी, साळींदर, जंगली डुक्कर आणि उदमांजर हे त्यांचे प्राथमिक निवासस्थान म्हणून शेतीचे क्षेत्र वापरतात. अनेक वेळा वाघांकडून जंगलाचा पट्ट्या ओलांडण्यासाठी शेती क्षेत्राचा वापर होत असल्याचे आढळून आले आहे.
 
 
cc
 
‘कॉरिडोर’ची संरचना ही वापरणार प्रजातींनुसार अत्यंत विशिष्ट असते. उदाहरणार्थ, हंगामी स्थलांतरासाठी वापरण्यात येणार्‍या ‘कॉरिडोर’ची संरचना ही वेगळी असते, तर हत्ती किंवा वाघांकडून अन्न-पाण्याच्या शोधार्थ वापरल्या जाणार्‍या ‘कॉरिडोर’ची संरचना पूर्णपणे भिन्न असते.ोचे नुकसान, पशुधनाची हानी आणि मृत्यूच्या रुपात वन्यप्राण्यांच्या क‘ोधाचा सामना करावा लागतो. यासाठी स्थानिकांचा सहभाग, भरपाई योजनाची वेळेत अंमलबजावणी, जनजागृती कार्यक‘म आणि बाधित
समुदायांसाठी पर्यायी उपजीविकेच्या उपाययोजना राबवणे आवश्यक आहे. तरच मानवी अंमलाखाली असलेल्या भूप्रदेशांमध्ये वन्यजीवांचा भरभराट अशा परिस्थितीत ‘कॉरिडोर’चे संरक्षण वाढवण्याची गरज जागतिक पातळीवर चर्चेचा
विषय बनली आहे. कारण, अधिवासाचे विखंडन हे जैवविविधतेसमोरील सर्वात मोठे
आव्हान बनले आहे. जगभरात ‘कॉरिडोर’ हे सर्रासपणे नष्ट होत आहेत. विविध सामाजिक, आर्थिक आणि मानवी घटकांमुळे
‘कॉरिडोर’ धोक्यात आले आहेत. वर नमूद केल्याप्रमाणे, भारताच्या झपाट्याने वाढणार्‍या लोकसं‘येमुळे जंगलांवर प्रचंड दबाव पडतो आहे. शेतजमिनीच्या वाढत्या गरजेमुळे जंगलाचे पट्टे नष्ट होत आहेत. भारतातील अनेक संरक्षित क्षेत्रे ही दाट लोकवस्ती, शेती आणि खाणकाम व ‘कॉरिडोर’मधून जाणारे रस्ते यांसार‘या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांनी वेढलेले आहेत.
राष्ट्रीय व्याघ‘ संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) देशभरातील 32 महत्त्वाच्या व्याघ‘ ‘कॉरिडोर’ची नोंद केली आहे. मध्य भारतामधील सर्वात महत्त्वाचा ‘कॉरिडोर ’
 
 
 
म्हणजे ‘कान्हा व्याघ‘ प्रकल्प’ आणि मध्य प्रदेशातील ‘पेंच व्याघ‘ प्रकल्पा’ला जोडणारा ‘कॉरिडोर’. या ‘कॉरिडोर’बाबत अभ्यासकांनी नोंद केली आहे की, या दोन व्याघ‘ प्रकल्पांमधील संपर्क तुटल्यास संपूर्ण लँडस्केपमधील वाघांच्या हालचालींवर मर्यादा येतील. त्यामुळे व्याघ‘ संवर्धनाच्या प्रयत्नांना खीळ बसेल. आपल्यापैकी फार कमी जणांनी पश्चिम
महाराष्ट्रात अस्तित्त्वात असलेल्या वाघांच्या ’सह्याद्री-कोकण कॉरिडोर’बद्दल ऐकले असेल. 10,500 चौ.किमी क्षेत्रावर पसरलेल्या या ‘कॉरिडॉर’ मध्ये संरक्षित क्षेत्र, खासगी जमिनी आणि शेती अशा क्षेत्रांचे मिश्रण आहे. हा ‘कॉरिडोर’ उत्तरेकडील ‘सह्याद्री व्याघ‘ प्रकल्पा’ला गोव्यातील म्हादई वन्यजीव अभयारण्यारपर्यंत जोडतो. या ‘कॉरिडोर’ने नर वाघाच्या हालचाली यशस्वीपणे सुलभ केल्या आहेत. सह्याद्री व्याघ‘ प्रकल्पातून कर्नाटकातील ‘काली व्याघ‘ प्रकल्पा’मध्ये स्थलांतरित झालेल्या नर वाघामुळे या ‘कॉरिडोर’चे महत्त्व अधोरेखित झाले आहे. सद्यपरिस्थितीत नव्याने तयार झालेले वन्यजीव कॉरिडोरची ओळख पटवणे आवश्यक आहे. तसेच, त्यांच्या संरक्षणाला आगामी काळात सर्वाधिक प्राधान्य दिले पाहिजे. विकासाच्या नावाखाली
‘कॉरिडोर’मधून जाणार्‍या पायाभूत सुविधांचा पुनर्विचार केला गेला पाहिजे. ‘कॉरिडोर’च्या भागातील अनेक गावांना पीक आणि मालमत्त्होऊ शकते.
 
- ओमकार पाटील  
अग्रलेख
जरुर वाचा
मी टाटा ग्रुपला २ कोटी देते, माझे वडील परत आणा; एअर इंडियाच्या विमान अपघातात वडील गमावलेल्या लेकीचा आक्रोश!

"मी टाटा ग्रुपला २ कोटी देते, माझे वडील परत आणा"; एअर इंडियाच्या विमान अपघातात वडील गमावलेल्या लेकीचा आक्रोश!

(Ahmedabad Plane Crash updates) अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातामुळे संपूर्ण देश हादरला आहे. या भीषण अपघातात प्रियजनांना गमावलेल्यांनी आपला आक्रोश व्यक्त केला आहे. दरम्यान, मृतांच्या नातेवाईकांना टाटा समूहाकडून एक कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. आपल्या वडिलांच्या मृत्यूमुळे दुःखात असलेल्या फाल्गुनी यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये टाटा समूहाकडून जाहीर करण्यात आलेल्या आर्थिक मदतीबाबत आक्षेप घेत अपघातात मृत पावलेल्या आपल्या वडिलांना परत आणल्यास आपण टाटा ग्रुपला दोन कोटी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121