देश भरात सरासरी पेक्षा चांगल्या पाऊसाचा अंदाज: भारतीय हवामान विभाग

    14-Apr-2022
Total Views | 90

paus
 
मुंबई(प्रतिनिधी): भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार २०२२ मध्ये ईशान्य भारत, जम्मू आणि काश्मीर, राजस्थान, हरियाणा, पंजाब, तामिळनाडू, केरळ आणि लडाख वगळता देशातील बहुतेक भागांमध्ये मान्सून 'सामान्यतेपेक्षा जास्त' असू शकतो. दरम्यान, स्कायमेट या खाजगी हवामान संस्थेने आपल्या अंदाजात म्हटले आहे की नैऋत्य मान्सूनच्या पूर्वार्धात म्हणजेच जून आणि जुलै महिन्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर) पेक्षा जास्त पर्जन्यमान अपेक्षित आहे.
 
नैऋत्य मोसमी मान्सून हा जून ते सप्टेंबरच्या महिन्यात संपूर्ण देशभरात चांगल्या प्रमाणात राहील अशी शक्यताअसल्याचे वृत्त भारतीय हवामान खात्याने दिले आहे. सध्या, विश्ववृत्तीय पॅसिफिक प्रदेशावर 'ला निना' चा प्रभाव दिसून येत आहे.आणि पावसाळ्यात सुद्धा हीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
 
सिंचनात सुधारणा होऊनही, भारतातील एकूण शेतीयोग्य जमिनीपैकी जवळपास निम्मी जमीन अजूनही पावसावर अवलंबून आहे. येणारा नैऋत्य मान्सून कृषी उत्पादनाला चालना देईल आणि गेल्या काही महिन्यात वाढलेल्या महागाईची चिंता कमी करेल, ज्यामुळे एकूण अर्थव्यवस्थेला मदत होईल. या आठवड्याच्या सुरुवातीला, खाजगी हवामान अंदाज संस्था, स्कायमेट ने देखील त्यांच्या हवामान अंदाजात सांगितले होते की २०२२ मध्ये नैऋत्य मान्सून हा पूर्वीच्या सरासरीच्या ९८ टक्के असेल.
अग्रलेख
जरुर वाचा
पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया समोर! म्हणाल्या, प्रत्येक गोष्टीला वेळ...

पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया समोर! म्हणाल्या, "प्रत्येक गोष्टीला वेळ..."

(Rohini Khadse Breaks Silence After Husband Pranjal Khewalkar’s Arrest) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना पुण्यातील खराडी येथे सुरू असलेल्या रेव्ह पार्टीतून अटक करण्यात आली. पुणे पोलिसांनी रविवारी मध्यरात्री ही कारवाई केली. प्रांजल खेवलकर यांच्यावर ही रेव्ह पार्टी आयोजित केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पार्टीदरम्यानचा व्हिडीओ पुढे आल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर आता रोहिणी खडसे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांन..

पहलगाम हल्ल्यावर पी. चिदंबरम यांचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, दहशतवादी पाकिस्तानचे की भारतातच...

पहलगाम हल्ल्यावर पी. चिदंबरम यांचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, "दहशतवादी पाकिस्तानचे की भारतातच..."

(P Chidambaram's Remark on Pahalgam Terror Attack) पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून मे महिन्यात ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले. यामध्ये भारताने हवाई हल्ले करत पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त केले. यासंदर्भातच विरोधी पक्षांनी संसदेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चेची मागणी केली होती, जी सत्ताधाऱ्यांनी मान्य केली. मात्र संसदेत चर्चेपूर्वी, ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी एका मुलाखतीत केलेले वक्तव्य समोर आले आहे. ज्यावरुन मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121