राजस्थान सरकारकडून ‘द काश्मीर फाईल्स’चे यश रोखण्याचा प्रयत्न?

कोटा येथे महिन्याभरासाठी ‘कलम १४४’ लागू

    23-Mar-2022
Total Views | 95

 


kashmir 
 
नवी दिल्ली : दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांचा ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट पाहण्यासाठी राजस्थानमधील कोटा येथील चित्रपटगृहांमध्ये मोठी गर्दी उसळली होती. त्यामुळे कोटा येथे एक महिन्यासाठी ‘कलम १४४लागू करण्यात आले आहे. ‘कलम १४४मंगळवारपासून लागू झाले असून ते २१ एप्रिलपर्यंत लागू राहणार आहे. राजस्थान सरकारकडून ‘द काश्मीर फाईल्स’चे यश रोखण्याचा हा प्रयत्न आहे का, असाही सवाल विचारण्यात येत आहे.
 
 
‘कलम १४४लागू करण्यात आल्याने आता कोटा जिल्ह्यात पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोक एकत्र जमू शकणार नाहीत. यांचा ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटामुळे कोटामध्ये जातीय तणाव निर्माण होण्याची भीती कोटा जिल्हा प्रशासनाने व्यक्त केली होती. त्यामुळे प्रभारी जिल्हाधिकारी राजकुमार सिंह यांनी नुकतेच याबाबतचे आदेश जारी केले आहेत. या निर्णयामुळे आता महिनाभर कोटा शहरात मिरवणूक किंवा निदर्शनेही करता येणार नाहीत.
 

दरम्यान, भाजपने या निर्णयाविरोधात सत्ताधारी काँग्रेसवर टीका केली आहे. भाजप विधिमंडळ पक्षाचे उपनेते राजेंद्र राठोड यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “या चित्रपटाचे देशभरात सर्वत्र कौतुक होत आहे. चित्रपटगृहांमध्ये चित्रपट पाहण्यासाठी लोकांमध्ये असलेला उत्साह स्पष्टपणे पाहायला मिळतो. ‘कलम १४४लागू करण्याचा प्रशासनाचा निर्णय दुर्दैवी आहे. कारण कोटातील नागरिकांनी हा चित्रपट पाहू नये, यासाठीच हा निर्णय घेतला आहे,” अशी टीका भाजपने केली आहे.

अग्रलेख
जरुर वाचा
वसईत योगेश्वर भावकृषी लागवडीसाठी शेतात स्वाध्यायींचा भक्तिमय भावार्थ , बालसंस्कार केंद्रातील मुलेही रमली चिखलात

वसईत योगेश्वर भावकृषी लागवडीसाठी शेतात स्वाध्यायींचा भक्तिमय भावार्थ , बालसंस्कार केंद्रातील मुलेही रमली चिखलात

परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले प्रेरित स्वाध्याच्या अनेक प्रयोगातील योगेश्वर भावकृषिचा प्रयोग म्हणजे ईश्वराच्या भक्ती बरोबर सर्वांनी मिळून सामाजिकता जपण्याचे भान ठेवणारा अनोखा प्रयोग . याप्रमाणे वसई तालुक्यातील अनेक गावांत सद्ध्या योगेश्वर भावकृषि लागवड सुरू असून स्वाध्यायींचा श्रमभक्तिमय भावार्थ यातून दिसून येतो.वसई पूर्वेतील एका गावात अश्याच प्रकारच्या भावार्थाने स्वाध्यायीं भातशेती लागवडीसाठी रविवारी कृषिवर एकत्र आले होते.यामध्ये बालसंस्कार केंद्रातील मुलेही समाविष्ट झाली होती.यावेळी मुलांची ..

वंशावळीतून वगळणे ही फसवणूकच; सर्वोच्च न्यायालयाचा बहिणींना दिलासा

वंशावळीतून वगळणे ही फसवणूकच; सर्वोच्च न्यायालयाचा बहिणींना दिलासा

बेंगळुरू मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (बीएमआरसीएल) कडून ३३ कोटी रूपयांची भरपाई मिळवण्यासाठी वंशावळ आणि विभाजन करारात खोटेपणा करून पाच बहिणींना संपत्तीतून वगळल्याच्या आरोपावरून सर्वोच्च न्यायालयाने दोन आरोपीविरुद्ध फौजदारी खटला चालवण्याचे निर्देश नुकतेच दिले आहेत. याबाबतीत न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्या. पी.बी. वराले यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की, “प्रथमदर्शनी पुरावे असे दर्शवतात की संबंधित कागदपत्रे मुद्दाम खोटी तयार करण्यात आली असून, त्याचा उद्देश दिवंगत के. जी. येल्लप्पा रेड्डी यांच्या पाच मुलींना ..

कल्याणच्या एपीएमसी मार्केट संचालकावर राजीनामा देण्याची आली वेळ - प्रशासकाच्या मनमानी कारभारा विरोधात संचालकांचा संताप

कल्याणच्या एपीएमसी मार्केट संचालकावर राजीनामा देण्याची आली वेळ - प्रशासकाच्या मनमानी कारभारा विरोधात संचालकांचा संताप

कल्याणच्या एपीएमसी मार्केटमधील भूखंड लक्ष्मी मार्केट व्यापारी संघटनेला दिल्यानंतर एपीएमसीमधील संचालक प्रशासकावर चांगलेच संतापले आहे. हा भूखंड नियमबाह्य पद्धतीने दिला गेला असल्याचा आरोप करीत आमच्या संचालकांच्या चालत नाही तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाऊन राजीनामा देण्याचे विधान केल्याने राजकीय वर्तूळात एकच खळबळ उडाली आहे. लक्ष्मी मार्केटच व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. घेतलेला भूखंड हा कायदेशीर आहे. एपीएमसीमधील काही लोक आर्थिक फायद्यासाठी हे सगळे करीत आहे. या वादामुळे एपीएमसी व्यापारी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121