कोकणातील एक बहुक्षेत्रीय रत्न

    19-Mar-2022
Total Views | 100
 
 
maheshwar tetambe
 
 
एक पत्रकार, लेखक, दिग्दर्शक अशा विविध क्षेत्रांमध्ये ओळख असणार्‍याआणि कोकणच्या मातीत जन्मलेल्या महेश्वर तेटांबेंबद्दल माहिती देणारा आजचा लेख....
 
भारतामध्ये ’नाटक’ या संकल्पनेला अनेक वर्षांचा इतिहास आहे. काळानुरूप, या प्रकारात अनेक वर्षांमध्ये बदल घडत गेले. नाटक, दशावतार, एकांकिका हे व्यासपीठावर सादर होणारे असे प्रकार आहेत, ज्यामध्ये कलाकारांसहित संपूर्ण चमुचा कस लागतो. आधी हे फक्त मनोरंजनाचे साधन जरी असले तरी आता अनेक कुटुंब यावर चालतात. या प्रकारात ’एकांकिका’ ही सर्वात पहिली पायरी येते.
 
 
महाराष्ट्रामध्ये असंख्य असे कलाकार आहेत जे एकांकिका स्पर्धांमध्ये आपले नशीब आजमावत असतात. अनेक नव्या लेखक आणि तरुण कलाकारांसाठी एकांकिका उत्तम व्यासपीठ ठरते. एकांकिकांनी गेल्या कित्येक वर्षांपासून भारतीय नाट्यसृष्टीला असे अनेक तारे दिले आहेत, ज्यांनी फक्त भारतातच नाही, तर सातासमुद्रापार आपल्या नाट्यकौशल्याने झेंडे रोवले आहेत. अशाच एका रत्नाची प्रेरणादायी गोष्ट पाहणार आहोत...
 
 
कोकणच्या मातीत जन्मलेले हे रत्न म्हणजे महेश्वर भिकाजी तेटांबे. महेश्वर तेटांबे यांचा जन्म दि. ८ ऑगस्ट, १९७१ रोजी चिपळूणच्या मौजे मांडकी या गावी झाला. महेश्वर तेटांबे नाट्य, चित्रपट कलाकार, लेखक, दिग्दर्शक आणि पत्रकार अशा अनेक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी ‘आमची शाळा’, ‘चाळ नावाची वाचाळ वस्ती’, ‘पुरस्कार’ अशा अनेक एकांकिका लिहिल्या असून, त्यांच्या ‘पुरस्कार’ या एकांकिकेने अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत.
 
 
महेश्वर तेटांबे यांचे शालेय शिक्षण डॉ. शिरोडकर विद्यालयातून झाले असून, त्यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण वडाळ्याच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातून पूर्ण केले आहे. महेश्वर तेटांबे यांच्या अभिनयाची सुरुवात त्यांच्या शालेय जीवनापासून झाली असून, त्यांनी आपल्या शालेय जीवनात ‘घाम हवा घाम’, ‘केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे’, ‘ठेविले अनंते तैसेची राहावे’, अशा नाटकांमध्ये काम केले आहे. त्यानंतर आपल्या महाविद्यालयीन जीवनातही त्यांनी ‘बाळ्याचे वस्त्रहरण’, ‘सौभद्र एके सौभद्र’ इत्यादी एकांकिकांमधून अभिनयाची छाप पाडली आहे.
 
 
महेश्वर तेटांबे यांनी अनेक लघु चित्रपटांसाठी प्रमुख साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहिले असून, ‘आस’ या लघुपटाच्या दिग्दर्शनाची आणि छायाचित्रणाची धुरा त्यांनी सांभाळली होती. त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या ‘आर्यारवी एंटरटेनमेंट’ प्रस्तुत ‘अर्थ -स्वार्थ’, ‘७७७ मध्ये बाबा’ आणि ‘शिदोरी’ या तीन लघु चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शनदेखील केले आहे. त्यांच्या ‘अर्थ-स्वार्थ’ या लघु चित्रपटाला नुकताच दादासाहेब फाळके ‘गोल्डन कॅमेरा डिजिटल गौरव’ पुरस्कार प्राप्त झाला आहे. तसेच, कोरोना काळातही त्यांनी औरंगाबाद येथील गणोरी गावात तेजस मेघा फिल्म प्रॉडक्शनतर्फे ‘फरफट’ या एका मराठी सामाजिक चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
 
 
महेश्वर तेटांबे केवळ एक कलाकार किंवा लेखक आणि दिग्दर्शक नसून ते पत्रकार व वृत्तपत्र लेखक आहेत. मागील २७ वर्षांपासून ते विविध दैनिकांमधून नागरिकांच्या समस्यांसाठी आवाज उठवीत आहेत. त्यांच्या कला, पत्रकारिता आणि समाजसेवेतील कार्याची दखल घेत त्यांना अनेक संस्थांतर्फे आतापर्यंत तब्बल १५७ विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. त्यांना ‘आदर्श पत्रकार’, ‘जागृत पत्रकार’, ‘महाराष्ट्र समाज भूषण’, ‘आदर्श सेवा’, ‘कोकण दीप’, ‘महाराष्ट्र दीप’, ‘भारतीय माहिती अधिकार समाजरत्न’, ‘लोकसेवा’, ‘पत्रमहर्षी’, ‘समाजमित्र’, ‘कोकण वैभव’, ‘बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार’, ‘कलारत्न’, ‘पत्रभूषण’, ‘पत्ररत्न’, ‘स्नेहदीप’, ‘साद सांगाती’, असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. महेश्वर तेटांबे यांच्या ‘खलबत्ता’ या लघुपटाचे आणि ‘देणे मानवतेचे’ या माहितीपटाचे प्रसारण ‘स्टार फाईव्ह लाईव्ह’या ओटीटी प्लॅटफॉर्मवर झाले आहे. त्यांच्या ‘खलबत्ता’ या लघुपटामार्फत प्रथमच त्यांचा मुलगा आर्यन तेटांबेदेखील अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवणार आहे.
 
 
कोरोना काळातही सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी गरजू नागरिकांना किराणा वाटप करणे, आर्सेनिक अल्बम गोळ्या वाटणे, अन्न वाटप करणे, मास्क व सॅनिटायझर वाटप करणे,अशा अनेक महत्त्वाच्या कार्यात आपुलकीने आणि हिरिरीने सहभाग घेतला आहे. कोरोना काळात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून अनेक संस्थांनी त्यांचा कोरोना योद्धा म्हणून गौरव केला आहे. त्याचबरोबर महेश्वर तेटांबे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे सभासद असून ते ‘अ’ वर्गाचे अभिनेतेदेखील आहेत. त्यांनी अनेक नाटकांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. ‘तिरंगा’, ‘देशाभिमान’, ‘व्हॅलेन्टाईन डे’, ‘गिफ्ट’, ‘किन्नर एक संभावना’ आणि ‘बहन’ यांसारख्या अनेक वेबसिरीजचे त्यांनी दिग्दर्शनसुद्धा केले आहे. ‘पुरस्कार’ या एकांकिकेवर आधारित सिनेमा दिग्दर्शित करण्याचा त्यांचा मानस आहे. महेश्वर तेटांबे यांच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून त्यांना शुभेच्छा!
 
- शेफाली ढवण 
अग्रलेख
जरुर वाचा
मुंबई लोकल अपघात : मृतांचा आकडा ८ वर; वाचा दिवसभरात काय घडलं?

मुंबई लोकल अपघात : मृतांचा आकडा ८ वर; वाचा दिवसभरात काय घडलं?

आठवड्याचा पहिलाच दिवस मध्य रेल्वेसाठी काळा दिवस ठरला आहे. कसारा-सीएसएमटी लोकल मार्गावरून प्रवास करणाऱ्या ८ जणांचा सोमवार दि.९ रोजी रुळावर पडून मृत्यू झाला आहे. कसाऱ्याकडून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमधून नऊ ते दहा प्रवासी खाली पडले आणि त्यापैकी आठ जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवार, दि. ९ रोजी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. "सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास या घटनेची माहिती मिळाली होती. मुंब्रा आणि दिवा रेल्वे स्थानकांदरम्यान ही घडली. फूटबोर्डवर उभ्या असलेल्या या प्रवाशांचा एकमेकांना धक्का लागला आणि ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121