आमच्यावर टीका चालेल पण जवानांचा अवमान नको! राहुल गांधींना सुनावलं

केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी खासदार राहुल गांधींना सुनावले

    19-Dec-2022
Total Views |

एस जयशंकर
 
 
 
 
 
नवी दिल्ली : "भारतमातेच्या सुपूत्रांसाठी 'पिटाई' या शब्दाचा वापर करणे कितपत योग्य आहे?", असा सवाल केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी राहुल गांधींना विचारला आहे. "तुम्ही आमच्यावर टीका करा चालेल. मात्र, भारतमातेच्या सुपूत्रांचा अवमान झाला नाही पाहिजे", अशा शब्दांत त्यांनी राहुल गांधींना खडेबोल सुनावले आहेत. काही दिवसांपूर्वी राहुल गांधींनी चीनी सैनिकांनी तवांगमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, भारतीय सैनिकांनी त्यांना हुसकावून लावले होते. याबद्दल प्रश्न उपस्थित करताना काँग्रेस नेत्यांमार्फत जवानांबद्दल अवमानकारक वक्तव्य करण्यात आले होते. राहुल गांधी म्हणाले होते की, "परराष्ट्र मंत्री हे वक्तव्य करत असतात मात्र, त्यांनी तवांगमध्ये झालेल्या झटापटीबद्दलही उत्तर द्यायला हवे."
 
 
 
अरुणाचल प्रदेशात लाईन ऑफ अॅक्चुअल कंट्रोलवर (LAC) भारत-चीनी सैन्यात पुन्हा झटापट झाली आहे. भारतीय सैन्याने सहाशे चीनी सैनिकांना तिथून हुसकावून लावले आहे. ज्यात सहा भारतीय सैनिक जखमी झाल्याचे वृत्त आहे. कित्येक चीनी सैनिक भारतीय जवानांकडून मिळालेल्या प्रत्युत्तरात जबर जखमी झाल्याचेही सांगितले जात आहे. दरम्यान, भारतीय जवानांवर गुवाहाटीतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, चीनने याबद्दल अधिकृत प्रसिद्धीपत्रक जाहीर केले आहे. भारतीय सीमेवर स्थिती सामान्य आहे. तसेच ही स्थिती सामान्य रहाण्यासाठी आम्हाला भारताची मदत हवी आहे. मात्र, या स्पष्टीकरणात चीनने तवांग घटनेचा उल्लेख केलेला नाही.
 
 
नेमकं काय घडलं?
 
९ डिसेंबर रोजी सहाशे चीनी सैनिकांनी तवांगच्या यांग्स्तेमध्ये १७ हजार उंचीवरुन भारतीय पोस्ट हटविण्याचा प्रयत्न केला होता. लाठ्या-काठ्या आणि इलेक्ट्रीक बॅटनसह त्यांनी ही घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, यावेळी तिथे तैनात भारतीय सैन्य तयारीतच होते. त्यांनी लाठ्याकाठ्यांसह डझनभर चीनी सैनिकांना चांगलाच दणका दिला. अनेकांची हाडेही खिळखिळी केली आहेत.