पत्रकार म्हणजे गिधाडं असतात : राजदीप सरदेसाई

संसदेवरील हल्ल्याच्या दिवसाबद्दल राजदीप यांचं संवेदनाहीन वक्तव्य

    13-Dec-2022
Total Views |

Rajdeep

राजदीप सरदेसाई




नवी दिल्ली
: आपल्या वादग्रस्त वक्तव्य आणि भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेल्या पत्रकार राजदीप सरदेसाईंचा एक जुना व्हीडिओ संसद भवन हल्ल्याच्या निमित्ताने पुन्हा चर्चेत आला आहे. डिसेंबर २००१मध्ये भारतीय संसदेवर झालेल्या हल्ल्याची आठवण सांगताना त्यांनी पत्रकार हे गिधाडांसारखे असतात, असे एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

सरदेसाई डिसेंबर २००१ मध्ये भारतीय संसदेवर झालेल्या हल्ल्याच्या आठवणीत जे बोलत होते. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या मंदिरावर झालेल्या हल्ल्याबद्दल एका नवोदीत पत्रकारासमोर बोलताना कशाप्रकारे संवेदनाहीन आणि बोथटपणे हा किस्सा सांगितला यावरुन त्यांच्यावर टीका केली जात आहे. १३ डिसेंबर २००१, तो शुक्रवार असल्याने संसदेत तसे फारसे काही घडणार नव्हते. त्यामुळे राजदीप यांच्या कॅमेरामनने मस्तपैकी एका पिकनिकला जाण्याचा आग्रह केला होता.


शुक्रवार असल्याने बरेसचे खासदार आपल्या घरी जाण्यासाठी परतत असतात त्यामुळे विशेष काहीच होणार नसल्याने मीही तयार झालो, असे या व्हीडिओत राजदीप सांगतात. संसदेच्या जवळच असलेल्या एका गार्डनमध्ये वाईन आणि कबाब आणण्याची सोयही राजदीपच्या टीमने करुन घेतली होती. राजदीप यांची टीम ११ वाजता संसद भवनात पोहोचली होती. त्याच वेळी बंदुकीतून गोळ्या झाडण्याचा आवाज ऐकू आला होता. संसदेवर हल्ला झाल्याचेही ते म्हणाले. राजदीप तिथे पोहोचले आणि वॉचमनला प्रवेशद्वार बंद करण्यासाठी सांगितले होते.

त्याचे कारण म्हणजे अन्य कुठल्याही चॅनलने तिथे पोहोचू नये, अशी अपेक्षा त्यांची होती. त्यावेळीही काही चॅनल्स सक्रीय होती. संसदेवर हल्ल्याची बातमी ऐकून आपणच ही स्टोरी कव्हर करायचा निश्चय त्यांनी केला होता. आम्ही आमची पिकनिक विसरलो होतो. संसदेवर हल्ला झाल्याची बातमी ऐकल्यानंतर इतर चॅनल्स तिथे पोहोचू नयेत यासाठी प्रयत्न केल्याचे राजदीप या व्हीडिओत सांगतात. सरतेशेवटी पत्रकार ज्यात ते स्वतःचाही गणती करतात आणि म्हणतात. पत्रकार हे गिधाडासारखे असतात.


राजदीप सरदेसाईंचा हा व्हीडिओ सेंट पॉल्स इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन एज्युकेशनच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधतानाचा आहे. डिसेंबर २००१ मध्ये ज्यावेळी संसदेवर हल्ला झाला त्यावेळी ते एनडीटीव्हीमध्ये होते. बरखा दत्त यांची तेव्हा 'सेलिब्रिटी पत्रकार', अशी ओळख बनली होती. कारगील युद्धाचे कव्हरेज करणे तसेच काश्मीरी पंडितांबद्दलची त्यांची मतं यामुळे बरखा चर्चेत आल्या होत्या.