अरे गधड्या तुझी लायकी आहे का?; राज ठाकरेंनी डागली राहुल गांधींवर तोफ!

    28-Nov-2022
Total Views |
अरे गधड्या तुझी लायकी आहे का?; राज ठाकरेंनी डागली राहुल गांधींवर तोफ!
मुंबई : भारत जोडो यात्रेकडे सगळ्यांचे लक्ष वेधण्यासाठी कॉंग्रेस नेते, राहुल गांधी यांनी सावरकरांवर चिखलफेक केली होती. त्यावेळी देशभरातून कॉंग्रेस आणि राहुल गांधींविरोधात संताप व्यक्त केला गेला. राहुल गांधींना विरोध दर्शवण्यासाठी अनेकांप्रमाणे मनसेने देखील आंदोलन करून आक्रमक पवित्रा घेतला होता. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (२७ नोव्हेंबर २०२२) मुंबईतील सभेतून राहुल गांधींवर तोफ डागली.

मुंबईत गट प्रमुखांना मार्गदर्शन करताना राज ठाकरे म्हणाले कि,राहुल गाधी हे गुळगुळीत मेंदूचे आहेत. सावरकरांविषयी बोलायची त्यांची लायकी आहे का? आपल्या भाषणात राज ठाकरेंनी स्ट्रॅटेजीचा मुद्दा मांडताना मिर्झाराजे जयसिंग आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे उदाहरण दिले. "महाराजांनी मिर्जाराजेजयसिंगला गडकिल्ले दिले. ती चितळेची बर्फी होती का? मावळे थकलेले असल्याने आणि आर्थिक अडचणी असल्याने चालून आलेल्या शत्रूला तोंड देणे शक्य नव्हते. त्यामुळे महाराजांनी तात्पुरते किल्ले दिले आणि नंतर परत मिळवले, याला स्ट्रॅटेजी म्हणतात,” असे राज ठाकरे म्हणाले.


एखादी चांगली गोष्टी घडणार असेल तर खोटे बोलावे, हे कृष्णनीतीमध्ये सांगितलेले आहे. तसेच सावरकरांनी ५० वर्षे तुरुंगात राहण्यापेक्षा बाहेर येण्यासाठी स्ट्रॅटेजीचा वापर केला असे राज ठाकरे म्हणाले. त्या राहुल गांधी महाराष्ट्रात आले होते. ते गुळगुळीत मेंदूचे आहेत. हल्ली राहुल गांधी बोलतात की त्यांच्या मागे आर.डी. बर्मन बोलतात हेच समजत नाही. अरे गधड्या सावरकरांबद्दल बोलायची तुझी लायकी आहे का. सावरकर यांना कोठे ठेवले होते, त्यांनी काय हालअपेष्टा सहन केल्या, याची कल्पनातरी आहे का?” असा हल्लाबोल राज ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्यावर केला.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.