मुंबई : सध्या राज्यात हळूहळू गारठा वाढू लागला आहे. अनेक ठिकाणी पारा दहा अंशाच्या खाली गेला असून मुंबईतही किमान तापमानाची नोंद ही 20 अंशांच्या खाली झाली आहे. राज्यात पुढील 10 ते 12 दिवस थंडीचे प्रमाण वाढू शकते, असा अंदाज वर्तविला जात आहे. सध्या ईशान्येकडून वाहणार्या शीत वार्यांच्या प्रभावामुळे तापमानात घट जाणवत आहे. मुंबई उपनगरांमध्ये शुक्रवारी आणि शनिवारी हवेतील गारठा वाढल्याचे जाणवले.
तसेच, रविवारी सकाळी किमान तापमान हे 19.6 अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले आहे, तर कुलाबा येथे रविवारी सकाळी 22.2 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे. सोमवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास मुंबईतील एकंदर तापमान अंदाजे 27 अंश सेल्सिअस इतके नोंद करण्यात आले. मात्र, ईशान्य दिशेकडून येणार्या वार्यांच्या प्रभावामुळे हे तापमान मध्यरात्री व पहाटे कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच, दि. 22 ते 26 नोव्हेंबर दरम्यान शहरात 22 ते 23 अंशापर्यंत किमान तापमानाचा अंदाज वर्तविण्यात आला असून कोकण विभागामध्ये पुढील दोन दिवसात कमाल तापमान अर्ध्या अंशाने घसरण्याची शक्यतादेखील वर्तविण्यात येत आहे.