मुंबईतील किमान तापमान 20 अंशांखाली

    22-Nov-2022
Total Views | 71
 
मुंबई
 
 
 
 
मुंबई : सध्या राज्यात हळूहळू गारठा वाढू लागला आहे. अनेक ठिकाणी पारा दहा अंशाच्या खाली गेला असून मुंबईतही किमान तापमानाची नोंद ही 20 अंशांच्या खाली झाली आहे. राज्यात पुढील 10 ते 12 दिवस थंडीचे प्रमाण वाढू शकते, असा अंदाज वर्तविला जात आहे. सध्या ईशान्येकडून वाहणार्‍या शीत वार्‍यांच्या प्रभावामुळे तापमानात घट जाणवत आहे. मुंबई उपनगरांमध्ये शुक्रवारी आणि शनिवारी हवेतील गारठा वाढल्याचे जाणवले.
 
 
तसेच, रविवारी सकाळी किमान तापमान हे 19.6 अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले आहे, तर कुलाबा येथे रविवारी सकाळी 22.2 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे. सोमवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास मुंबईतील एकंदर तापमान अंदाजे 27 अंश सेल्सिअस इतके नोंद करण्यात आले. मात्र, ईशान्य दिशेकडून येणार्‍या वार्‍यांच्या प्रभावामुळे हे तापमान मध्यरात्री व पहाटे कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच, दि. 22 ते 26 नोव्हेंबर दरम्यान शहरात 22 ते 23 अंशापर्यंत किमान तापमानाचा अंदाज वर्तविण्यात आला असून कोकण विभागामध्ये पुढील दोन दिवसात कमाल तापमान अर्ध्या अंशाने घसरण्याची शक्यतादेखील वर्तविण्यात येत आहे.
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121