भाजप आमदार नितेश राणेंचे खुले पत्र
मुंबई: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तालिबानशी तुलना करणारे प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर भाजपच्या रडारवर आले आहेत. अख्तर यांच्याशी संबंधित चित्रपट प्रदर्शित होऊ न देण्याचा इशारा भाजपचे आमदार राम कदम यांनी दिल्यानंतर आता आमदार नीतेश राणे यांनी अख्तर यांना खुले आव्हान दिले आहे. जाहीर चर्चेला या, अन्यथा सर्व हिंदूंची माफी मागा, अशी मागणी नीतेश राणे यांनी केली आहे.
नीतेश राणे यांनी जावेद अख्तर यांना एक खुले पत्रच लिहिले आहे. त्यात त्यांनी अख्तर यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला आहे. 'अख्तर यांनी संघाची तालिबानी दहशतवाद्यांशी केलेली तुलना हे एक नियोजनबद्ध कटकारस्थान आहे. ते तालिबानी राजदूत असल्यासारखे वागत आहेत. हिंदुत्ववाद्यांशी तुलना करून अख्तर यांना तालिबानचे उदात्तीकरण करायचे आहे. हिंदुत्वाबद्दल त्यांच्या मनात इतका द्वेष का भरलाय कळायला मार्ग नाही,एका वत्तवाहिनीच्या चर्चेत तम्ही तालीबान्यांची तुलना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी करणं हा एक सनियोजित षडयंत्राचा भाग वाटतोय. कारण ही तुलना करताना तालीबानी प्रवक्त्यासारखी भूमिका घेत कुटनितीनं त्यांची तुलना हिंदुत्वाशी करताय, मला खरंतर हेच समजत नाही की तुम्हाला हिंदूधर्माविषयी एवढा राग का आहे? ' असा प्रश्नही नीतेश यांनी पत्रात उपस्थित केला आहे.
विशाल हृदय दाखवत आक्रमणकाऱ्यांनाही भारतभूमीनं समावून घेतलं
आजवर मुघल- अफगाणी अशा अनेक परकीय आक्रमणांचे दाह या भारतमातेने सहन केले आहेत. हिंदूधर्मावर, हिंदुसस्कृतीवर आणि धर्मस्थळांवर वारंवार हल्ले करुन ते नष्ट करण्याचे प्रयत्न झाले. तरी विशाल हृदय दाखवत आक्रमणकाऱ्यांनाही भारतभूमीनं समावून घेतलं. त्यांच्या कलाकृतींचे. साहित्य संस्कृतीचे जतन व संवर्धनही केले. त्यामळेच आज या देशात अनेक पंथ, धर्म, संस्कृती आणि भाषा वाढल्या आणि नांदल्या. विशेषत: उर्दू लेखनाच्या तुमच्या कौशल्याचं भारतवासीयांनी नेहमी कौतूकच केलेलं आहे. धर्मविस्ताराच्या नावाखाली तलवारीच्या जोरावर एकाही हिंदू राजानं आजवर कुठल्याही देशावर आक्रमण केले नाही. असेही नितेश राणेंनी आपल्या पत्रात नमूद केले.
संस्कृतीशी एकरूप झाला असेल तो आमच्यासाठी हिंदू
जो ही व्यक्ती या देशात राहतो. तो या देशाला आपली मातृभूमी समजून प्रेम करत असेल, इथल्या संस्कृतीशी एकरूप झाला असेल तो आमच्यासाठी हिंदू आहे, मग त्याचा धर्म व उपासना पद्धती कोणतीही असेल! हीच समरसतेची विचारधारा व पद्धती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आहे.आपण ज्या उर्दू भाषेत लोकप्रिय गीत लेखन करता ती उर्दभाषा आपल्या गीतांनी व कवितांनी मोठी केली आहे. तिला अधिक व्यापक बनवलं आहे. यात फिराक गोरखपी अर्थात रघुपती सहाय, बृजमेहन कैफी, राजेंद्रसिंग बेदी, उपेंद्रनाथ अश्क अशा अनेक कवी व साहित्यिकांचे नावं घेता येतील.
हिंदू स्त्रीशक्ती आदर आणि सन्मान करतो
टीव्ही चॅनेलच्या चर्चेत तुम्ही म्हणालात की ज्या अमानुष पद्धतीने तालेबानी स्त्रियांना वागवतात त्याच पद्धतीने हिंदूही आपल्या स्त्रियांना वागवतात. खरंतर आपल्या हिंदूधर्माविषयीच्या अज्ञानावर मला दया येतेय, खरंतर आम्ही हिंदू स्त्रीशक्ती आदर आणि सन्मान करतो व त्यांची देवींच्या स्वरुपात पूजा करून नतमस्तकही होतो. तुम्हाला महिलांच्या हक्कांविषयी किती आदर आहे? हे कळून चुकलेलं आहेच, कारण तुम्ही तुमच्या संपूर्ण आयुष्यात 'ट्रिपल तलाक' सारख्या वाईट परंपरेवर बोलण्याचं धाडस केले नाही. जी अमानुष परंपरा मुस्लीम स्त्रियांना करार केलेल्या गुलामासारखी वागणूक द्यायची. जी कुप्रथा स्त्रियांचा आत्मसन्मान पितृसतेच्या पायदळी तुडावयची. इस्लामोफोबीया, द्वेष, राईटविंग, फॅसीझम असे शब्द मिडीयासमोर वारंवार वापरून स्वताला फक्त चर्चेत राहायच आणि सामान्य गरिब मुस्लीम तरुणांमध्ये द्वेष पसरावयचा. पण या गरिब मुस्लीमसाठी आपण आपल्या आयुष्यात अस काय केलं आहे की ज्यामुळे त्यांचा सामाजिक व आर्थिक स्तर उंचावेल? असा प्रश्नही नितेश यांनी उपस्थित केला.
छद्म धर्मनिरपेक्षांना असे वाटते की तुष्टीकरण हीच धर्मनिरपेक्षता
जावेद अख्तरजी.तुम्ही हा देश, हा समाज तुमच्या हस्तिदंताच्या मनोऱ्यावरुन पाहत आहात, म्हणून चुकीची मतं बनवत आहात. अन्यथा संघ परिवार समाजातील शेवटच्या माणसासाठी तसेच दुर्गम ईशान्य भागात किंवा बस्तरच्या घनदाट जंगल प्रदेशात करत असलेल्या सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांबद्दल तुम्हाला असती. ही ती राष्ट्रकार्यात झोकून दिलेली एक संस्था आहे.संपूर्ण देशातील शाळांपासून ते रुग्णालयांपर्यंत दीड लाखाहून अधिक सामाजिक कार्ये संघ व संघ परिवारातील संस्था चालवितात. संघपरिवाराचा विश्वास आहे की धर्मनिरपेक्षता म्हणजे भेदभाव न करता सर्व धर्माचा आदर करणे आणि तुमच्यासारख्या (स्युडो)छद्म धर्मनिरपेक्षांना असे वाटते की तुष्टीकरण हीच धर्मनिरपेक्षता आहे. तमच्या सारख्या द्वेष करणाऱ्यांचे आभार मानायला हवेत कारण जितका बधिभेद करुन विरोध करायचा प्रयत्न तम्ही कराल तितक्याच वेगात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एक शक्ती म्हणून राष्ट्रहितासाठी उभा राहतो.
अन्यथा तुम्ही सर्व हिंदूची बिनशर्त माफी मागा.
टीव्ही शो दरम्यान वाहवाहवी मिळावी म्हणून तुम्ही खोटे विधान केले की गोळवलकर गुरुजींनी हिटलरच्या नाझीवादाचे कौतुक केले आहे, जे पूर्णपणे खोटे आहे. तुम्ही कधी गोळवलकर गुरुजींचे 'बंच ऑफ थॉट्स' हे पुस्तक वाचले असते तर तुम्ही असे कोणतेही निंदनीय विधान करण्याचं धाडस केलं नसते. घडला प्रकार संघपरिवार आणि हिंदूत्वाला मानणाऱ्यांची मनं दुखवणारा आहे. आम्ही तुम्हाला फक्त एका आठवड्याची मुदत देतो आहे, एकतर तुम्ही एखाद सार्वजनिक व्यासपीठ निवडा किंवा जे सांगितले आहे त्याचे समर्थन करण्यासाठी म्हणाल त्या व्यासपीठावर आम्ही चर्चेला तयार आहोत. आम्ही तुमच्या सर्व द्वेषाला आणि गैरसमजांना उत्तर देण्यासाठी तयार आहोत अन्यथा तुम्ही सर्व हिंदूची बिनशर्त माफी मागा.