अफगाणिस्तानच्या समस्येचा सामना करण्यास भारत सज्ज - बिपिन रावत

    25-Aug-2021
Total Views | 87
 bipin_1  H x W:
 
 
अफगाणी नागरिकांना भारतात केवळ ई व्हिसाद्वारेच प्रवेश
 

नवी दिल्ली : अफगाणिस्तानातून भारतात दहशतवादी कारवाईहोऊ शकते, याविषयी भारतास चिंता होती. मात्र, त्याचा सामना करण्यासाठीची रणनिती आखली जात होती आणि आता कोणत्याही समस्येचा सामना करण्यासाठी भारत सज्ज आहे, असे प्रतिपादन देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपीन रावत यांनी बुधवारी केले. ‘द इंडिया – युएस पार्टनरशीप : सिक्युरिंग द ट्वेंटीफर्स्ट सेंच्युरी’ कार्यक्रमात ते बोलत होते.
 
अफगाणिस्तानात सध्या जे काही घडत आहे, त्याचा अंदाज भारताला यापूर्वीच आला होता. भारताने जसा अंदाज व्यक्त केला होता, अगदी तशाच घटना घडत आहेत. मात्र, त्यामध्ये टाईमलाईनचा अंदाज थोडा बदलला आहे. कारण, अफगाणिस्तानवर कब्जा करण्यास तालिबानला काही महिन्यांचा अवधी लागेल, अशी शक्यता भारताने गृहित धरली होती. मात्र, तालिबानने कमी कालावधीतच ते साध्य केले आहे, असे सीडीएस जनरल बिपीन रावत म्हणाले.
 
अफगाणिस्तानातून येणाऱ्या कोणत्याही समस्येचा सामना करण्यास भारत सज्ज असल्याचे जनरल बिपीन रावत यांनी यावेळी सांगितले. ते पुढे म्हणाले, अफगाणिस्तान प्रश्नाचा भारताने अतिशय सखोल असा अभ्यास केला आहे. अफगाणिस्तानातून भारतात दहशतवादी कारवाया होऊ शकतात, याविषयी भारतास चिंता होती. मात्र, त्याचा सामना करण्यासाठीची रणनिती आखली जात होती आणि आता कोणत्याही समस्येचा सामना करण्यासाठी भारत सज्ज आहे, असेही सीडीएस जनरल रावत यांनी यावेळी स्पष्ट केले.
 
 
अफगाणी नागरिकांना भारतात केवळ ई व्हिसाद्वारेच प्रवेश
अफगाणिस्तानमधली सुरक्षाविषयक सध्याची परिस्थिती आणि ई इमर्जन्सी X-Misc व्हिसा आणून त्याद्वारे व्हिसा प्रक्रिया सुटसुटीत केल्यानंतर अफगाणिस्तानच्या नागरिकांनी,आतापासून भारतात केवळ ई व्हिसा वरच प्रवास करावा असा निर्णय घेण्यात आला आहे. अफगाणिस्तानच्या काही नागरिकांचे पारपत्र गहाळ झाल्याबाबतची काही वृत्ते लक्षात घेता, अफगाणिस्तानच्या नागरिकांना, जे सध्या भारतात नाहीत,त्यांना याआधी जारी करण्यात आलेले व्हिसा ताबडतोब अवैध ठरत आहेत, असे केंद्रीय गृह मंत्रालयाने सांगितले
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121