मीराबाई चानूवर बक्षिसांचा वर्षाव ; भारतात जंगी स्वागत

    27-Jul-2021
Total Views |

mirabai chanu_1 &nbs
 
 
नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिकमधील भारताची पहिली पदक विजेती साईखोम मीराबाई चानू आणि तिचे प्रशिक्षक विजय शर्मा सोमवारी संध्याकाळी स्वदेशी परतले. भारतात त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग सिंग ठाकुर यांच्या घरी आयोजित विशेष सोहळ्यात त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी केंद्रीय विधी आणि न्याय मंत्री किरेन रीजीजू,   केंद्रीय पर्यटन ,सांस्कृतिक कार्य आणि ईशान्य भारत क्षेत्र विकास मंत्री किशन रेड्डी यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित होते.
 
 
 
 
वेटलिफ्टिंग महिलांसाठीच्या ४९ किलो वजनी गटात रौप्य पदक मिळवलेल्या मीराबाई चानूने सामर्थ्य आणि मनाची तयारी यासाठीचे प्रशिक्षक एरॉन होर्शिंग यांच्याकडून प्रशिक्षण घेण्यासाठी १ मे रोजी अमेरिकेला प्रयाण केले होते. कोविड-१९ रुग्ण संख्येत होत असलेल्या वाढीमुळे भारतातून येणाऱ्या लोकांवर अमेरिकेत प्रवासासाठीचे निर्बंध लागू होण्याच्या काही दिवसापूर्वी अत्यंत कमी काळात सरकारने चानूला अमेरिकेत प्रशिक्षणासाठी जाण्यास सहाय्य केले.
 
 
 
"सरकारने दिलेल्या सहकार्याबद्दल मी आभारी आहे , त्याशिवाय पदकापर्यंतचा माझा प्रवास शक्य नव्हता. माझे स्वप्न प्रत्यक्षात आले आहे. याच क्षणासाठी मी कित्येक वर्षे प्रशिक्षण घेत होते आणि सर्वांसाठीच भव्य असणाऱ्या ऑलिंपिक क्रीडा मंचावर माझे स्वप्न साकार झाल्याचा मला अतिशय आनंद होत आहे, अशी प्रतिक्रिया हर्षभारित चानूने यावेळी व्यक्त केली. वर्षानुवर्षे तत्परतेने सहकार्य करणाऱ्या सरकारचे, विशेषतः गेल्यावर्षीच्या तसेच अलीकडच्या अमेरिका वारीसाठी सहाय्य केल्याबद्दल चानूने सरकारचे आभार मानले.
गेल्यावर्षी माझ्या खांद्याशी संबंधित दुखापतीवर उपचारासाठी केलेला अमेरिकेचा दौरा पदकांसाठीच्या माझ्या प्रवासात महत्त्वपूर्ण ठरला. यासाठी सरकारने दिलेल्या सहकार्याबद्दल मी सरकारची आभारी आहे , त्याशिवाय पदकापर्यंतचा माझा प्रवास शक्य नव्हता.
खेळाडूंच्या नवीन पिढीला, विशेषतः ईशान्य भागातील खेळाडूंना ती प्रेरणा देत राहील
 
मीराबाई चानूचे यश हे , टोकियो ऑलिम्पिकच्या पदक सोहळ्यात भारताचा झेंडा फडकावला गेला आणि भारताचे राष्ट्रगीत वाजू लागले तेव्हा अभिमानाने भरून आलेल्या १३० कोटी भारतीयांचे यश आहे, असे उद्गार केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी मीराबाई चानूचे अभिनंदन करताना काल काढले.
भारताच्या ऑलिम्पिक इतिहासात क्रीडा स्पर्धांच्या पहिल्याच दिवशी पदक जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे.
 
आपल्या खेळाडूंच्या विकासात आणि परिणामी भारताच्या पदकांच्या अपेक्षा उंचावण्यात या कार्यक्रमाने किती महत्वाची भूमिका भूमिका बजावली आहे हे तिच्या यशाने दाखवून दिले आहे.खेळाडूंना आपल्यामधील प्रतिभा विकसित करता येण्यासाठी तसेच त्यांना सर्वोत्तम स्तरावर सर्वोत्कृष्टता प्राप्त करता यावी म्हणून केंद्र सरकार प्रत्येक सुविधा पुरवणे सुरूच ठेवेल.' असे ठाकूर यांनी स्पष्ट केले.
 
देशासाठी पदक आणण्याचे वचन दिले होते आणि तो शब्द तिने पाळला
 
"तिच्या यशने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. खेळाडूंच्या नवीन पिढीला, विशेषतः ईशान्य भागातील खेळाडूंना ती प्रेरणा देत राहील. " असेही ठाकुर यांनी सांगितले. केंद्रीय विधी मंत्री किरण रिजिजू यांनी सांगितले की टोकियोला जाण्यापूर्वी झालेल्या आमच्या संभाषणात तिने देशासाठी पदक आणण्याचे वचन दिले होते आणि तो शब्द तिने पाळला. "तिच्या या भव्य यशाने प्रत्येक भारतीयाप्रमाणेच मीही आनंदाने आणि अभिमानाने भरून गेलो आहे. तिने भारताला मिळवून दिलेला गौरव आणि मान हा तिच्या वर्षानुवर्षाच्या चिकाटीचे, समर्पणाचे आणि कठोर मेहनतीचे फळ आहे. आणि तिच्यावर जो प्रशंसेचा वर्षाव होत आहे त्यावर तिचा पुरेपूर अधिकार आहे" , असेही रिजिजू यांनी नमूद केले.