ठाणे : अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराचा फटका शहरातील पाणीपुरवठ्यावरदेखील होत आहे. पिसे येथील पंपाच्या स्ट्रेनरमध्ये पुराच्या पाण्यामुळे अडकलेला कचरा काढण्यासाठी शनिवार दि.२४ जुलै रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत ठाणे महापालिकेचा स्वतःच्या योजनेतील पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.या कालावधीत स्टेम प्राधिकरणामार्फत होणारा पाणी पुरवठा दोन टप्यात सुरु राहणार आहे.
अतिवृष्टीमुळे भातसा नदीला पूर आला असुन पूराच्या पाण्यासोबत पान, वेली व नदीतील गवत वाहत येऊन पिसे येथील पंपाच्या स्ट्रेनरमध्ये अडकले आहे. त्यामुळे, पंपाचा फ्लो कमी झाल्याने ठाणे शहरात होणारा पाणी पुरवठा मागील चार ते पाच दिवसांपासून कमी होत आहे.हा वाहत आलेला कचरा काढण्यासाठी शनिवार २४ जुलै रोजी दिवसभर शटडाऊन घेण्यात येणार आहे. परंतु स्टेम वॉटर डिस्ट्री.अँण्ड इन्फा.
कंपनीकडुन होणारा पाणी पुरवठा सकाळी ९ ते १ घोडबंदर,पवारनगर परिसरात आणि दुपारी १ ते सायं.६ कळवा-मुंब्रा,समतानगर, सिद्धेश्वर परिसर असा दोन टप्यात सुरु राहणार असल्याचे पाणी पुरवठा विभागाकडुन कळवण्यात आले आहे.दरम्यान या शटडाऊनमुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असून, नागरिकांनी पाण्याचा योग्यतो वापर करुन पालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.