वसई : पालघर दातिवरे येथील सुप्रसिद्ध कवी, लेखक गणेश वसईकर (५२) यांचे सोमवार, दि. 24 मे रोजी कोरोनामुळे निधन झाले. नुकतेच त्यांच्या पत्नीचेसुद्धा कोरोनामुळे निधन झाले होते. त्यांच्या पश्चात दोन मुले आहेत. त्यांचे ‘बेधुंद’, ‘विलग’, ‘मधल्या मध्ये’ हे तीन कविता संग्रह प्रसिद्ध आहेत.