राज्यात लसीकरणातही भेदभाव

    20-May-2021
Total Views |
                                                                                       
seven hillss_1  
 
 
मुंबई:- महाराष्ट्रात लसीकरणाचा सर्वत्र तुटवडा आहे. त्यामुळे १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांना लसी नंतर देण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच दोन लसींमधील कालावधीही वाढविण्यात आला .एवढे सगळे असतानाही राज्यातील बहुतांश ४५ हुन अधिक वय असणाऱ्या नागरिकांना लस मिळालेली नाही. अशात मात्र मुंबई येथील सेव्हन हिल्स या रुग्णालयात मात्र खास पाहुण्याचे लसीकरण जोमात सुरु आहे. वलयांकित व्यक्ती आणि खास नागरिकांना सर्रास लास टोचली जात होती. यात १८ ते ४५ वयोगतातील अनेक व्यक्तींनाही लस टोचल्या जात होत्या.
 
 
अशा साठेबाजापणाबाबत सर्वोच्च न्यायालय आक्रमक असून अनेक गरजू व्यक्तींना याची गरज असताना रेमडीसीवीर,लस हि फक्त काही खास व्यक्तींना दिली जात आहे. महाराष्ट्रात आपल्याला हे सर्वत्र दिसून येत आहे. तीन दिवसांपूर्वी २५ वर्षांची अभिनेत्री सारा अली खान हिनेही याच रुग्णालयात लसीकरण केले होते. अशा काही प्रसंगामुळे सामान्य जनतेत आक्रोश वाढत असून समाजमाध्यमांवर अनेक प्रश्न विचारले जात आहेत.
 
 
अशा गोष्टी होत असताना त्यास थांबविण्यासाठी आपली न्यायपालिका वारंवार प्रयत्न करत आहे.उच्च न्यायालयाने मुंबई पालिकेला प्रश्न विचारला आहे की जर आम्ही परवानगी दिली तर तुम्ही घरोघरी जाऊन लोकांचे लसीकरण कराल का ? या प्रश्नाला मात्र राज्य सरकारकडे अजून उत्तर नाही आहे. भेदभाव,असमानता अशा गोष्टी आपल्याला समाजात वारंवार पाहावयास आपल्याला मिळत आहेत.कोरोनामुळे जीव जात असताना लसीकरणात तरी भेदभाव होऊ नये असे सुप्रीम कोर्ट म्हणाले