‘गोदरेज’ कंपनीकडून ‘कोरोना’ लसीच्या साठ्यासाठी अतिशय कमी तापमानाचे फ्रीज

    15-Feb-2021
Total Views | 88

godrej_1  H x W


देशाच्या आरोग्यसेवा क्षेत्रातील पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या दिशेने गोदरेजचे पाऊल


मुंबई: जागतिक महामारी ठरलेल्या कोरोनाच्या प्रतिबंधासाठी उपलब्ध झालेल्या लसीच्या साठ्याकरिता ‘गोदरेज’ कंपनीने अतिशय कमी तापमानाचे फ्रीज तयार केले आहेत. ‘गोदरेज’ समूहाची प्रमुख कंपनी, ‘गोदरेज अ‍ॅण्ड बॉईज’ आपल्या स्थापनेपासूनच भारताला स्वावलंबी बनविण्यात हातभार लावत आहे. ‘गोदरेज अप्लायन्सेस’ या आपल्या ‘बिझनेस युनिट’च्या माध्यमातून, देशातील आरोग्यसेवा क्षेत्रातील पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत, ‘गोदरेज अ‍ॅण्ड बॉईज’ ही कंपनी सध्या देशात सुरू असलेल्या कोविड लसीकरण मोहिमेमध्ये सहभागी होत आहे.
 
 
 
अतिशय संवेदनशील अशा लसी अगदी योग्य तापमानात सुरक्षितपणे साठविल्या जाव्यात, याकरिता ‘मेडिकल रेफ्रिजरेशन सोल्युशन्स’ या कंपनीकडून पुरविली जात आहेत. या कंपनीने अत्याधुनिक, ‘अल्ट्रा-लो’ (अतिशय कमी) तापमानाचे फ्रीज तयार करत लसीची शीतसाखळी आणखी मजबूत केली. या प्रगत वैद्यकीय फ्रीझरमध्ये जीवरक्षक औषधे आणि अतिमहत्त्वाच्या लसी उणे ८० अंश सेल्सिअस या तापमानात ठेवता येतात. तापमानाबाबत अतिसंवेदनशील असलेल्या ‘कोव्हॅक्सिन’ आणि ‘कोव्हिशिल्ड’ या लसी साठवण्यासाठी, दोन ते आठ अंश सेल्सिअस तापमान तंतोतंत राखणारे खास रेफ्रिजरेटर्स सध्या ‘गोदरेज अप्लायन्सेस’कडून बनविले जात आहेत. ‘डायल्युंट्स’साठी उणे २० अंश सेल्सियसचे तपमान राखणारे वैद्यकीय फ्रीझर्स आणि कोविड लसीकरण मोहिमेत अखेरच्या टप्प्यापर्यंत लसी नेण्यासाठी लागणारे ‘आईस पॅक’ हेदेखील कंपनीतर्फे तैनात करण्यात येत आहेत.
 
 
 
‘अल्ट्रा-लो टेम्परेचर फ्रीझर’ची सध्याची उत्पादन क्षमता वर्षाकाठी १२ हजार युनिट्स इतकी आहे. वाढती जागतिक मागणी पूर्ण करण्यासाठी हे उत्पादन वर्षाकाठी ३० हजार युनिट्स इतके त्वरेने वाढवण्याच्या दृष्टीने, ‘गोदरेज अप्लायन्सेस’ प्रयत्न करीत आहे. अखेरच्या टप्प्यापर्यंत लस नेण्याच्या पुढील प्रवासात मदत होऊ शकेल, अशा इतर मार्गांचा ‘गोदरेज अप्लायन्सेस’ शोध घेत आहे. ग्रामीण महाराष्ट्रात लसीच्या रेफ्रिजरेटरने सज्ज असलेली रुग्णवाहिका चालविण्याची चाचणी तीन दिवस वीजप्रवाह न जोडता घेण्यात आल्याने मोबाईल क्लिनिकचा प्रयोग यशस्वी ठरला आहे.





अग्रलेख
जरुर वाचा
उल्हासनगरात कचरा उचलणाऱ्या कामगारांचा काम बंद आंदोलनाचा इशारा

उल्हासनगरात कचरा उचलणाऱ्या कामगारांचा काम बंद आंदोलनाचा इशारा

उल्हासनगर शहरातील कचरा उचलणाऱ्या कोणार्क कंपनीच्या कर्मचाऱ्यांना एक महिना होऊनही अद्याप पर्यंत पगार न दिल्याने कामगारांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे . शुक्रवारी या कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केले. कामगाराच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या लढा कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप गायकवाड यांनी जोपर्यंत कामगारांना पगार देत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने शुक्रवारी कामगारांनी काम बंद आंदोलन केले. कामगारांनी सुरू केलेल्या या आंदोलनामुळे शहरात कचऱ्याचे ढीग साचलेले पाहायला मिळत आहेत. त्यामुळे ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121