नवी दिल्ली : मथुरामधील कृष्णजन्मभूमी आणि ईदगाह स्थळावरून गेले अनेक दिवस सध्या वाद-विवाद सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर अखिल भारतीय हिंदू महासभेने मथुरा जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यामध्ये, इदगाह मशिदीत नमाजपठन थांबवण्याची मागणी त्यांनी केली आहे. या संघटनेचे अध्यक्ष आणि अधिवक्ता महेंद्र प्रताप सिंह यांनी ही याचिका दाखल केली असून वादाच्या पार्श्वभूमीवर मशिदीमध्ये होणाऱ्या नमाज पठनावर बंदी घालावी, अशी मागणी केली आहे.
याचिका करताना यामध्ये म्हंटले आहे की, इदगाह मशिदीत कधीही नमाज पठन केले जात नव्हते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून जाणीवपूर्वक दिवसातून ५ वेळा नमाज पठन केले जात आहे. खुद्द इस्लाम धर्मात वादग्रस्त जागेवर नमाज पठन करणे योग्य मानत नाहीत. हे केवळ कृष्णजन्मभूमीच्या जागेवर अवैध धंदे कायम ठेवण्यासाठी केले जात आहे. हे केवळ कृष्णजन्मभूमीच्या जागेवर अवैध धंदे कायम ठेवण्यासाठी केले जात आहे, असे म्हंटले आहे. कृष्णजन्मभूमी असलेले हे स्थळ खरे तर हिंदूंचे तीर्थक्षेत्र आणि हिंदूंच्या संपत्तीचे ठिकाण असून शहर व समाजातील परस्पर सौहार्द बिघडवण्यासाठी जाणीवपूर्वक वाद घातला जात आहे. नमाज केवळ मशिदीच्या आतच नव्हे तर बाहेरही गल्लीबोळात नमाजपठन केले जात आहे.