एखाद्या सरकारी अधिकाऱ्यावर टीका करताना त्याच्या कुटुंबियांना पण विनाकारण धारेवर धरण योग्य नसून हा प्रकार त्वरित थांबवण्याची विनंती त्यांनी या वेळेज केली. नवाब मलिक यांना समीर वानखेडे यांच्या बद्दल खरंच काही माहिती असेल तर समीर वानखेडे यांच्या चौकशीची मागणी करावी ; त्यांच्या विरोधात रोज पत्रकार परिषद घेऊन टीका करणे योग्य नाही असेही ते या वेळेज म्हणाले. पत्रकारांशी बोलताना त्यांनी अहमदनगर येथील रुग्णालयाला लागलेल्या आगीविषयी शोक व्यक्त केला.
देशभरात नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपच्या ६ वरून ७ जागा झाल्या आहेत तर काँग्रेस पक्षाच्या जागा २ ने कमी होऊन त्या ८ वर आल्या आहेत; त्यामुळे देशभरातील पोटनिवडणुकीच्या निकालामुळे देशातील पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी केल्याचा दावा त्यांनी खोडून काढला.