मुंबईतील नव्या प्रभाग रचनेविरोधात भाजप आक्रमक

नियम धाब्यावर बसवत प्रभाग फेररचना केल्याचा भाजपचा आरोप

    02-Nov-2021
Total Views | 38
 
BMC-BJP-Andolan_1 &n
 
 
 
मुंबई : "मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनी राजकीय दबावाखाली येत आणि पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना डावलून प्रभाग रचना केली आहे. मात्र नव्याने करण्यात आलेली ही प्रभाग रचना संविधानाचे नियम आणि निर्देश धाब्यावर बसवत लोकशाही मूल्यांना पायदळी तुडवून करण्यात आली आहे. प्रभाग रचनेत करण्यात आलेल्या या फेरफारीबाबत आणि कथित घोटाळ्याबाबत आणि या माध्यमातून करण्यात आलेल्या मुंबईकरांच्या फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही महापालिका आयुक्तांना गुलाबपुष्प देत गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करत आमची भूमिका मांडत आहोत," असे महापालिकेतील भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी म्हटले आहे. सोमवार, दि. ०१ नोव्हेंबर रोजी भाजपच्या वतीने पालिका मुख्यालयात महापालिका आयुक्तांना गुलाबपुष्प देत आंदोलन करण्यात आले.
 
 
भाजपचा न्यायालयात जाण्याचा इशारा
नवी प्रभाग पुनर्रचना सत्ताधारी शिवसेनेने केवळ आपला राजकीय फायदा पाहून केली आहे. भ्रष्टाचाराची गटारगंगा अव्याहत वाहत ठेवण्यासाठी आणि पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठीच ही प्रभाग रचना केली असल्याची टीका भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली . निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे म्हणून निवडणूक आयोगाने याबाबत पावले उचलून प्रभाग आराखड्याची पडताळणी नि:पक्षपातीपणे करावी अशी आमची मागणी आहे. जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल तसेच न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्यात येतील असा इशारा शिंदे यांनी यावेळी दिला.
 
 
प्रभाग रचनेत मोठी फेरफार
मुंबई महापालिकेच्या फेब्रुवारी २०२२ मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी प्रभाग पुनर्रचना आराखडा पालिका प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाला सादर केला आहे. शिवसेनेने एका बाह्य खाजगी एजन्सीकडून आपल्याला अनुकूल अशी प्रभाग रचना बनवून रातोरात आयुक्तांच्या संगनमताने पेन ड्राइव्ह बदलल्याचा गंभीर आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. यामध्ये प्रभागांच्या सीमारेषांमध्ये मोठ्या प्रमाणात राजकिय सोयीसाठी बेकायदेशीर फेरफार करण्यात आला असून ह्या पुनर्रचनेमुळे मुंबईकरांची गैरसोय होणार आहे. पश्चिम उपनगरातील अनेक प्रभागांमध्ये मोठा फेरफार करण्यात आल्याचा दावाही भारतीय जनता पक्षाने केला आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
मुंब्रा घटनेबाबत कोणतीही माहिती असेल तर संपर्क साधा -  मध्य रेल्वेचे प्रवासी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांना आवाहन - घटनेच्या तपासासाठी मध्य रेल्वेची समिती

मुंब्रा घटनेबाबत कोणतीही माहिती असेल तर संपर्क साधा -  मध्य रेल्वेचे प्रवासी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांना आवाहन - घटनेच्या तपासासाठी मध्य रेल्वेची समिती

दिवा-मुंब्रा घटनेबद्दल माहितीसाठी मध्य रेल्वेचे जनतेला आवाहन केले आहे. सोमवार, दि.९.०६.२०२५ रोजी सकाळी ९.०१ वाजताच्या सुमारास झालेल्या एका दुर्दैवी घटनेत, दिवा आणि मुंब्रा स्थानकांदरम्यान उपनगरीय ट्रेनमधून प्रवास करणारे सुमारे ८ जण त्यांचा तोल गेला आणि चालत्या ट्रेनमधून पडले. रेल्वे प्रशासनाने या घटनेचे कारण तपासण्यासाठी वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांची एक समिती स्थापन केली आहे, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. याचसोबत प्रवासी जनता आणि रेल्वे कर्मचाऱ्यांना या घटनेबद्दल आणि त्याच्याशी संबंधित बाबींबद्दल कोणतीही ..

विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका प्रकल्पाला गती भूसंपादनासाठी २२ हजार कोटींच्या कर्जाला शासन हमी

विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका प्रकल्पाला गती भूसंपादनासाठी २२ हजार कोटींच्या कर्जाला शासन हमी

आगामी वाहतूककोंडी मुंबई महानगर प्रदेशात विविध प्रकल्पांना गती असतानाच आता बहुप्रतीक्षित विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका प्रकल्पाला आता राज्य सरकारकडून गती देण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक जमीन संपादन करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला २२ हजार २५० कोटी रुपये कर्जास मंजुरी दिली आहे.भूसंपादनासाठी आवश्यक कर्जासाठी राज्य सरकारने शासन हमी घेतली आहे, त्यामुळेविरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका प्रकल्पाला गती प्राप्त झाली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121