सूर्यवंशीत चांगले मुस्लीम आणि वाईट मुस्लीम हे 'प्रॉब्लेमॅटीक'?

पत्रकाराच्या प्रश्नाला दिग्दर्शक रोहित शेट्टीचे हटके उत्तर

    15-Nov-2021
Total Views | 159

Sooryavanshi_1  
 
 
 
मुंबई : बॉलीवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि अभिनेता अक्षय कुमार यांचा 'सूर्यवंशी' हा चित्रपट ५ नोव्हेंबरला देशभरात चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. प्रेक्षकांकडूनही या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, दिग्दर्शक रोहित शेट्टीने एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीच्या पत्रकार अबिरा धर यांनी विचारलेल्या 'चांगले मुस्लिम' आणि 'वाईट मुस्लिम' यावर विचारलेल्या प्रश्नावर त्याने सडेतोड उत्तर दिले. यावेळी तो हेही म्हणाला की, "माझ्या मागील ३ चित्रपटांचे खलनायक हे हिंदू होते, त्यावेळी हा आक्षेप का घेतला गेला नाही?"
 
 
नक्की प्रकरण काय?
 
 
'सूर्यवंशी' या रोहित शेट्टीच्या चित्रपटामध्ये एक दृश्य आहे, ज्यामध्ये चांगले मुस्लीम आणि वाईट मुस्लीम यातील फरक अभिनेता अक्षय कुमारचे पात्र 'सूर्यवंशी' सांगताना दिसतो. यावरून पत्रकार अबिरा धरने त्याला प्रश्न विचारायला सुरुवात केली. या दृशाला तिने 'समस्याप्रधान' (प्रॉब्लेमॅटीक) म्हंटले. मात्र, रोहित शेट्टींला हा प्रश्न आवडला नाही आणि 'याआधीच्या चित्रपटांतील हिंदू खलनायकांवर त्यांच्या जातीमुळे आक्षेप का घेतला गेला नाही?', असा सवाल त्याने केला.
 
 
तिला उत्तर देताना रोहित शेट्टीने म्हंटले की, "मी जर तुम्हाला असा प्रश्न विचारलं तर... सिंघममध्ये जयकांत शिक्रे हा हिंदू मराठी होता. त्यानंतर सिंघम - २मध्ये खलनायक हा एक हिंदू ढोंगी बाबा होता. त्यानंतर सिंबामध्ये दुर्वा रानडे हादेखील एक हिंदू होता. या तिघांचेही खलनायक हिंदू होते. मग त्यावेळी का समस्या नव्हती?" असा प्रश्न त्याने विचारला. यावर धर यांनी प्रतिउत्तर देण्याचा प्रयत्न केला, मात्र पुन्हा एकदा रोहित शेट्टीने त्यांना मध्येच थांबवत म्हणाला की, "जर एखादा दहशतवादी पाकिस्तानचा असेल तर तो कोणत्या जातीचा असेल?"
 
 
याप्रकारच्या वादांमुळे रोहित शेट्टीचा अनेक पत्रकारांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. " या असल्या गोष्टींमुळे पत्रकारांकडे बघण्याचा माझा दृष्टीकोनच बदलला आहे. आश्चर्य वाटते की, ते अशा प्रकारे दाखवता आहेत जसे, मी कंसात पाहिलंय की, कोणी उच्चवर्णीय हिंदूंद्वारे वाईट मुस्लिमांचा प्रचार करत आहे. हे अत्यंत चुकीचे आहे. असा आम्ही कधी विचारदेखील केला नाही." अशा भावना त्याने या मुलाखतीत व्यक्त केल्या आहेत.
 
 
पुढे तो म्हणतो की, "जेव्हा आपलं मन स्पष्ट असतं आणि आम्ही त्याचा विचारही केला नसेल, तर लोक त्याबद्दलचा का बोलतात? जर आपण स्लीपर सेलबद्दल बोलत आहोत, तर तो कोणत्या जातीचा असेल? शेवटी चांगल्या-वाईट माणसांना जातीशीच का जोडल जात? ते जर चुकीचे असेल तर सर्वांनी आक्षेप घेतला पाहिजे. ही प्रत्येकाची नाही, ही एका छोट्या विभागाची गोष्ट आहे. ते जर आक्षेप घेणार असतील तर, त्यांनी आपला दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे." असे परखड मत त्यांने मानले.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121