तब्बल दोन वर्षांनी वाजणार तिसरी घंटा

सांस्कृतिक डोंबिवलीला महाराष्ट्रातून नाटकाच्या प्रयोगाचा पहिला मान

    22-Oct-2021
Total Views | 84

natyagruha _1  
डोंबिवली : कोरोना काळात बंद असलेला नाटयगृहाचा शनिवारी अखेर पडदा उघडणार आहे. मधला काही काळ वगळता आता तब्बल दोन वर्षीनी तिसरी घंटा ऐकू येणार आहे. महाराष्ट्रात नाटकाचा पहिला प्रयोग करण्याचा मान डोंबिवली शहराने पटकविला आहे.
 
डोंबिवली शहरात अखेर शनिवारी दुपारी नाटकाचा पडदा उघडणार आहे . विशेष म्हणजे मूळच्या रसिक असणाऱ्या डोंबिवलीकरानी तिकीट खिडकीवर मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून तिकीट घेण्याचा पहिला मान मोहन पाठक या डोंबिवलीकर कुटुंबीयांनी मिळवला आहे. सावित्रीबाई फुले नाट्यगृहात पडद्या मागील कलाकारांचा सत्कार करण्यात येणार आहे. त्यामुळे आम्ही तुमच्या मागे आहोत हा दिलासा त्यांना देण्यात येणार आहे. डोंबिवली शहर सांस्कृतिक नगर म्हणून ओळखले जाते. डोंबिवलीतील गुढीपाडव्याची शोभायात्रा सातासमुद्रापार पोहोचली आहे. सतत सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असलेली ही नगरी गेली दोन वर्ष कोरोना विषाणूमुळे सुन्न झाली होती. मात्र डोंबिवलीतील रसिक प्रेक्षकांमध्ये चैतन्य आणण्यासाठी प्रशांत दामले यांच्या 'एका लग्नाची पुढची गोष्ट' या नाटकाची शनिवारी तिसरी घंटा वाजणार आहे. त्यामुळे सावित्रीबाई नाट्यगृह आणि रंगमंच रसिक प्रेक्षकांची आतुरतेने वाट पाहत असल्याची भावना सावित्रीबाई फुले नाट्यगृहाचे व्यवस्थापक दत्तात्रय लधवा यांनी व्यक्त केली आहे . तर अभिनेते प्रशांत दामले यांनी त्यांच्या समाज माध्यमाद्वारे डोंबिवली येथील तिकीट विक्रीला प्रचंड प्रतिसाद असल्याचे सांगितले आहे. नाट्यगृहाचे रोजच निर्जंतुकीकरण करण्यात येत असून राज्य सरकारने सूचना दिल्यानुसार केवळ ५० टक्के क्षमतेने हे नाट्यगृह सुरू करण्यात येणार आहे.
 ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121