धर्मांध मुस्लिमांना कधी शिकवणार अक्कल?

अग्रलेख - धर्मांध मुस्लिमांना कधी शिकवणार अक्कल?

    21-Oct-2021
Total Views |

Fab_1  H x W: 0
 
जाहिरातींतून प्रबोधन चुकीचे नाहीच; पण ते फक्त हिंदूंसाठीच का? धर्मांध मुस्लीम मोहरमला रक्तबंबाळ होईपर्यंत शरीरावर धारदार शस्त्राने फटके मारत रस्त्याने फिरतात, रस्ते अडवून नमाज पढतात, अजानच्या आरोळ्यांनी अन्य धर्मीयांचे कानाचे पडदे फाडण्याचे प्रकारही होतात. पण, त्यावर पुरोगामी-धर्मनिरपेक्ष जाहिराती, लघुपट, चित्रपट तयार करत नाहीत, कारण जीव जाण्याचा धोका.
 
हिंदू धर्मीयांचे सण-उत्सव आले की, अक्कल शिकवण्याची जुनीच प्रथा आहे. त्यासोबतच जाहिरातींच्या माध्यमातून हिंदू धर्माच्या सणांना बळजोरीने धर्मनिरपेक्षतेचा अंगरखा चढवण्याचे कामही जोरात सुरू आहे. ताजा वाद वस्त्रे आणि अन्य उत्पादनांची निर्मिती करणाऱ्या ‘फॅब इंडिया’च्या जाहिरातीने उद्भवला. ‘फॅब इंडिया’ने ‘प्रेम आणि प्रकाशा’चा सण दिवाळीच्या अनुषंगाने ‘जश्न-ए-रिवाज’ नावाने मोहीम सुरू केली. त्यावरच दिवाळी ‘जश्न-ए-रिवाज’ नसल्याचे म्हणत आक्षेप घेण्यात आला, तसेच ट्विटरवर #बॉयकॉट_फॅबइंडियाचा ट्रेंड चालवला गेला. त्यानंतर वाढता विरोध व आर्थिक नुकसानीच्या भीतीने ‘फॅब इंडिया’ने स्पष्टीकरण देत जाहिरात मागे घेतली. पण, यातून विचारपूर्वक, नियोजनबद्धरीत्या हिंदू धर्माची सांस्कृतिक आणि धार्मिक ओळख व सण-उत्सवांना लक्ष्य केले जात असल्याचे स्पष्ट होते.
 
दोन वर्षांपूर्वी ‘हिंदुस्थान युनिलिव्हर’च्या ‘सर्फ एक्सेल’ ब्रॅण्डने ‘रंग लाये संग’ नावाने हिंदू मुलीच्या अंगावर गल्लीतील सर्व मुले रंग उडवतात, नंतर एक मुस्लीम मुलगा येऊन तिच्या सायकलमागे बसतो, त्याला ती मुलगी मशिदीजवळ सोडते व तो मुलगा “नमाज पठण करून येतो” आणि त्याला ती मुलगी “बाहेर आल्यानंतर रंग उडवेल,” असे म्हणताना दाखवले होते. कसलाही संबंध नसताना हिंदू सण-उत्सवात मुस्लीम मुलगा व हिंदू मुलीशी त्याची जवळीक दाखवून ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन देण्याचाच तो एक प्रकार होता. तर ‘रेड लेबल चहा’च्या एका जाहिरातीत हिंदू व्यक्ती गणेश मूर्ती घेण्यासाठी दुकानात जातो. पण, नंतर दुकानदाराने गोल टोपी घातल्याने त्याची मुस्लीम ओळख समोर येते व ती हिंदू व्यक्ती त्याच्याकडून गणेश मूर्ती घेण्यास नकार देते, असे दाखवले होते. तर गेल्या वर्षी सुवर्ण दागिन्यांच्या ‘तनिष्क’ ब्रॅण्डने धर्मनिरपेक्षतेचा ओव्हरडोस देत एका गर्भवती हिंदू स्त्रीला मुस्लीम कुटुंबाची सून व ते मुस्लीम कुटुंब डोहाळजेवणाची तयारी करताना दाखवले होते.
 
चालू वर्षी वस्त्रांच्या ‘मान्यवर’नामक ब्रॅण्डने हिंदू विवाह सोहळ्याच्या प्रसंगातून ‘कन्यादान’ नव्हे, तर ‘कन्यामान’ म्हणत, पुरोगामी विचार देण्याचा उद्योग केला होता. तर आमिर खान अभिनित ‘सिएट टायर्स’च्या दोन जाहिरातींत रस्ते दिवाळीचे फटाके उडवण्यासाठी नव्हे, तर ट्रॅफिकसाठी असल्याचे म्हणताना दाखवले होते. म्हणजेच, जाहिरातींच्या माध्यमातून एक तर हिंदूंना असहिष्णू व मुस्लिमांना सहिष्णू दाखवण्याचे तथाकथित धर्मनिरपेक्ष काम केले जात आहे, तसेच हिंदूंच्या सण-उत्सवातील प्रथा-परंपरांवरही निशाणा साधला जात आहे. पण, याच जाहिराती उलट्या पद्धतीने दाखवल्या तर? अन्य धर्मीयांच्या सण-उत्सवावेळी ‘ईदनिमित्त राम राम’, ‘जय श्री ख्रिसमस’ असे शब्दप्रयोग करून जाहिराती तयार केल्या तर? पण नाहीच, अन्य धर्मीयांच्या सण-उत्सवांवेळी धर्मनिरपेक्षतेचा पाठ पढवणाऱ्या वा सामाजिक वर्तणुकीची अक्कल शिकवणाऱ्या अशा जाहिराती तयारच होणार नाहीत.कारण, तेव्हा जाहिरातदारांची सर्जनशीलता मुर्दाड होऊन जाते आणि ती जीवंत झाली, तर फतवे, न्यायालयीन कारवाई आणि जीवाची भीती सतावते.
 
 
दरम्यान, जाहिरातींतून प्रबोधन चुकीचे नाहीच. पण, ते फक्त हिंदूंच्या सण-उत्सवांवेळी, हिंदूंसाठीच का? धर्मांध मुस्लीम मोहरमच्या जुलुसावेळी रक्तबंबाळ होईपर्यंत शरीरावर चाबकाने, धारदार शस्त्राने फटके मारत रस्त्याने फिरत असतात. कित्येक ठिकाणी धर्मांध मुस्लिमांकडून रस्ते अडवून दैनंदिन आणि जुम्म्याच्या नमाज पठणाचे उद्योगही केले जातात. ठिकठिकाणच्या मशिदींतून दिवसभर पाच वेळा दिल्या जाणाऱ्या मोठमोठ्या आवाजातील अजानच्या आरोळ्यांमुळे परिसरातील अन्य धर्मीयांचे कानाचे पडदे फाडण्याचे प्रकारही धर्मांध मुस्लिमांकडून होतच असतात. तर शाहीन बागेतील निदर्शनाप्रमाणे धर्मांध मुस्लिमांच्या अम्मीजान, खालाजान न्यायालयीन आदेशाला धुडकावून चौकच्या चौक अडवून महिनोन्महिने बसून राहतात. पण, त्यांना मात्र कोणीही धर्मनिरपेक्ष-पुरोगामी मायीचा लाल काहीही बोलत नाही, त्यावर जाहिराती, लघुपट, चित्रपट तयार करत नाहीत, धर्मांध मुस्लिमांच्या परंपरांवर बोट ठेवून त्यांच्या मना-मेंदूत पुरोगामी-धर्मनिरपेक्ष विचार रुजवण्याचे काम करत नाही. कारण, जीव जाण्याचा धोका.
 
तेही ठीक. पण, अंगात स्वतः तसे काही करण्याची धमक नसलेले धर्मांध मुस्लिमांतील ‘प्रेषित वाक्य प्रमाणम्’, ‘पवित्र धर्मग्रंथ प्रामाण्य’, ‘हदीसप्रामाण्य’, ‘मुल्ला-मौलवी शब्द प्रामाण्या’विरोधात काम करणाऱ्या सुधारकांच्या, प्रबोधनकारांच्या पाठीशीही उभे राहत नाहीत, उदा. शमसुद्दीन तांबोळी, अब्दुल कादर मुकादम. ते सगळी अक्कल शिकवणार फक्त हिंदूंना, कारण हिंदू सहिष्णू आहेत, हिंदू कोणी विरोधात बोेलले तरी ते ऐकतात, मानतात वा ट्विटरवर फक्त ‘बॉयकॉट’चा ट्रेंड चालवतात, त्या उप्पर काहीही करत नाहीत. पण, हिंदूंनी एकेकाळी समाजात प्रचलित असलेल्या बालविवाह, हुंडा, केशवपन, सती, स्पृश्य-अस्पृश्यादी कुप्रथा सोडून दिल्या आहेत. बदलत्या काळानुसार स्वतःत बदल घडवण्याची मानसिकता हिंदूधर्मीयांनी कायमच दाखवली. त्याच हिंदूंना जाहिराती वा अन्य प्रकारांतून फुकटचे सल्ले कशाला दिले जातात? दुसरीकडे बकरी ईदनंतर रस्त्यावर वा मोहल्ल्यांतून बोकडाचे कापलेले कान, तोडलेल्या शेपट्या, खुरांचे तुकडे सापडतात. गोवंश हत्याबंदी कठोरतेने लागू केलेली नव्हती, तेव्हा मोठी हाडेही इकडे-तिकडे मिळत असत. त्यातून स्वच्छतेचे, आरोग्याचे भयाण प्रश्न उभे राहू शकतात. पण, त्यावर अक्कल पाजळण्याचे कधी एखाद्या सर्जनशील कलाकाराला-जाहिरातदाराला सूचत नाही, मुस्लिमांच्या सण-उत्सवात त्यांना विसंगती दिसत नाही!
 
दरम्यान, व्यक्ती व समाजाने, धर्मानुयायांनी नवे ते शिकले पाहिजे, त्याशिवाय कोणीही पुढे जाऊ शकत नाही, हे मान्यच. पण, यातला दुसरा भेद म्हणजे वर उल्लेख केलेल्या हिंदू धर्मातील सर्व सुधारणा जाहिरातबाजीच्या पोपटपंचीने झालेल्या नाहीत. तर स्त्रीशिक्षणाच्या उद्गात्या सावित्रीबाई फुलेंना शेणा-चिखलाच्या गोळ्यांचा मारा सहन करावा लागला, गोपाळ गणेश आगरकरांना जीवंतपणीच प्रेतयात्रा अनुभवावी लागली. सुधारणा करण्यासाठी समाजात जावे लागते, मिसळावे लागते, त्यातून होणाऱ्या विरोधाचा सामना करावा लागतो, त्याचीच ही उदाहरणे आणि असा त्रास देशातील जवळपास सर्वच समाजसुधारकांनी भोगलेला आहे. आज सामाजिक सुधारणा करण्याची सर्वाधिक संधी धर्मांध मुस्लिमांत, धर्मांध मुस्लीम मोहल्ल्यांत आहे. पण, हिंदूंना पुरोगामी-धर्मनिरपेक्षतेची अक्कल शिकवणाऱ्या जाहिरातदारांकडून, सर्जनशील कलाकारांकडून दाढी कुरवाळण्याचेच धंदे केले जातील, त्यांच्या एखाद्या कुप्रथेवर कधीही बोट ठेवले जाणार नाही. कारण, तसे केले तर त्या जाहिरातदारांना, कलाकारांना देशातच नव्हे तर मोहल्ल्यांतही असुरक्षितता वाटेल.